शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

कर्जतमध्ये ३४ गावे, ५३ वाड्यांत टंचाई, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:16 IST

तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत

संजय गायकवाड  कर्जत : तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारच्या वतीने पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून ३४ गावे आणि ५३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. टंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या झळा अनेक तालुक्यांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून टँकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे असून टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांनी तोपर्यंत करायचे काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.कर्जत हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारी महिना सुरू झाला की ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विहिरींचे पाणी तळ गाठतात. परिणामी नळपाणी योजना मोडकळीस येतात. त्यामुळे येथील महिलांना पिण्याचे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी काही मैल वणवण करावी लागते. अशा भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने बैलगाडी किंवा टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा बनविण्यात आला आहे. आमदार सुरेश लाड, कर्जत पंचायत समितीचे तत्कालीन सभापती अमर मिसाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता कांबळे आणि गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या स्वाक्षरी असलेल्या या पाणीटंचाईग्रस्त कृती आराखड्यात तालुक्यातील ३४ गावे आणि ५३ वाड्या अशा ८७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ४३ लाख रु पयांची तरतूद करून ठेवली आहे.शासनाने टंचाईग्रस्त भागाला टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवण्याचे नियोजन केले आहे, पण हे नियोजन १ एप्रिलपासून जून महिन्यात पावसाळा सुरू होईपर्यंतचे आहे. मात्र सध्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा ठिकाणी पिण्याचे पाणी पोहचविण्यात शासनाचे नियम अडथळे बनत आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील रहिवाशांना आणि मुख्य म्हणजे महिलांना आतापासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी कोसो दूर जावे लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने घालून दिलेला नियम पुढे करून टँकर एप्रिल महिन्यात सुरू केले जातील, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.