शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कर्जतमध्ये ३४ गावे, ५३ वाड्यांत टंचाई, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:16 IST

तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत

संजय गायकवाड  कर्जत : तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारच्या वतीने पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून ३४ गावे आणि ५३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. टंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या झळा अनेक तालुक्यांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून टँकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे असून टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांनी तोपर्यंत करायचे काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.कर्जत हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारी महिना सुरू झाला की ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विहिरींचे पाणी तळ गाठतात. परिणामी नळपाणी योजना मोडकळीस येतात. त्यामुळे येथील महिलांना पिण्याचे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी काही मैल वणवण करावी लागते. अशा भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने बैलगाडी किंवा टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा बनविण्यात आला आहे. आमदार सुरेश लाड, कर्जत पंचायत समितीचे तत्कालीन सभापती अमर मिसाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता कांबळे आणि गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या स्वाक्षरी असलेल्या या पाणीटंचाईग्रस्त कृती आराखड्यात तालुक्यातील ३४ गावे आणि ५३ वाड्या अशा ८७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ४३ लाख रु पयांची तरतूद करून ठेवली आहे.शासनाने टंचाईग्रस्त भागाला टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवण्याचे नियोजन केले आहे, पण हे नियोजन १ एप्रिलपासून जून महिन्यात पावसाळा सुरू होईपर्यंतचे आहे. मात्र सध्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा ठिकाणी पिण्याचे पाणी पोहचविण्यात शासनाचे नियम अडथळे बनत आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील रहिवाशांना आणि मुख्य म्हणजे महिलांना आतापासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी कोसो दूर जावे लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने घालून दिलेला नियम पुढे करून टँकर एप्रिल महिन्यात सुरू केले जातील, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.