शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये ३४ गावे, ५३ वाड्यांत टंचाई, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:16 IST

तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत

संजय गायकवाड  कर्जत : तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारच्या वतीने पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून ३४ गावे आणि ५३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. टंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या झळा अनेक तालुक्यांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून टँकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे असून टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांनी तोपर्यंत करायचे काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.कर्जत हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारी महिना सुरू झाला की ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विहिरींचे पाणी तळ गाठतात. परिणामी नळपाणी योजना मोडकळीस येतात. त्यामुळे येथील महिलांना पिण्याचे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी काही मैल वणवण करावी लागते. अशा भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने बैलगाडी किंवा टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा बनविण्यात आला आहे. आमदार सुरेश लाड, कर्जत पंचायत समितीचे तत्कालीन सभापती अमर मिसाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता कांबळे आणि गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या स्वाक्षरी असलेल्या या पाणीटंचाईग्रस्त कृती आराखड्यात तालुक्यातील ३४ गावे आणि ५३ वाड्या अशा ८७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ४३ लाख रु पयांची तरतूद करून ठेवली आहे.शासनाने टंचाईग्रस्त भागाला टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवण्याचे नियोजन केले आहे, पण हे नियोजन १ एप्रिलपासून जून महिन्यात पावसाळा सुरू होईपर्यंतचे आहे. मात्र सध्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा ठिकाणी पिण्याचे पाणी पोहचविण्यात शासनाचे नियम अडथळे बनत आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील रहिवाशांना आणि मुख्य म्हणजे महिलांना आतापासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी कोसो दूर जावे लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने घालून दिलेला नियम पुढे करून टँकर एप्रिल महिन्यात सुरू केले जातील, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.