शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सायकल चालवा पर्यावरण वाचवा संदेश देत तिघांनी केला ५७९ किमी प्रवास

By निखिल म्हात्रे | Updated: August 23, 2022 16:57 IST

सदरचा सायकल प्रवास त्यांनी अलिबाग पासून गोव्यापर्यंत सागरी महामार्गाच्या घाट रस्त्याने केला.

अलिबाग - स्वतंत्र भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अलिबाग सायकल क्लबच्या संतोष तावडे, समीर म्हात्रे व मकरंद नाईक या तीन सायकलस्वारानी 'सायकल चालवा आरोग्य मिळवा' तसेच 'सायकल चालवा पर्यावरण वाचवा' असा संदेश देत अलिबाग ते गोवा असा ५७९ किलोमीटरचा सायकल प्रवास नुकताच पूर्ण केला या सायकल अभियान त्यांनी अलिबाग ते केळशी, केळशी ते गुहागर, गुहागर ते पावस, पावस ते कुणकेश्वर व अंतिमतः कुणकेश्वर ते कलंगुट असा प्रवास करून सदर अभियान सफल केले.

सदरचा सायकल प्रवास त्यांनी अलिबाग पासून गोव्यापर्यंत सागरी महामार्गाच्या घाट रस्त्याने केला. प्रवास सहा दिवसात पूर्ण करताना ४३ तास सायकल चालवत ६५७७ मीटर इतकी उंची गाठली. सायकल अभियानाच्या सुरुवातीला पोद्दार सर यश बसवराज व मिलिंद पाटील यांनी मुरुड पर्यंत सायकल चालवत सोबत केली त्यानंतरचा प्रवास मदतीला कोणतेही वाहन न घेता स्वबळावर पूर्ण केला. प्रवासात खराब रस्त्यामुळे एका सायकलचा टायर फाटल्याने तसेच छोटासा अपघात होऊन देखील जिद्दीने आलेल्या अडचणीवर मात करत प्रवास पूर्ण केला.

या दोन्ही अडचणीत स्थानिक नागरिक आणि दापोली सायकल क्लबचे सदस्य यांनी मोलाची मदत केली. रत्नागिरी, पावस व वेंगुर्ला येथे माजी सैनिक संघटना व भाकर सामाजिक संस्था यांनी सायकल वीरांचे फटाके लाऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मागील वर्षी देखील जिल्हा प्रशासनाच्यावतीने माझी वसुंधरा व रायगड जोडो अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धना विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून ५५० किलोमीटरची रॅली काढण्यात आली होती.