शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

महाडमध्ये ३७ अंगणवाड्यांना फटका; चक्रीवादळाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:38 IST

अंदाजे ४० लाखांच्या निधीची आवश्यकता

- सिकंदर अनवारेदासगाव : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका शासकीय अंगणवाड्यांनाही बसला असून महाड तालुक्यातील ३७ अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे. या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव एकात्मिक बालविकास विभागाकडून पाठवण्यात आले आहेत.संपूर्ण कोकणात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. नैसर्गिक हानीबरोबर घरांचे आणि शासकीय इमारतींचेदेखील नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील एकात्मिक बालविकास विभागाच्या अंगणवाड्यांनाही फटका बसला असून तालुक्यातील जवळपास ३७ अंगणवाड्यांचे छप्पर आणि भिंती कोसळल्या आहेत. यामुळे अंगणवाड्यांतील शैक्षणिक आणि सकस आहाराचेही नुकसान झाले आहे. या अंगणवाड्या गावाच्या शेजारी किंवा गावात असल्याने वाऱ्याच्या वेगाने छप्पर उडून गेले आहेत. या अंगणवाड्या सध्या बंद आहेत. मात्र भविष्यात अंगणवाड्या सुरू झाल्या तर बालकांना कुठे बसवायचे, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे. महाडमधील चिंभावे मोहल्ला, आचलोळी, पुनाडे, कोंडराण, वाघोली, वरांडोली, कोंझर, तळोशी, आढी, रावतली, आंबवडे, नाते बौद्धवाडी, वहूर उगवतवाडी, विन्हेरे पारदुलेवाडी, केंबुर्ली, बिजघर, वालसुरे, वाघेरी, शिरसवने, शेंदूरमलई, ताम्हाणे, वसाप, उगवतकोंड, पांगारी, कुंभार्डे आदिवासी वाडी, घावरेकोंड, बेबलघर, कोथुर्डे, कोथुर्डे सोंडेवाडी, चापगाव, निजामपूर, सोनघर, वीर टेंबेवाडी, वीर गोठलवाडी, वीर, कोथुर्डे सोनारवाडी, नांदगाव बु. या गावांतील अंगणवाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती महाड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी दिली.इमारतीच्या दुरुस्तीसाठी पाठवला प्रस्तावमहाड तालुक्यातील अनेक अंगणवाड्या यापूर्वीच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय काही गावांत स्वत:च्या इमारती नसल्याने गावातील सार्वजनिक किंवा खासगी इमारतीमध्ये अंगणवाड्या सुरू आहेत.नवीन इमारती मिळाव्या म्हणून प्रस्ताव खितपत पडून असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अवकृपा दाखवत अंगणवाड्यांचेदेखील नुकसान केले आहे. अंगणवाड्या दुरुस्त करण्याबाबत पंचनामे करून जवळपास ४० लाखांचा निधी आवश्यक आहे.याबाबतचा प्रस्तावही जिल्हा एकात्मिक बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र राज्यातील एकूण स्थिती आणि कोकणातील नुकसान पाहता या नुकसानग्रस्त अंगणवाड्यांना कधी निधी मिळेल हा एक प्रश्नच आहे.मात्र भविष्यात बालकांना अंगणवाडीविना बसावे लागणार असे चिन्ह निर्माण झाले आहे. महाड तालुक्यात ३७ अंगणवाड्या निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त झाल्या असून दुरुस्तीबाबत जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी सांगितले