शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये हमीभाव केंद्रात ४५०० क्विंटल भाताची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:55 IST

आनंदी वातावरण : शेतकऱ्यांना बोनस रकमेची प्रतीक्षा 

मुरुड : तालुक्याला शासनातर्फे आ. महेंद्र दळवी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे भात हमीभाव खरेदी केंद्र मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या अल्प कालावधीत सुमारे ४५०० क्विंटल भाताची खरेदी झाल्याची माहिती आधारभूत भात केद्रांचे प्रमुख दिनेश मिणमिणे यांनी दिली आहे.

मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना भाताच्या विक्रीसाठी रोहा, अलिबागशिवाय पर्याय नसे. तालुक्यात खार अंबोली येथे भात केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व वेळ वाचणार आहे. शासनाकडून सुवर्णा, जया, रूपाली, चिंटू आदी भाताच्या वाणासाठी प्रतिक्विंटल १८६८ रुपये इतका भाव घोषित करण्यात आला आहे. भात मोजणी प्रमाणित वजन काट्यावर केली जात असल्याने बळीराजाची फसवणूक टाळली जाईल. याशिवाय खासगी व्यापाऱ्यांकडून अत्यंत अल्पदरात नडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक टळली आहे. मुरुड तालुक्यात भातशेती लागवडक्षेत्र कागदोपत्री ३९०० हेक्टर असले तरी अतिअल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्यक्षात ७०० ते ८०० हेक्टर भात क्षेत्र पडीक असल्याची वस्तुस्थिती नजरेआड करून उपयोगी नाही. हमीभाव मिळू लागल्याने काहीअंशी ओसाड जमीन लागवड क्षेत्रही वाढण्यास मदत होणार आहे. बहुतांश भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हमीभाव रक्कम जमा झाल्याने  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तथापि, यंदा निसर्गचक्रीवादळ तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेेव्हा हमीभाव खरेदी केंद्रात भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस राज्य शासनाने तातडीने द्यावे, अशी मागणी खार अंबोलीचे माजी सरपंच मनोज कमाने यांनी केली आहे.

भात खरेदी केंद्रावर ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी भात जमा करावा, असे आवाहन दिनेश मिणमिणे यांनी केले आहे. मुरुड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांना हमीभाव केंद्रासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, भातशेती परवडण्यासाठी आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. हमीभाव केंद्र मुरुड तालुक्यात नव्याने सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भाताला वाजवी दर मिळाल्याने शेतकरी भात शेतीकडे पुन्हा वळतील. कोकणातील शेतकऱ्यांनी भातपीक काढणीनंतर कडधान्यासारखे पीक घेतले पाहिजे.