शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पाणीपुरवठ्याच्या ४८० योजना

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

रायगड जिल्ह्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हा परिषद यासाठी सुमारे ८० कोटी रूपर्य खर्च करणार असून जुन्याच योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात साडेतीन हजार मिमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील लघु प्रकल्पाची २८ धरणे दुथडी भरून वाहतात. एवढ्या संख्येने पाऊस पडूनही त्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने सप्टेंबरपासूनच पाणीटंचाईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. जिल्हा प्रशासन दरवर्षी टंचाई कृती आराखडा तयार करते. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. हा तात्पुरता उपाय असल्याने नागरिकांना दरवर्षी पाणी समस्येला सामोर जावे लागते. ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना जिल्हा परिषदेने हाती घेतल्या आहेत. या योजना जुन्याच असून त्या प्रथम पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. या योजनांसाठी सुमारे ८० कोटी रूपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता टोरो यांनी लोकमतशी बोलताना दिली. या योजना पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील पाण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे. नव्यानेही काही योजना हाती घ्यायच्या असल्या तरी आधी जुन्या योजना पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)