शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

३०० सफाई कामगारांवर संक्रांत

By admin | Updated: April 11, 2016 01:23 IST

पालिकेत सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार सफाईचे काम करतात. यापैकी ३५० कामगारांना कामावरुन कमी करण्याचा ठराव १९ मार्चच्या महासभेत मंजूर झाला आहे.

भार्इंदर : पालिकेत सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार सफाईचे काम करतात. यापैकी ३५० कामगारांना कामावरुन कमी करण्याचा ठराव १९ मार्चच्या महासभेत मंजूर झाला आहे. त्यानुसार बुधवारी वृक्ष प्राधिकरणातील ५० कामगारांना कामावरून काढले. तर उर्वरित ३०० सफाई कामगारांना पुढील आठवड्यात कमी करण्यात येणार आहे. आस्थापनेवरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला.आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार प्रभाग समितीनुसार कामगारांना कमी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने २८ नोव्हेंबर २०१५ मध्ये काढलेल्या किमान वेतन आदेशानुसार प्रशासनाकडे श्रमजीवी संघटनेने किमान वेतनासाठी पाठपुरावा सुरू केला होता. कामगारांची मागण्यांवर प्रशासन केवळ आश्वासने देत असल्याचे पाहून संतापलेल्या कामगारांनी आंदोलने छेडले. वेतनाच्या निर्णयासाठी तत्कालिन महासभेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापन करण्यास मान्यता दिली. सरकारी आदेश असतानाही प्रशासन वेळकाढूपणा करत असल्यामुळे अखेर कामगारांनी सफाईचे काम थांबविले. किमान वेतन देण्याचा निर्णय होत असतानाही कामगारांनी शहराला वेठीस धरल्याचा राग सत्ताधाऱ्यांच्या मनात खदखदत होता. अखेर तो १९ मार्चच्या महासभेत उफाळून आला. सत्ताधाऱ्यांनी आस्थापनेवरील खर्च कमी करण्यासाठी ३५० कंत्राटी सफाई कामगारांनाच कमी करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार आयुक्तांनी पाच एप्रिलला आदेश काढून सुरुवातीला वृक्ष प्राधिकरण विभागातील ५० कंत्राटी कामगारांना कमी करण्यात आले. त्यानंतर प्रभाग समितीनुसार ३०० कामगारांना पुढील आठवड्यात कमी करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. यात प्रभाग समिती एकमधील ७७, दोनमधील ७८, तीनमधील ९२ व चारमधील ५३ कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. हे सर्व कामगार विविध कामगार संघटनेचे सदस्य असून नेमक्या कोणत्या कामगारांना कमी करणार, याबाबत कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)