शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५५७ उमेदवार आमने-सामने

By admin | Updated: February 14, 2017 05:03 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिवशी

कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिवशी जिल्हा परिषद (निवडणूक विभाग) मधून १७ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यात आली, तर पंचायत समिती (निर्वाचक गण) मधून २७ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यात आली. अशी एकूण ४४ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यात आली. आता जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २१ उमेदवार तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. एकू ण १८ जागांसाठी ६७ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी कळंब जिल्हा परिषद निवडणूक विभागातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि जिल्हा परिषद सदस्य पूजा थोरवे यांनी कशेळे गणातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष आघाडी घट्ट झाली आहे. शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कालपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवीत आहोत असे सांगत होते, परंतु सोमवारी नेरळ व अन्य ठिकाणावरून शिवसेनेचे ए बी फॉर्म दिलेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस -शिवसेनेची छुपी युती उघड झाली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यावेळी काही उमेदवार आणि काही उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी निवडणूक चिन्हे वाटप केल्यानंतर उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. (वार्ताहर)पोलादपूरमध्ये १६ उमेदवारांचे अर्ज मागेपोलादपूर : तालुक्यातील चार पंचायत समिती गणातील १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार तर जिल्हा परिषदेच्या सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य आजमावत आहेत.गोवेले गणामध्ये शिवसेनेच्या मंजूश्री अहिरे व शेकाप-काँग्रेस युतीच्या नंदा चांदे यांच्यात लढत होणार आहे. देवळे गणातील तुकाराम केसरकर, संतोष घाडगे, अनिल मालुसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.शिवसेनेचे अनिल दळवी, शेकाप-काँग्रेस युतीचे शैलेश सलागरे व लक्ष्मण पवार यांच्यात थेट लढत होणार आहे.लोहारे गणातील संगीता कासार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून येथे शिवसेनेचे यशवंत कासार, काँग्रेस-शेकापचे संजय जंगम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सखाराम दवे व भाजपाचे सुरेश पालपीतकर यांच्यात लढत होत आहे. कोंढवी गणातील सीमा शिंदे, संगीता शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपतर्फे रचना कदम, शिवसेनेतर्फे सायली शिंदे, काँग्रेस-शेकाप तर्फे दिपीका दरेकरव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रमिला शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे.देवळे जि. प. गटातील भाविका सुतार, अंजली सलागरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या अरुणा सुतार व शेकाप-काँग्रेस युतीच्या सुमन कुंभार यांच्यात लढत होणार आहे. तर लोहारे गटातील अर्पणा जाधव, शिवाजी जाधव, अनिल भिलारे, महादेव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादी सुभाष जाधव, शेकाप-काँग्रेसचे कृष्णा कदम यांच्या तिरंगी लढत होणार आहे. पेण : निवडणूक रिंगणात ८१ उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या ३३ अर्जापैकी १६ उमेदवारी अर्ज माघारी घेतले तर पंचायत समितीच्या ४८ अर्जापैकी १६ अर्ज माघारी घेतले.एकू ण३२ अर्ज माघारी घेतल्याने ८१ पैकी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये रावे जिते पाबळ काराव या गटात प्रत्येकी ३ असे १२ उमेदवार तर वडखळ गटात ५ असे १७ उमेदवार तर पंचायत समितीच्या ९ गणात प्रत्येकी ३ या प्रमाणे २७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. उरणमध्ये ४३ उमेदवार रिंगणातउरण : तालुक्यात होत असलेल्या जिल्हा परिषदेसाठी १७ तर पंचायत समितीसाठी एकूण २६ उमेदवार निवडूक रिंगणात आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उरणमध्ये जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी २६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी तब्बल ४६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी २० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २६ उमेदवार रिंगणात आहेत. श्रीवर्धनमध्ये नऊ उमेदवार रिंगणातश्रीवर्धन : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पंचायत समितीसाठी ३० तर जिल्हा परिषदेसाठी ११ असे एकूण ४१ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननीमध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष अजय अरु ण पोलेकर व कुसुम रामचंद्र दोडकुलकर यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले होते. चार पंचायत समिती गणात १७ तर जिल्हा परिषदेच्या दोन गटासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत.श्रीवर्धनमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यादरम्यान शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, नॅशनल काँग्रेस, मनसे समवेत काही बंडखोर अपक्षांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पंचरंगी होण्याची शक्यता दिसत असली तरी प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात होईल. बागमंडला गणातून सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने या गणात आता ६ जण रिंगणात आहेत.अलिबागमध्ये २९ उमेदवारांची माघारअलिबाग तालुक्यातील असणारी थळ मतदार संघातही प्रतिष्ठेची लढत होणार आहे. शिवसेनेने मानसी दळवी यांनी उमेदवारी दिली आहे. त्याही अध्यक्ष पदाच्या दावेदार आहेत. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे येथे शिवसेनेच्या मानसी दळवी, शेकापच्या चित्रा पाटील आणि अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये तिरंगी लढत अनुभवाला मिळणार आहे. अलिबाग तालुक्यामध्ये एकूण सात मतदार संघ आहेत, तर १४ पंचायत समितीचे मतदार संघ आहेत. जिल्हा परिषदेसाठी १३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी ३५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. येथून २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.