शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सायकल चालवा पर्यावरण वाचवा संदेश देत तिघांनी केला ५७९ किमी प्रवास

By निखिल म्हात्रे | Updated: August 23, 2022 16:57 IST

सदरचा सायकल प्रवास त्यांनी अलिबाग पासून गोव्यापर्यंत सागरी महामार्गाच्या घाट रस्त्याने केला.

अलिबाग - स्वतंत्र भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अलिबाग सायकल क्लबच्या संतोष तावडे, समीर म्हात्रे व मकरंद नाईक या तीन सायकलस्वारानी 'सायकल चालवा आरोग्य मिळवा' तसेच 'सायकल चालवा पर्यावरण वाचवा' असा संदेश देत अलिबाग ते गोवा असा ५७९ किलोमीटरचा सायकल प्रवास नुकताच पूर्ण केला या सायकल अभियान त्यांनी अलिबाग ते केळशी, केळशी ते गुहागर, गुहागर ते पावस, पावस ते कुणकेश्वर व अंतिमतः कुणकेश्वर ते कलंगुट असा प्रवास करून सदर अभियान सफल केले.

सदरचा सायकल प्रवास त्यांनी अलिबाग पासून गोव्यापर्यंत सागरी महामार्गाच्या घाट रस्त्याने केला. प्रवास सहा दिवसात पूर्ण करताना ४३ तास सायकल चालवत ६५७७ मीटर इतकी उंची गाठली. सायकल अभियानाच्या सुरुवातीला पोद्दार सर यश बसवराज व मिलिंद पाटील यांनी मुरुड पर्यंत सायकल चालवत सोबत केली त्यानंतरचा प्रवास मदतीला कोणतेही वाहन न घेता स्वबळावर पूर्ण केला. प्रवासात खराब रस्त्यामुळे एका सायकलचा टायर फाटल्याने तसेच छोटासा अपघात होऊन देखील जिद्दीने आलेल्या अडचणीवर मात करत प्रवास पूर्ण केला.

या दोन्ही अडचणीत स्थानिक नागरिक आणि दापोली सायकल क्लबचे सदस्य यांनी मोलाची मदत केली. रत्नागिरी, पावस व वेंगुर्ला येथे माजी सैनिक संघटना व भाकर सामाजिक संस्था यांनी सायकल वीरांचे फटाके लाऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मागील वर्षी देखील जिल्हा प्रशासनाच्यावतीने माझी वसुंधरा व रायगड जोडो अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धना विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून ५५० किलोमीटरची रॅली काढण्यात आली होती.