शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

महाडमध्ये ३७ अंगणवाड्यांना फटका; चक्रीवादळाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:38 IST

अंदाजे ४० लाखांच्या निधीची आवश्यकता

- सिकंदर अनवारेदासगाव : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका शासकीय अंगणवाड्यांनाही बसला असून महाड तालुक्यातील ३७ अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे. या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव एकात्मिक बालविकास विभागाकडून पाठवण्यात आले आहेत.संपूर्ण कोकणात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. नैसर्गिक हानीबरोबर घरांचे आणि शासकीय इमारतींचेदेखील नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील एकात्मिक बालविकास विभागाच्या अंगणवाड्यांनाही फटका बसला असून तालुक्यातील जवळपास ३७ अंगणवाड्यांचे छप्पर आणि भिंती कोसळल्या आहेत. यामुळे अंगणवाड्यांतील शैक्षणिक आणि सकस आहाराचेही नुकसान झाले आहे. या अंगणवाड्या गावाच्या शेजारी किंवा गावात असल्याने वाऱ्याच्या वेगाने छप्पर उडून गेले आहेत. या अंगणवाड्या सध्या बंद आहेत. मात्र भविष्यात अंगणवाड्या सुरू झाल्या तर बालकांना कुठे बसवायचे, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे. महाडमधील चिंभावे मोहल्ला, आचलोळी, पुनाडे, कोंडराण, वाघोली, वरांडोली, कोंझर, तळोशी, आढी, रावतली, आंबवडे, नाते बौद्धवाडी, वहूर उगवतवाडी, विन्हेरे पारदुलेवाडी, केंबुर्ली, बिजघर, वालसुरे, वाघेरी, शिरसवने, शेंदूरमलई, ताम्हाणे, वसाप, उगवतकोंड, पांगारी, कुंभार्डे आदिवासी वाडी, घावरेकोंड, बेबलघर, कोथुर्डे, कोथुर्डे सोंडेवाडी, चापगाव, निजामपूर, सोनघर, वीर टेंबेवाडी, वीर गोठलवाडी, वीर, कोथुर्डे सोनारवाडी, नांदगाव बु. या गावांतील अंगणवाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती महाड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी दिली.इमारतीच्या दुरुस्तीसाठी पाठवला प्रस्तावमहाड तालुक्यातील अनेक अंगणवाड्या यापूर्वीच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय काही गावांत स्वत:च्या इमारती नसल्याने गावातील सार्वजनिक किंवा खासगी इमारतीमध्ये अंगणवाड्या सुरू आहेत.नवीन इमारती मिळाव्या म्हणून प्रस्ताव खितपत पडून असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अवकृपा दाखवत अंगणवाड्यांचेदेखील नुकसान केले आहे. अंगणवाड्या दुरुस्त करण्याबाबत पंचनामे करून जवळपास ४० लाखांचा निधी आवश्यक आहे.याबाबतचा प्रस्तावही जिल्हा एकात्मिक बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र राज्यातील एकूण स्थिती आणि कोकणातील नुकसान पाहता या नुकसानग्रस्त अंगणवाड्यांना कधी निधी मिळेल हा एक प्रश्नच आहे.मात्र भविष्यात बालकांना अंगणवाडीविना बसावे लागणार असे चिन्ह निर्माण झाले आहे. महाड तालुक्यात ३७ अंगणवाड्या निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त झाल्या असून दुरुस्तीबाबत जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी सांगितले