शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

वर्षभरामध्ये अत्याचाराच्या ३२० घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 23:54 IST

महिलांच्या सुरक्षिततेबाबत समाजामध्ये कशी जागरूकता आली आहे. यासाठी समाजमाध्यमांचे दाखलेही दिले जातात;

- आविष्कार देसाईअलिबाग : महिलांच्या सुरक्षिततेबाबत समाजामध्ये कशी जागरूकता आली आहे. यासाठी समाजमाध्यमांचे दाखलेही दिले जातात; परंतु आजही महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसावी, अशी सुदृढ परिस्थिती सरकार, प्रशासन आणि समाज निर्माण करू शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरामध्ये तब्बल ३२० महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने १२७ विनयभंगाच्या, तर ६४ लैंगिक छळाच्या घटनांचा समावेश असल्याचे दिसून येते.रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला, मुलींचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये तब्बल ३२० घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवून अपहरण अथवा पळवून नेणे, अशा घटनांमध्ये प्रामुख्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातील जमेची बाजू म्हणजे ३२० पैकी २७२ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरणाबरोबरच शहरीकरणामध्ये वाढ होत आहे. समाजामधीलच काही घटक अपप्रवृत्ती करण्याकडे वळत आहेत. महिलांना न्याय मिळावा, त्यांना समाजामध्ये बरोबरीचे स्थान मिळावे, यासाठी समाजसुधारकांनी विविध ट्रेंड समाजामध्ये रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या बाजूने विविध कायदेही निर्माण करण्यात आले आहेत. महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून आजही पाहिले जात आहे. महिलांच्या बाबतीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांकडे पाहिल्यावर गुन्हेगारांचे ‘मोटिव्ह’ हे महिलांकडून पैसा आणि महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून पाहणे हेच असल्याचे सहज दिसून येते. यावर उपाययोजना म्हणून समाजातील अपप्रवृत्तीची मानसिकता बदलताना महिलांनीही आता सक्षम होण्याची गरज आहे, असे रिसर्स सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट या संस्थेचे प्रमुख डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले.महिलांवरील अत्याचाराबाबत पोलीस यंत्रणाही सक्षम झाली आहे. अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर महिला आधी तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या. मात्र, निर्भयासारख्या घटनांनंतर महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. महिलांनी अन्याय सहन करू नये, त्यांना कायद्याचे संरक्षण आहे. त्यामुळे तक्रारी नोंदवण्यासाठी विविध पर्यायाचा वापर करावा, अन्याय सहन न करता गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले.>महिलांना तक्रार देताना संकोच वाटू नये म्हणून महिला पोलीसमहिलांना अत्याचाराबाबतची तक्रार देताना संकोच वाटतो, यासाठी पोलीस दलामध्ये महिला अधिकारी अथवा महिला पोलीस शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अत्याचार झालेल्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी ही महिला पोलीस अधिकारी यांच्यावरच सोपवण्यात आली आहे. जेणेकरून तपासामध्ये संवेदनशीलता टिकून राहील.महिलांना तक्रार करण्यासाठी विविध पर्याय खुले आहेत. थेट पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस महासंचालकांकडे थेट आॅनलाइन तक्रार करू शकतात. याची जबाबदारी संबंधित पोलीस अधीक्षक यांच्यावर असते आणि त्याचे मॉनेटरिंग हे पोलीस महासंचालक करतात. नोकरी / कॉर्पोरेट सेक्टरमधील महिलांसाठी राज्यामध्ये ‘बडी अ‍ॅप’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामध्ये व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात येतो. या अ‍ॅपचा वापर करून अत्याचार झालेल्या महिला तक्रार नोंदवू शकतात, त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा करणे सोपे जाते.गेल्या वर्षभरात हुंड्यासाठी पती तसेच सासरच्या व्यक्तींकडून छळ केल्याच्या आठ तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. लग्नाचे आमिष दाखवून महिला, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना पळवून नेण्याच्या ९३ तक्र ारी केल्या आहेत. जिल्ह्यात मागील वर्षभरात १२७ विनयभंगाच्या तर ६४ लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.