शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात घरफोडीचे ५७२ गुन्हे

By admin | Updated: September 24, 2015 00:27 IST

रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत गेल्या आठ महिन्यांपासून दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि चोऱ्यांच्या प्रमाणांत प्रचंड वाढ झाली आहे.

जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत गेल्या आठ महिन्यांपासून दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि चोऱ्यांच्या प्रमाणांत प्रचंड वाढ झाली आहे. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात दरोड्याचे चार, जबरी चोरीचे ४१, घरफोडीचे १५३ तर चोरीचे ३७४ असे ५७२ गुन्हे दाखल झाले असून या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण ३०० गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.जिल्ह्यातील या ५७२ गुन्ह्यांत गुन्हेगारांनी तब्बल १० कोटी ६५ लाख २१ हजार ८८३ रुपयांचा ऐवज लंपास केला होता, त्यापैकी ६ कोटी २४ लाख २३ हजार ५३४ रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. रायगड पोलिसांचे हे गुन्हे उकल प्रमाण ५८.६० टक्के आहे. चार दरोड्यांच्या गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले. दोघा दरोडेखोरांना अटक करण्यात आली. या दरोड्यांत लंपास केलेल्या २ लाख ७ हजार २८० रुपयांच्या ऐवजापैकी केवळ १ हजार ४०० रुपयांचा ऐवज पोलिसांना परत मिळवता आला असून हे गुन्हे उकल प्रमाण ०.६० टक्के आहे.जबरी चोरीचे जिल्ह्यात ४१ गुन्हे दाखल झाले, त्या प्रकरणी ३५ जणांना अटक करण्यात आली. या ४१ जबरी चोऱ्यांमध्ये १ कोटी १७ लाख ३८ हजार ८२० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. २४ जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करुन उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, यात ८ लाख ५२ हजार ९२० रुपयांचा ऐवज परत मिळवला आहे. हे गुन्हे उकल प्रमाण ७.२६ टक्के आहे.चोरीचे जिल्ह्यात ३७४ गुन्हे दाखल झाले, त्यात २१५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. १२७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या सर्व चोऱ्यांमध्ये चोरीस गेलेल्या ८ कोटी ३८ लाख २ हजार ५९१ रुपयांच्या ऐवजापैकी ६ कोटी ५ लाख ३२ हजार ४५५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी परत मिळवला असून हे गुन्हे उकल प्रमाण ७२.२३ टक्के आहे.घरफोडीचे जिल्ह्यात १५३ गुन्हे दाखल झाले, त्यातील केवळ २२ गुन्ह्यांची उकल रायगड पोलिसांना आतापर्यंत करता आली आहे. या गुन्ह्यांमध्ये ४८ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. घरफोड्या करुन चोरट्यांनी लंपास केलेल्या एकूण १ कोटी ७ लाख ७३ हजार १९२ रुपयांच्या ऐवजापैकी १० लाख ३६ हजार ७५९ रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून याचे गुन्हे उकल प्रमाण ९.६२ टक्के आहे.