शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

३७५ वाहनचालकांवर कारवाई

By admin | Updated: November 3, 2015 00:48 IST

विविध महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. छोट्या मोठ्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. बेदरकारपणे वाहने चालवणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यानेच

मोहोपाडा: विविध महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. छोट्या मोठ्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. बेदरकारपणे वाहने चालवणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यानेच अपघात होत आहेत. यामुळे रसायनी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विनापरवाना व धूम स्टाईलने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने बेदरकारपणे वाहनचालकांना जरब बसली आहे. रसायनी वाहतूक पोलिसांनी महिन्याभरात ३७५ जणांवर कारवाई करीत ४०,८०० रु पयांची दंडवसुली केली असल्याचे वाहतूक पोलीस नाईक संदीप पाटील यांनी सांगितले.वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे टाळावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, रात्रीच्या वेळी वाहन थांबविताना पार्किंग लाइट लावणे आवश्यक आहे, नो पार्किंग क्षेत्रांत वाहने थांबवू नयेत, धोकादायक ओव्हरटेक करू नये, अवैध वाहतूक केल्यास व अतिवेगाने वाहन चालविल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिला. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन रसायनी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक संदीप पाटील यांनी केले आहे.रसायनी वाहतूक शाखेच्या प्रयत्नाने अतिवेगात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करून तसेच दंडात्मक कारवाई करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करीत आहेत. यावेळी दोनपेक्षा जास्त व्यक्ती दुचाकीवर बसणे, नंबर प्लेट नसणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली. या कारवाईत वाहन चालक विद्यार्थ्यांच्या गाडी चालविण्यास पालकच जबाबदार असल्याचे दिसून आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.महिन्याभरापासून सुरु असेल्या कारवाईत जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पीआय मनोज शिंदे व रसायनी पोलीस ठाण्याचे पीआय राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप पाटील, सहा.फौजदार रायसिंग वसावे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश म्हात्रे, राजेश दळवी यांचा सहभाग होता. (वार्ताहर)