शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात ३२४ प्रकरणे निकाली

By admin | Updated: February 16, 2017 02:09 IST

राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवारी येथील रायगड

अलिबाग : राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवारी येथील रायगड जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३२४ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये एकूण ५ कोटी ३ लाख २५ हजार ७१ रुपयांची नुकसानभरपाई मान्य करण्यात आली आहे. लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील विविध न्यायालयातील एकूण २ हजार ७९ प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३२४ प्रकरणे निकाली निघाली. बँकांची ४ हजार ३७५ वादपूर्व प्रकरणे तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. त्यापैकी १७३ प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये ३१ लाख ७ हजार ७९२ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. कामकाज सुरू असताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगडचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर यांनी प्रत्येक कक्षावर भेट देऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले.रायगड जिल्हा न्यायालय आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या वेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगडचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर, जिल्हा न्यायाधीश-१ के. आर. पेटकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एल. डी. हुली, रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, सचिव अ‍ॅड. ए. डी. पाटील, न्यायिक अधिकारी, मेट्रो सेंटर पनवेलचे भूसंपादन अधिकारी तसेच वकील वर्ग व बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(विशेष प्रतिनिधी)