शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

३७५ वाहनचालकांवर कारवाई

By admin | Updated: November 3, 2015 00:48 IST

विविध महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. छोट्या मोठ्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. बेदरकारपणे वाहने चालवणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यानेच

मोहोपाडा: विविध महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. छोट्या मोठ्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. बेदरकारपणे वाहने चालवणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यानेच अपघात होत आहेत. यामुळे रसायनी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विनापरवाना व धूम स्टाईलने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने बेदरकारपणे वाहनचालकांना जरब बसली आहे. रसायनी वाहतूक पोलिसांनी महिन्याभरात ३७५ जणांवर कारवाई करीत ४०,८०० रु पयांची दंडवसुली केली असल्याचे वाहतूक पोलीस नाईक संदीप पाटील यांनी सांगितले.वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे टाळावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, रात्रीच्या वेळी वाहन थांबविताना पार्किंग लाइट लावणे आवश्यक आहे, नो पार्किंग क्षेत्रांत वाहने थांबवू नयेत, धोकादायक ओव्हरटेक करू नये, अवैध वाहतूक केल्यास व अतिवेगाने वाहन चालविल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिला. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन रसायनी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक संदीप पाटील यांनी केले आहे.रसायनी वाहतूक शाखेच्या प्रयत्नाने अतिवेगात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करून तसेच दंडात्मक कारवाई करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करीत आहेत. यावेळी दोनपेक्षा जास्त व्यक्ती दुचाकीवर बसणे, नंबर प्लेट नसणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली. या कारवाईत वाहन चालक विद्यार्थ्यांच्या गाडी चालविण्यास पालकच जबाबदार असल्याचे दिसून आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.महिन्याभरापासून सुरु असेल्या कारवाईत जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पीआय मनोज शिंदे व रसायनी पोलीस ठाण्याचे पीआय राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप पाटील, सहा.फौजदार रायसिंग वसावे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश म्हात्रे, राजेश दळवी यांचा सहभाग होता. (वार्ताहर)