शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

चार वर्षांत ४५ बालकांचा मृत्यू

By admin | Updated: November 14, 2015 02:20 IST

शासनाने गरोदर माता व प्रसूतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या असल्यातरी दासगाव खाडी पट्टा ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांमध्ये ४५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर

दासगाव : शासनाने गरोदर माता व प्रसूतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या असल्यातरी दासगाव खाडी पट्टा ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांमध्ये ४५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शासनाच्या माता बाल संगोपनाच्या योजनेचे वाभाडे निघाले आहे.दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात असणाऱ्या विविध समस्यांमुळे गेली चार वर्षात जवळपास ४५ नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे. याची धक्कादायक माहिती दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून उघडकीस आली आहे. शासनाने बालसंगोपनाकरिता विविध योजना राबवल्या असल्या तरी ग्रामीण भागामध्ये या योजनांचा बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र बालमृत्यूच्या आकड्यामुळे समोर आले आहे. एका वर्षातील जवळपास ४५ बालकांचा मृत्यू या विभागात गेल्या चार वर्षात विविध आजारांमुळे झालेला आहे. ग्रामीण भागात नवजात बालकांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष देखील याला कारणीभूत ठरत आहेत. अशा योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या अशा स्वयंसेविका गरोदर मातांना बालकांच्या योग्य वाढीसाठी आणि त्यांच्या औषधोपचाराकरिता मार्गदर्शन करत असल्या तरी ग्रामीण भागापासून मूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर खूप जास्त असल्यामुळे तत्काळ आरोग्य सुविधा पुरवण्यास अडचण येते. यामुळे दासगाव खाडी पट्ट्यातील बाल मृत्यूचे दर वाढत आहे. ग्रामीण भाग याविषयी आजही अज्ञानी असल्याने नवजात बालकांवर उपचार आणि त्यांची काळजी याबाबत दुर्लक्ष होत असले तरी शासनाच्या योजनांची देखील माहिती सहज उपलब्ध होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रावर आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने दासगाव आरोग्य केंद्रापासून जवळपास १५ ते २० किलोमीटर अंतरावर पसरलेल्या २२ गावे व त्या ठिकाणच्या वाड्यांना आरोग्य सेवा पुरवताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य योजना आजही घरोघरी पोहचवण्यास कमकुवत ठरत आहेत. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजही बालरोग तज्ज्ञ किंवा महिला विशेष तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नाहीत यामुळे या ग्रामीण भागातील महिला आणि बालरुग्णांना शहरामध्ये उपचारासाठी किंवा प्रसूतीसाठी न्यावे लागते. यामुळे आरोग्य केंद्राची सेवा असून नसल्यासारखी आहे. तरी बालमृत्यू थांबवण्यासाठी शासकीय आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. (वार्ताहर)