शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

मुरुडमध्ये हमीभाव केंद्रात ४५०० क्विंटल भाताची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:55 IST

आनंदी वातावरण : शेतकऱ्यांना बोनस रकमेची प्रतीक्षा 

मुरुड : तालुक्याला शासनातर्फे आ. महेंद्र दळवी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे भात हमीभाव खरेदी केंद्र मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या अल्प कालावधीत सुमारे ४५०० क्विंटल भाताची खरेदी झाल्याची माहिती आधारभूत भात केद्रांचे प्रमुख दिनेश मिणमिणे यांनी दिली आहे.

मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना भाताच्या विक्रीसाठी रोहा, अलिबागशिवाय पर्याय नसे. तालुक्यात खार अंबोली येथे भात केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व वेळ वाचणार आहे. शासनाकडून सुवर्णा, जया, रूपाली, चिंटू आदी भाताच्या वाणासाठी प्रतिक्विंटल १८६८ रुपये इतका भाव घोषित करण्यात आला आहे. भात मोजणी प्रमाणित वजन काट्यावर केली जात असल्याने बळीराजाची फसवणूक टाळली जाईल. याशिवाय खासगी व्यापाऱ्यांकडून अत्यंत अल्पदरात नडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक टळली आहे. मुरुड तालुक्यात भातशेती लागवडक्षेत्र कागदोपत्री ३९०० हेक्टर असले तरी अतिअल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्यक्षात ७०० ते ८०० हेक्टर भात क्षेत्र पडीक असल्याची वस्तुस्थिती नजरेआड करून उपयोगी नाही. हमीभाव मिळू लागल्याने काहीअंशी ओसाड जमीन लागवड क्षेत्रही वाढण्यास मदत होणार आहे. बहुतांश भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हमीभाव रक्कम जमा झाल्याने  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तथापि, यंदा निसर्गचक्रीवादळ तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेेव्हा हमीभाव खरेदी केंद्रात भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस राज्य शासनाने तातडीने द्यावे, अशी मागणी खार अंबोलीचे माजी सरपंच मनोज कमाने यांनी केली आहे.

भात खरेदी केंद्रावर ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी भात जमा करावा, असे आवाहन दिनेश मिणमिणे यांनी केले आहे. मुरुड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांना हमीभाव केंद्रासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, भातशेती परवडण्यासाठी आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. हमीभाव केंद्र मुरुड तालुक्यात नव्याने सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भाताला वाजवी दर मिळाल्याने शेतकरी भात शेतीकडे पुन्हा वळतील. कोकणातील शेतकऱ्यांनी भातपीक काढणीनंतर कडधान्यासारखे पीक घेतले पाहिजे.