शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

भात पेरण्या ५० टक्के पूर्ण; मृग नक्षत्रातील पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:16 IST

गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील शेतजमिनींना चांगलीच ओल आल्याने शेतकरीवर्गाची भातपेरण्याची कामे गतिमान झाली आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५० टक्के भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

अलिबाग : गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील शेतजमिनींना चांगलीच ओल आल्याने शेतकरीवर्गाची भातपेरण्याची कामे गतिमान झाली आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५० टक्के भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होणार आहे.शुक्रवारी मृग नक्षत्रावर येणारा पाऊस समाधानकारक आणि पेरण्यांच्या उगवणीस पोषक होईल. त्याचबरोबर यंदाचा एकूणच सर्व नक्षत्रांतील पाऊस समाधानकारक होईल, असा अंदाज कृषी अभ्यासक व प्रयोगशील शेतकरी बाळकृष्ण नारायण जोशी यांनी व्यक्त केला आहे. यंदा पाऊस शेतीला कमीही होणार नाही आणि अधिक होऊन नुकसानीही करणार नाही. त्याचबरोबर मोठ्या वादळाचीही परिस्थिती येणार नाही, असाही अंदाज जोशी यांनी व्यक्त केला आहे.२४ तासांत माणगाव येथे २६ मि.मी. पाऊसगुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात माणगाव येथे सर्वाधिक २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पनवेल व तळा येथे १३ मि.मी., श्रीवर्धन येथे १० मि.मी., उरण व पोलादपूर येथे ३ मि.मी., अलिबाग व महाड येथे २ मि.मी., कर्जत येथे ०.२ मि.मी., खालापूर येथे १ मि.मी. तर माथेरान येथे ९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तर पेण, मुरु ड, रोहा, सुधागड, म्हसळा या ठिकाणी शून्य पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Raigadरायगड