शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

२० टक्के अनुदानासाठी ५० शाळा पात्र

By admin | Updated: January 14, 2017 07:00 IST

रायगड जिल्ह्यातील विनाअनुदानित तत्त्वावरील १०३ शाळांपैकी सुमारे ५० शाळा सरकारच्या २० टक्के अनुदानास पात्र ठरल्या आहेत.

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्ह्यातील विनाअनुदानित तत्त्वावरील १०३ शाळांपैकी सुमारे ५० शाळा सरकारच्या २० टक्के अनुदानास पात्र ठरल्या आहेत. सरकारला नवीन शैक्षणिक वर्षापासून या ५० शाळांसाठी सुमारे तीन कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. अनुदानामुळे त्या शाळेतील सुमारे ३५० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये एकूण ३०२ अनुदानित शाळांची संख्या आहे. विनाअनुदानित असणाऱ्या १०३ शाळांपैकी ५० शाळांनी निकष पूर्ण केल्यामुळे त्यांना सरकारचे २० टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. रायगड जिल्हा मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ असणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये काही नामवंत शैक्षणिक संस्थांनी शाळा उभ्या केल्या आहेत. जिल्ह्यात अद्यापही नामवंत आणि गुणवत्ता असणाऱ्या शाळांचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. काही तालुक्यांमध्ये नव्याने शाळा सुुरू झाल्या आहेत, तर काही शाळा या बऱ्याच कालावधीपासून शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. त्यामध्ये विनाअनुदानित शाळाही आहेत. विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांसह शिक्षेकतर कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन हे तुटपुंजे असते, त्याचप्रमाणे त्यांना सरकारी योजनांचाही लाभ घेता येत नाही. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल. या आशेवर तेथे ते काम करीत असतात. निकष पूर्ण न करणाऱ्यांचे अनुदान काढून घेतल्याने काही शिक्षकांना घरी बसावे लागण्याची उदाहरणे मध्यंतरी चर्चेत आली होती. विद्यादानाचे काम कमी पगारात करणाऱ्यांना जर सरकारी नियमाप्रमाणे पगार मिळाला, तर त्यांच्या क्रियाशक्तीवर चांगला परिणाम होतो, असा शिक्षकांच्या संघटनांचा दावा आहे. रायगड जिल्ह्यातील १०३ पैकी ५० शाळांनी सरकारचे निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्या शाळांना २० टक्के अनुदान आता नवीन शैक्षणिक वर्षापासून मिळणार आहे. एका शाळेतील चार शिक्षक, दोन क्लार्क आणि एक शिपाई यांना त्याचा फायदा मिळणार आहे. त्यानुसार ५० शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास हा आकडा ३५० पर्यंत जातो.एका शाळेला दर वर्षाला सात लाख ५० हजार रुपयांप्रमाणे ५० शाळांसाठी तीन कोटी ७५ लाख अनुदान मिळणार आहे. त्यातून शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे पगार भागविले जाणार आहेत. आता पगार होण्याची वाट बघावी लागणार नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.