शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

पाणीपुरवठ्याच्या ४८० योजना

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

रायगड जिल्ह्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हा परिषद यासाठी सुमारे ८० कोटी रूपर्य खर्च करणार असून जुन्याच योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात साडेतीन हजार मिमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील लघु प्रकल्पाची २८ धरणे दुथडी भरून वाहतात. एवढ्या संख्येने पाऊस पडूनही त्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने सप्टेंबरपासूनच पाणीटंचाईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. जिल्हा प्रशासन दरवर्षी टंचाई कृती आराखडा तयार करते. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. हा तात्पुरता उपाय असल्याने नागरिकांना दरवर्षी पाणी समस्येला सामोर जावे लागते. ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना जिल्हा परिषदेने हाती घेतल्या आहेत. या योजना जुन्याच असून त्या प्रथम पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. या योजनांसाठी सुमारे ८० कोटी रूपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता टोरो यांनी लोकमतशी बोलताना दिली. या योजना पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील पाण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे. नव्यानेही काही योजना हाती घ्यायच्या असल्या तरी आधी जुन्या योजना पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)