शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

२० टक्के अनुदानासाठी ५० शाळा पात्र

By admin | Updated: January 14, 2017 07:00 IST

रायगड जिल्ह्यातील विनाअनुदानित तत्त्वावरील १०३ शाळांपैकी सुमारे ५० शाळा सरकारच्या २० टक्के अनुदानास पात्र ठरल्या आहेत.

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्ह्यातील विनाअनुदानित तत्त्वावरील १०३ शाळांपैकी सुमारे ५० शाळा सरकारच्या २० टक्के अनुदानास पात्र ठरल्या आहेत. सरकारला नवीन शैक्षणिक वर्षापासून या ५० शाळांसाठी सुमारे तीन कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. अनुदानामुळे त्या शाळेतील सुमारे ३५० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये एकूण ३०२ अनुदानित शाळांची संख्या आहे. विनाअनुदानित असणाऱ्या १०३ शाळांपैकी ५० शाळांनी निकष पूर्ण केल्यामुळे त्यांना सरकारचे २० टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. रायगड जिल्हा मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ असणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये काही नामवंत शैक्षणिक संस्थांनी शाळा उभ्या केल्या आहेत. जिल्ह्यात अद्यापही नामवंत आणि गुणवत्ता असणाऱ्या शाळांचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. काही तालुक्यांमध्ये नव्याने शाळा सुुरू झाल्या आहेत, तर काही शाळा या बऱ्याच कालावधीपासून शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. त्यामध्ये विनाअनुदानित शाळाही आहेत. विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांसह शिक्षेकतर कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन हे तुटपुंजे असते, त्याचप्रमाणे त्यांना सरकारी योजनांचाही लाभ घेता येत नाही. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल. या आशेवर तेथे ते काम करीत असतात. निकष पूर्ण न करणाऱ्यांचे अनुदान काढून घेतल्याने काही शिक्षकांना घरी बसावे लागण्याची उदाहरणे मध्यंतरी चर्चेत आली होती. विद्यादानाचे काम कमी पगारात करणाऱ्यांना जर सरकारी नियमाप्रमाणे पगार मिळाला, तर त्यांच्या क्रियाशक्तीवर चांगला परिणाम होतो, असा शिक्षकांच्या संघटनांचा दावा आहे. रायगड जिल्ह्यातील १०३ पैकी ५० शाळांनी सरकारचे निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्या शाळांना २० टक्के अनुदान आता नवीन शैक्षणिक वर्षापासून मिळणार आहे. एका शाळेतील चार शिक्षक, दोन क्लार्क आणि एक शिपाई यांना त्याचा फायदा मिळणार आहे. त्यानुसार ५० शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास हा आकडा ३५० पर्यंत जातो.एका शाळेला दर वर्षाला सात लाख ५० हजार रुपयांप्रमाणे ५० शाळांसाठी तीन कोटी ७५ लाख अनुदान मिळणार आहे. त्यातून शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे पगार भागविले जाणार आहेत. आता पगार होण्याची वाट बघावी लागणार नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.