शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये पाणी बिलाची ४० कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:22 IST

उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

- मधुकर ठाकूरउरण : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी मार्च महिन्याअखेरपर्यंत २५ कोटी ५९ लाख ९९८ तर उरण नगरपरिषदेकडे १५ कोटी ७ लाख ९७ हजार ९९८ रुपये अशी एकूण एमआयडीसीची ४० कोटी ८ लाख ५७ हजार ९८१ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी दिली.उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची बिले भरण्यास मात्र दिरंगाई केली जात आहे. ३१ मार्च २०१९ अखेरपर्यंत २४ ग्रामपंचायतींकडे २५ कोटी ५९ लाख ९९८ रुपयांची थकबाकी आहे. या बिलामध्ये पाण्याचे बिल, वाढीव कोटा आणि डीपीसीचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४ कोटी ८४ लाख २३ हजार चाणजे ग्रामपंचायतीकडे आहेत. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष (चिरनेर कनेक्शन) २ कोटी ७२ लाख ५ हजार ४९ रुपये थकबाकी असून हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २ कोटी १८ लाख ४१ हजार ४९४ रुपयांच्या थकबाकीमुळे ग्रामपंचायत फुंडे तिसºया तर २ कोटी १७ लाख ७१ हजार ५७७ रुपयांची थकबाकी असलेली नवीन शेवा ग्रामपंचायत चौथ्या क्रमांकावर आहे.या थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये नवीन शेवा २ कोटी१७ लाख ७१ हजार ५७७ रु., हनुमान कोळीवाडा २७ लाख ८३ हजार ३३५, करळ ५८ लाख ७२ हजार ३८९, धुतुम ८२ लाख ४५ हजार ९६६, जसखार ९९ लाख ५१ हजार १७३, बोकडवीरा १ कोटी ५४ लाख ४९ हजार ५९, फुंडे २ कोटी १८ लाख ४१ हजार ४९४, सावरखार २९ लाख ५५ हजार ८८२, डोंगरी ३७ लाख १२ हजार ३८, सोनारी ६६ लाख ४० हजार ५४९, नागाव ९२ लाख ६७७, चाणजे ४ कोटी ८४ लाख २३ हजार ७४९, चिर्ले १ कोटी ५१ लाख १७ हजार ००२, केगाव १ कोटी ४४ लाख ८५ हजार ४६९, म्हातवली ६८ लाख ७५ हजार ८३८, ग्रामविकास मंडळ तेलीपाडा २ लाख १९ हजार ३९४ आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.अशा २४ ग्रामपंचायतींकडे २५ कोटी ५९ लाख ९९८ रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे आठ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा एमआयडीसीने खंडित केला आहे. अशा ग्रामपंचायतींना सध्या सिडकोमार्फत हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी दिली.उरण नगर परिषदेला पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीकडून तीन कनेक्शन देण्यात आली आहेत. कनेक्शन नं. १-१२ कोटी ६३ लाख १० हजार ५४४, कनेक्शन नं.३-८४ लाख १४ हजार ७६० तर कनेक्शन नं.७९- १ कोटी ६० लाख ७२ हजार ६९४ अशा या तिन्ही कनेक्शनपोटी १५ कोटी ७ लाख ९७ हजार ९९८ अशी थकबाकी आहे. पाणी बिलाची रक्कम टप्प्याटप्प्याने एमआयडीसीकडे भरणा केला जात असल्याची माहिती उरण नगरपालिका मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.यापैकी अनेक ग्रामपंचायती आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सधन समजल्या जात आहेत. अशा ग्रामपंचायती पाणीपट्टीची रक्कमही नियमितपणे वसूल करतात. मात्र एमआयडीसीकडून सातत्याने होणारा अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाण्याची थकीत बिले तरी भरावी कशी अशी विचारणा काही ग्रामपंचायतींकडून करण्यात येतआहे. मात्र ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी केला आहे.खंडित नळ जोडण्यारायगड जिल्हा परिषद अध्यक्ष (चिरनेर कनेक्शन) २ कोटी ७२ लाख ५ हजार ४९, मुख्यकार्यकारी अधिकारी रायगड (खोपटा कनेक्शन ) ६ लाख ४७ हजार ४४४, ग्रामपंचायत दिघोडे १ कोटी २७ लाख ७२ हजार २७२, दादरपाडा १७ लाख ६३ हजार ९१२, वेश्वी १ कोटी ९ लाख ९१ हजार९०४, रांजणपाडा ४ लाख ४६ हजार १११, नवघर २० लाख ६६ हजार ७७, पागोटे ६ लाख २४ हजार ६२३ आदींचा समावेश आहे. .थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना नोटीसाही पाठवण्यात येतात. तसेच थकबाकीदार ग्रामपंचायतींची माहीती गटविकास अधिकार्यांनाही नियमितपणे दिली जाते.त्याचबरोबर विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतीला देण्यात येणाºया शासकीय निधीतून पाणी बिलाची रक्कम भरण्याबाबतही गटविकास अधिकाऱ्यांना कळविण्यात येते .त्याची दखल घेऊन गटविकास कार्यालयाकडून काही वेळा ग्रामपंचायतींना मिळणाºया शासकीय निधीतून पाणी थकबाकीची रक्कम अदा केली जाते. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यावधीच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होत आहे.- आर.डी.बिरंजे, अभियंता

 

टॅग्स :Waterपाणी