शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

३०० सफाई कामगारांवर संक्रांत

By admin | Updated: April 11, 2016 01:23 IST

पालिकेत सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार सफाईचे काम करतात. यापैकी ३५० कामगारांना कामावरुन कमी करण्याचा ठराव १९ मार्चच्या महासभेत मंजूर झाला आहे.

भार्इंदर : पालिकेत सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार सफाईचे काम करतात. यापैकी ३५० कामगारांना कामावरुन कमी करण्याचा ठराव १९ मार्चच्या महासभेत मंजूर झाला आहे. त्यानुसार बुधवारी वृक्ष प्राधिकरणातील ५० कामगारांना कामावरून काढले. तर उर्वरित ३०० सफाई कामगारांना पुढील आठवड्यात कमी करण्यात येणार आहे. आस्थापनेवरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला.आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार प्रभाग समितीनुसार कामगारांना कमी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने २८ नोव्हेंबर २०१५ मध्ये काढलेल्या किमान वेतन आदेशानुसार प्रशासनाकडे श्रमजीवी संघटनेने किमान वेतनासाठी पाठपुरावा सुरू केला होता. कामगारांची मागण्यांवर प्रशासन केवळ आश्वासने देत असल्याचे पाहून संतापलेल्या कामगारांनी आंदोलने छेडले. वेतनाच्या निर्णयासाठी तत्कालिन महासभेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापन करण्यास मान्यता दिली. सरकारी आदेश असतानाही प्रशासन वेळकाढूपणा करत असल्यामुळे अखेर कामगारांनी सफाईचे काम थांबविले. किमान वेतन देण्याचा निर्णय होत असतानाही कामगारांनी शहराला वेठीस धरल्याचा राग सत्ताधाऱ्यांच्या मनात खदखदत होता. अखेर तो १९ मार्चच्या महासभेत उफाळून आला. सत्ताधाऱ्यांनी आस्थापनेवरील खर्च कमी करण्यासाठी ३५० कंत्राटी सफाई कामगारांनाच कमी करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार आयुक्तांनी पाच एप्रिलला आदेश काढून सुरुवातीला वृक्ष प्राधिकरण विभागातील ५० कंत्राटी कामगारांना कमी करण्यात आले. त्यानंतर प्रभाग समितीनुसार ३०० कामगारांना पुढील आठवड्यात कमी करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. यात प्रभाग समिती एकमधील ७७, दोनमधील ७८, तीनमधील ९२ व चारमधील ५३ कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. हे सर्व कामगार विविध कामगार संघटनेचे सदस्य असून नेमक्या कोणत्या कामगारांना कमी करणार, याबाबत कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)