शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:06 IST

पेणच्या वाशी व वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ३० कोटी खर्चाच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

पेण : पेणच्या वाशी व वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ३० कोटी खर्चाच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झाला. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे अभियंता एस. एस. जोशी, डोईफोडे, महाकाळे या वेळी उपस्थित होते.संबंधित कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या कामगार टीमने संबंधित कामास प्रारंभ क रताच शेकापचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, झेडपी सदस्य, सरपंच व उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून जोरदार घोषणाबाजी केली. ‘क ोण म्हणतोय पाणी आणणार नाय, आणल्याशिवाय राहणार नाय’ ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ या घोषणेमुळे नवीन वर्षारंभी या पाणीपुरवठा योजनेतील श्रेयवादाची जोरदार लढाई सुरू झाली असून, निवडणूक वर्षात या श्रेयवादाचे राजकीय नाट्य चांगलेच राजकीय रंग भरणार आहे.पेणच्या हेटवण्याचे पाणी वाशी खारेपाटाला मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांत या पाण्यावरून अनेकदा राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. मात्र, या पाण्याचा राजकीय रंगात शेकापच नेहमी पुढे राहीला आहे. शेकापचा आ. विरोधी बाकावरचा असल्याने खारेपाटाला पाणी योजना राबविण्याकामी आंदोलने, मोर्चे या आयुधाद्वारे आ. धैर्यशील पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलने केली होती. यानंतर आ. धैर्यशील पाटील यांनी हेटवणे धरणाचे पाणी घेऊन पेण ते वर्षा मुख्यमंत्री निवास अशी वर्षावारी केली. त्या वेळी महाराष्टÑ दुष्काळाच्या छायेत होता. गमतीची बाब अशी की, पेणमध्ये हेटवणे धरणात मुबलक पाणी पडून असताना वितरण व्यवस्थेअभावी हे पाणी ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्याकामी एका मोठ्या निधीची आवश्यकता होती. ती वर्षावारी मुंबई मुख्यमंत्री निवासी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीए क्षेत्रात पेणचा समावेश असल्याने ३० कोटींचा निधी या योजनेसाठी मंजूर केला. त्या योजनेचे १० जुलै २०१८ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ई-भूमीपूजन केले.

टॅग्स :Raigadरायगड