शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

उरणमध्ये पाणी बिलाची ४० कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:22 IST

उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

- मधुकर ठाकूरउरण : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी मार्च महिन्याअखेरपर्यंत २५ कोटी ५९ लाख ९९८ तर उरण नगरपरिषदेकडे १५ कोटी ७ लाख ९७ हजार ९९८ रुपये अशी एकूण एमआयडीसीची ४० कोटी ८ लाख ५७ हजार ९८१ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी दिली.उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची बिले भरण्यास मात्र दिरंगाई केली जात आहे. ३१ मार्च २०१९ अखेरपर्यंत २४ ग्रामपंचायतींकडे २५ कोटी ५९ लाख ९९८ रुपयांची थकबाकी आहे. या बिलामध्ये पाण्याचे बिल, वाढीव कोटा आणि डीपीसीचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४ कोटी ८४ लाख २३ हजार चाणजे ग्रामपंचायतीकडे आहेत. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष (चिरनेर कनेक्शन) २ कोटी ७२ लाख ५ हजार ४९ रुपये थकबाकी असून हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २ कोटी १८ लाख ४१ हजार ४९४ रुपयांच्या थकबाकीमुळे ग्रामपंचायत फुंडे तिसºया तर २ कोटी १७ लाख ७१ हजार ५७७ रुपयांची थकबाकी असलेली नवीन शेवा ग्रामपंचायत चौथ्या क्रमांकावर आहे.या थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये नवीन शेवा २ कोटी१७ लाख ७१ हजार ५७७ रु., हनुमान कोळीवाडा २७ लाख ८३ हजार ३३५, करळ ५८ लाख ७२ हजार ३८९, धुतुम ८२ लाख ४५ हजार ९६६, जसखार ९९ लाख ५१ हजार १७३, बोकडवीरा १ कोटी ५४ लाख ४९ हजार ५९, फुंडे २ कोटी १८ लाख ४१ हजार ४९४, सावरखार २९ लाख ५५ हजार ८८२, डोंगरी ३७ लाख १२ हजार ३८, सोनारी ६६ लाख ४० हजार ५४९, नागाव ९२ लाख ६७७, चाणजे ४ कोटी ८४ लाख २३ हजार ७४९, चिर्ले १ कोटी ५१ लाख १७ हजार ००२, केगाव १ कोटी ४४ लाख ८५ हजार ४६९, म्हातवली ६८ लाख ७५ हजार ८३८, ग्रामविकास मंडळ तेलीपाडा २ लाख १९ हजार ३९४ आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.अशा २४ ग्रामपंचायतींकडे २५ कोटी ५९ लाख ९९८ रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे आठ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा एमआयडीसीने खंडित केला आहे. अशा ग्रामपंचायतींना सध्या सिडकोमार्फत हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी दिली.उरण नगर परिषदेला पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीकडून तीन कनेक्शन देण्यात आली आहेत. कनेक्शन नं. १-१२ कोटी ६३ लाख १० हजार ५४४, कनेक्शन नं.३-८४ लाख १४ हजार ७६० तर कनेक्शन नं.७९- १ कोटी ६० लाख ७२ हजार ६९४ अशा या तिन्ही कनेक्शनपोटी १५ कोटी ७ लाख ९७ हजार ९९८ अशी थकबाकी आहे. पाणी बिलाची रक्कम टप्प्याटप्प्याने एमआयडीसीकडे भरणा केला जात असल्याची माहिती उरण नगरपालिका मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.यापैकी अनेक ग्रामपंचायती आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सधन समजल्या जात आहेत. अशा ग्रामपंचायती पाणीपट्टीची रक्कमही नियमितपणे वसूल करतात. मात्र एमआयडीसीकडून सातत्याने होणारा अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाण्याची थकीत बिले तरी भरावी कशी अशी विचारणा काही ग्रामपंचायतींकडून करण्यात येतआहे. मात्र ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी.बिरंजे यांनी केला आहे.खंडित नळ जोडण्यारायगड जिल्हा परिषद अध्यक्ष (चिरनेर कनेक्शन) २ कोटी ७२ लाख ५ हजार ४९, मुख्यकार्यकारी अधिकारी रायगड (खोपटा कनेक्शन ) ६ लाख ४७ हजार ४४४, ग्रामपंचायत दिघोडे १ कोटी २७ लाख ७२ हजार २७२, दादरपाडा १७ लाख ६३ हजार ९१२, वेश्वी १ कोटी ९ लाख ९१ हजार९०४, रांजणपाडा ४ लाख ४६ हजार १११, नवघर २० लाख ६६ हजार ७७, पागोटे ६ लाख २४ हजार ६२३ आदींचा समावेश आहे. .थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना नोटीसाही पाठवण्यात येतात. तसेच थकबाकीदार ग्रामपंचायतींची माहीती गटविकास अधिकार्यांनाही नियमितपणे दिली जाते.त्याचबरोबर विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतीला देण्यात येणाºया शासकीय निधीतून पाणी बिलाची रक्कम भरण्याबाबतही गटविकास अधिकाऱ्यांना कळविण्यात येते .त्याची दखल घेऊन गटविकास कार्यालयाकडून काही वेळा ग्रामपंचायतींना मिळणाºया शासकीय निधीतून पाणी थकबाकीची रक्कम अदा केली जाते. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यावधीच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होत आहे.- आर.डी.बिरंजे, अभियंता

 

टॅग्स :Waterपाणी