शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

३०० सफाई कामगारांवर संक्रांत

By admin | Updated: April 11, 2016 01:23 IST

पालिकेत सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार सफाईचे काम करतात. यापैकी ३५० कामगारांना कामावरुन कमी करण्याचा ठराव १९ मार्चच्या महासभेत मंजूर झाला आहे.

भार्इंदर : पालिकेत सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार सफाईचे काम करतात. यापैकी ३५० कामगारांना कामावरुन कमी करण्याचा ठराव १९ मार्चच्या महासभेत मंजूर झाला आहे. त्यानुसार बुधवारी वृक्ष प्राधिकरणातील ५० कामगारांना कामावरून काढले. तर उर्वरित ३०० सफाई कामगारांना पुढील आठवड्यात कमी करण्यात येणार आहे. आस्थापनेवरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला.आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार प्रभाग समितीनुसार कामगारांना कमी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने २८ नोव्हेंबर २०१५ मध्ये काढलेल्या किमान वेतन आदेशानुसार प्रशासनाकडे श्रमजीवी संघटनेने किमान वेतनासाठी पाठपुरावा सुरू केला होता. कामगारांची मागण्यांवर प्रशासन केवळ आश्वासने देत असल्याचे पाहून संतापलेल्या कामगारांनी आंदोलने छेडले. वेतनाच्या निर्णयासाठी तत्कालिन महासभेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापन करण्यास मान्यता दिली. सरकारी आदेश असतानाही प्रशासन वेळकाढूपणा करत असल्यामुळे अखेर कामगारांनी सफाईचे काम थांबविले. किमान वेतन देण्याचा निर्णय होत असतानाही कामगारांनी शहराला वेठीस धरल्याचा राग सत्ताधाऱ्यांच्या मनात खदखदत होता. अखेर तो १९ मार्चच्या महासभेत उफाळून आला. सत्ताधाऱ्यांनी आस्थापनेवरील खर्च कमी करण्यासाठी ३५० कंत्राटी सफाई कामगारांनाच कमी करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार आयुक्तांनी पाच एप्रिलला आदेश काढून सुरुवातीला वृक्ष प्राधिकरण विभागातील ५० कंत्राटी कामगारांना कमी करण्यात आले. त्यानंतर प्रभाग समितीनुसार ३०० कामगारांना पुढील आठवड्यात कमी करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. यात प्रभाग समिती एकमधील ७७, दोनमधील ७८, तीनमधील ९२ व चारमधील ५३ कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. हे सर्व कामगार विविध कामगार संघटनेचे सदस्य असून नेमक्या कोणत्या कामगारांना कमी करणार, याबाबत कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)