शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

मालमत्ता तक्रार समस्या निवारण मोहिमेमध्ये ४२७ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:31 IST

मालमत्ताधारकांच्या वाढीव घरपट्टी आणि त्यातील तांत्रिक त्रुटींबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार समस्या निवारण मोहीम दहा दिवस राबविण्यात आली.

कर्जत : नगरपरिषदेच्या मालमत्ता करवसुली विभागातर्फे मालमत्ताधारकांच्या वाढीव घरपट्टी आणि त्यातील तांत्रिक त्रुटींबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार समस्या निवारण मोहीम दहा दिवस राबविण्यात आली. मालमत्ता तक्रार समस्या निवारण मोहिमेमध्ये ४२७ अर्ज दाखल झाले आहेत, त्यामध्ये १४१ मालमत्ताधारकांच्या घरपट्टीतील त्रुटी लगेच दूर करण्यात आल्या. या माध्यमातून नगरपरिषदेच्या तिजोरीत २० लाख ५३ हजार रुपयांचा कर जमा झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी दिली.नगरपरिषद हद्दीतील मालमत्ताधारकांना मालमत्ता विभागातर्फे आवाहन करण्यात आले होते. तसेच नगरपरिषद हद्दीत रिक्षा फिरून तसे आवाहनही करण्यात आले होते की, मालमत्तेसंबंधी काही त्रुटी किंवा बदल असल्यास त्या-त्या प्रभागातील मालमत्ताधारकांनी नियोजित ठरलेल्या दिवशी आपली तक्रार कागदपत्रांच्या पुराव्यासहित मालमत्ता तक्रार समस्या निवारण केंद्रावर घेऊन यावे.हे केंद्र नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर २५ डिसेंबर २०१९ ते ३ जानेवारी २०२० पर्यंत राबविण्यात आले, या दहा दिवसांत ४२७ अर्ज दाखल झाले आहेत, त्यामध्ये १४१ मालमत्ताधारकांच्या घरपट्टीतील त्रुटी लगेच दूर करण्यात आल्या. या माध्यमातून नगरपरिषदेच्या तिजोरीत २० लाख ५३ हजार रुपयांचा कर जमा झाला आहे.नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या संकल्पनेतून मालमत्ता तक्रार समस्या निराकारण मोहीम राबविण्यात आली. करविभागाचे अधीक्षक सुरेश खैरे यांच्यासह नरेंद्र गजभिये, सचिन सोनवणे, हृदयनाथ गायकवाड, संजय पाटील, प्रभाकर कोचुरे आणि पाणी विभागाचे अभियंता अशोक भालेराव यांनी संबंधित तक्रारीचे निरसनकेले.मालमत्ता हस्तांतर करण्याबाबत ८२ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ४० निकाली काढण्यात आले.भोगवटादार सदरी नाव कमी किंवा टाकणे, याबाबत ४१ अर्ज दाखल आहेत.मालमत्ताधारकांच्या पत्त्यात दुरुस्ती करणे याबाबत २६ अर्ज दाखल झाले होते, ते सर्वच्या सर्व निकाली लागले आहेत.चुकीची घरपट्टी लागल्याबाबत ८४ अर्ज दाखल झाले आहेत.मालमत्तेची विभागणी करणे व स्वतंत्र बिल मिळण्याबाबत २८ अर्ज दाखल झाले आहेत.नवीन मालमत्ता नोंद करण्याबाबत ३९ अर्ज दाखल झाले आहेत.अनधिकृत मालमत्ता शास्तीबाबत १२७ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ८५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.