शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४३९ गावांना उधाण, पुराचा धोका

By admin | Updated: April 28, 2017 00:32 IST

निसर्गाच्या अवकृपेची टांगती तलवार रायगड जिल्ह्यावर सातत्यानेच असून, सध्या तीव्र जलदुर्भिक्ष आणि ४० ते ४५ अंश सेल्सियस अशा तप्त

जयंत धुळप / अलिबागनिसर्गाच्या अवकृपेची टांगती तलवार रायगड जिल्ह्यावर सातत्यानेच असून, सध्या तीव्र जलदुर्भिक्ष आणि ४० ते ४५ अंश सेल्सियस अशा तप्त उन्हाळ््यात होरपळून निघत असलेल्या रायगड जिल्ह्यातील ४३९ गावांना येत्या पावसाळ््यात सागरी भरतीची उधाणे आणि पुराचा धोका असल्याने रायगड जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेने त्याचा मुकाबला करण्याकरिता आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. या ४३९ संभाव्य आपत्तीजन्य गावांपैकी नदी किनाऱ्याच्या २३२ गावांना पुराचा धोका, सागर किनारच्या १२३ गावांना सागरी उधाणांचा धोका तर ८४ गावांना भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.पावसाळ्यात समुद्राला येणारे उधाण, अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती, दरडी कोसळण्यामुळे डोंगरमाथ्यावर व पायथ्याशी असलेल्या गावांना उद्भवणाऱ्या धोक्यांच्या पूर्वइतिहासाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज होत आहे. रायगड जिल्ह्यात समुद्र, खाडी आणि नदी किनाऱ्यालगतची ३५५ तर डोंगरमाथ्यावरील व पायथ्याशी असलेली ८४ अशा ४३९ गावांमध्ये पावसाळ्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ तालुक्यांनी आपले अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे ३० एप्रिल २०१७ पूर्वी सादर करण्याच्या सूचना नुकत्याच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदार व नगरपालिकेला केल्या आहेत. तालुका स्तरावरील आपत्ती निवारण आराखडे प्राप्त झाल्यावर जिल्ह्याचा आपत्ती निवारण आराखडा तयार केल्याचे पाठक यांनी सांगितले.समुद्राला भरती असेल आणि त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास समुद्र, खाडी व नदीकिनाऱ्यावरील गावांमध्ये उधाणाचे पाणी शिरून पूर येण्याची शक्यता असते. तसेच डोंगरमाथ्यावरील तसेच पायथ्याशी असलेल्या गावांमध्येही अतिवृष्टी झाल्यास दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र, खाडी आणि नदी किनाऱ्यालगतच्या, डोंगरमाथ्यावरील तसेच पायथ्याशी असलेल्या गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन गावनिहाय आपत्ती निवारण आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा व तालुकास्तरावर आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी समित्यांची स्थापना, रूग्णवाहिका, बोटींची सुविधा या बरोबरच संभाव्य आपत्तीची पूर्वसूचना नागरिक व ग्रामस्थांना देण्याकरिता ‘बल्क एसएमएस’ यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार आहे.नदीकिनाऱ्यावरील २३२ गावांना पुराचा धोका जिल्ह्यातील सावित्री, गांधारी, कुंडलिका, अंबा, उल्हास, गाढी, काळ, बाळगंगा, पाताळगंगा,भोगावती या प्रमुख नद्यांबरोबरच पेज, रामराज, मांडला, कासाड, लेंडी, वाजापूर, ओढा, उसर्ली,धवरी, गोद, मेढा, पिटसई, तळेगाव, पढवण, वलकी, नागेश्वरी, भावे, जानसई, कार्ले,दांडगुरी या अन्य नद्या व मोठ्या ओहोळांच्या नदीकिनाऱ्यावरील २३२ गावांना अतिवृष्टी झाल्यास पुराचा धोका संभवतो. १२३ गावांना सागरी उधाणाचा धोकासमुद्रकिनाऱ्यालगतची अलिबाग तालुक्यातील १६, मुरुड ९, पनवेल ५, उरण ४ ,श्रीवर्धन १९ तर खाडी किनाऱ्यालगतच्या अलिबाग तालुक्यातील ११, मुरुड ८, पेण ९, पनवेल ११, उरण ५ , माणगाव २, महाड ६, श्रीवर्धन ११, म्हसळा ९ अशा या १२३ गावांमध्ये उधाण तसेच अतिवृष्टिमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.८४ गावांना भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोकाच्वरिष्ठ भूवैज्ञानिक तसेच रायगड भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार,रायगड जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ८४ गावांना पावसाळ््यात दरडीपासून धोका उद्भवण्याची शक्यता आहे. च्यामध्ये सर्वाधिक ३२ गावे महाड तालुक्यात तर २५ गावे पोलादपूर तालुक्यातील आहेत. उर्वरित तालुक्यात खालापूर तालुक्यात ६, म्हसळा व रोहा तालुक्यांत प्रत्येकी ४, माणगाव व कर्जत तालुक्यांत प्रत्येकी ३, मुरुड व पनवेल तालुक्यांत प्रत्येकी २ तर श्रीवर्धन, तळा व पाली तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे.