शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

मुरुडमध्ये हमीभाव केंद्रात ४५०० क्विंटल भाताची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:55 IST

आनंदी वातावरण : शेतकऱ्यांना बोनस रकमेची प्रतीक्षा 

मुरुड : तालुक्याला शासनातर्फे आ. महेंद्र दळवी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे भात हमीभाव खरेदी केंद्र मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या अल्प कालावधीत सुमारे ४५०० क्विंटल भाताची खरेदी झाल्याची माहिती आधारभूत भात केद्रांचे प्रमुख दिनेश मिणमिणे यांनी दिली आहे.

मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना भाताच्या विक्रीसाठी रोहा, अलिबागशिवाय पर्याय नसे. तालुक्यात खार अंबोली येथे भात केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व वेळ वाचणार आहे. शासनाकडून सुवर्णा, जया, रूपाली, चिंटू आदी भाताच्या वाणासाठी प्रतिक्विंटल १८६८ रुपये इतका भाव घोषित करण्यात आला आहे. भात मोजणी प्रमाणित वजन काट्यावर केली जात असल्याने बळीराजाची फसवणूक टाळली जाईल. याशिवाय खासगी व्यापाऱ्यांकडून अत्यंत अल्पदरात नडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक टळली आहे. मुरुड तालुक्यात भातशेती लागवडक्षेत्र कागदोपत्री ३९०० हेक्टर असले तरी अतिअल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्यक्षात ७०० ते ८०० हेक्टर भात क्षेत्र पडीक असल्याची वस्तुस्थिती नजरेआड करून उपयोगी नाही. हमीभाव मिळू लागल्याने काहीअंशी ओसाड जमीन लागवड क्षेत्रही वाढण्यास मदत होणार आहे. बहुतांश भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हमीभाव रक्कम जमा झाल्याने  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तथापि, यंदा निसर्गचक्रीवादळ तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेेव्हा हमीभाव खरेदी केंद्रात भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस राज्य शासनाने तातडीने द्यावे, अशी मागणी खार अंबोलीचे माजी सरपंच मनोज कमाने यांनी केली आहे.

भात खरेदी केंद्रावर ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी भात जमा करावा, असे आवाहन दिनेश मिणमिणे यांनी केले आहे. मुरुड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांना हमीभाव केंद्रासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, भातशेती परवडण्यासाठी आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. हमीभाव केंद्र मुरुड तालुक्यात नव्याने सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भाताला वाजवी दर मिळाल्याने शेतकरी भात शेतीकडे पुन्हा वळतील. कोकणातील शेतकऱ्यांनी भातपीक काढणीनंतर कडधान्यासारखे पीक घेतले पाहिजे.