शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

महाडमध्ये ३७ अंगणवाड्यांना फटका; चक्रीवादळाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:38 IST

अंदाजे ४० लाखांच्या निधीची आवश्यकता

- सिकंदर अनवारेदासगाव : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका शासकीय अंगणवाड्यांनाही बसला असून महाड तालुक्यातील ३७ अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे. या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव एकात्मिक बालविकास विभागाकडून पाठवण्यात आले आहेत.संपूर्ण कोकणात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. नैसर्गिक हानीबरोबर घरांचे आणि शासकीय इमारतींचेदेखील नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील एकात्मिक बालविकास विभागाच्या अंगणवाड्यांनाही फटका बसला असून तालुक्यातील जवळपास ३७ अंगणवाड्यांचे छप्पर आणि भिंती कोसळल्या आहेत. यामुळे अंगणवाड्यांतील शैक्षणिक आणि सकस आहाराचेही नुकसान झाले आहे. या अंगणवाड्या गावाच्या शेजारी किंवा गावात असल्याने वाऱ्याच्या वेगाने छप्पर उडून गेले आहेत. या अंगणवाड्या सध्या बंद आहेत. मात्र भविष्यात अंगणवाड्या सुरू झाल्या तर बालकांना कुठे बसवायचे, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे. महाडमधील चिंभावे मोहल्ला, आचलोळी, पुनाडे, कोंडराण, वाघोली, वरांडोली, कोंझर, तळोशी, आढी, रावतली, आंबवडे, नाते बौद्धवाडी, वहूर उगवतवाडी, विन्हेरे पारदुलेवाडी, केंबुर्ली, बिजघर, वालसुरे, वाघेरी, शिरसवने, शेंदूरमलई, ताम्हाणे, वसाप, उगवतकोंड, पांगारी, कुंभार्डे आदिवासी वाडी, घावरेकोंड, बेबलघर, कोथुर्डे, कोथुर्डे सोंडेवाडी, चापगाव, निजामपूर, सोनघर, वीर टेंबेवाडी, वीर गोठलवाडी, वीर, कोथुर्डे सोनारवाडी, नांदगाव बु. या गावांतील अंगणवाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती महाड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी दिली.इमारतीच्या दुरुस्तीसाठी पाठवला प्रस्तावमहाड तालुक्यातील अनेक अंगणवाड्या यापूर्वीच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय काही गावांत स्वत:च्या इमारती नसल्याने गावातील सार्वजनिक किंवा खासगी इमारतीमध्ये अंगणवाड्या सुरू आहेत.नवीन इमारती मिळाव्या म्हणून प्रस्ताव खितपत पडून असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अवकृपा दाखवत अंगणवाड्यांचेदेखील नुकसान केले आहे. अंगणवाड्या दुरुस्त करण्याबाबत पंचनामे करून जवळपास ४० लाखांचा निधी आवश्यक आहे.याबाबतचा प्रस्तावही जिल्हा एकात्मिक बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र राज्यातील एकूण स्थिती आणि कोकणातील नुकसान पाहता या नुकसानग्रस्त अंगणवाड्यांना कधी निधी मिळेल हा एक प्रश्नच आहे.मात्र भविष्यात बालकांना अंगणवाडीविना बसावे लागणार असे चिन्ह निर्माण झाले आहे. महाड तालुक्यात ३७ अंगणवाड्या निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त झाल्या असून दुरुस्तीबाबत जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी सांगितले