शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

तपासणीशिवाय चालतात २६५ स्कूलबस"

By admin | Updated: June 20, 2017 06:13 IST

जिल्ह्यात एकूण ४८८ स्कूलबसेस आहेत. त्यापैकी २२३ स्कूलबसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी बसमालकांनी तपासणी करून घेतली आहे.

जयंत धुळप। लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यात एकूण ४८८ स्कूलबसेस आहेत. त्यापैकी २२३ स्कूलबसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी बसमालकांनी तपासणी करून घेतली आहे. मात्र, उर्वरित २६५ स्कूलबसेसची तपासणी त्यांच्या मालकांनी करून घेतलेली नाही. या २६५ स्कूलबसमालकांना ‘आपले स्कूलबस परवाने रद्द का करण्यात येऊ नयेत’ अशा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पेण उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी राजेंद्र सरक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणे व आणणे या कारणास्तव वाहतूकदारांना विद्यार्थी सुरक्षितता डोळ््यासमोर ठेवून ‘स्कूलबस’ विशेष परवाने परिवहन विभागाकडून देण्यात येतात. विद्यार्थी सुरक्षितता या स्कूलबसच्या माध्यमातून घेण्यात येते. यावर विश्वास ठेवून पालक मुलांना अशा स्कूलबसमधूनच शाळेत पाठवत असतात; परंतु प्रत्यक्षात स्कूलबसमालक बसची शाळा सुरू होण्यापूर्वी परिवहन विभागाकडून तपासणी करून घेत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. तब्बल २६५ स्कूलबसची परिवहन विभागाकडून तपासणी झालेली नाही. मात्र, या २६५ बसेसमधून विद्यार्थ्यांची ने-आण मात्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबसची तपासणी करून घेण्याच्या सूचना पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूलबसमालकांना देण्यात आल्या होत्या. शाळा सुरू होण्यापूर्वी ही तपासणी करून घेणे अनिवार्य होते. ज्या स्कूलबसमालकांनी आपल्या वाहनाची तपासणी अद्याप केलेली नाही, त्यांना त्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही या वाहनमालकांनी आपल्या स्कूलबसची तपासणी करून घेतली नाही, तर त्यांच्या वाहनाचा स्कूलबस परवाना निलंबित केला जाणार आहे.शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात घडू नये, याकरिता त्यांची योग्य ती तपासणी करण्यात यावी, या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गतवर्षापासून आरटीओकडून स्कूलबसची तपासणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. स्कूलबसच्या सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शाळांकडून नेमलेल्या अथवा खासगी स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुुरेशी काळजी घेतली जात नव्हती. चालकांच्या बेशिस्तीमुळेही अनेकदा अपघात घडत होते. अनेकदा नादुरुस्त अवस्थेतील वाहनेही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरली जात होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर गतवर्षी झालेल्या सुनावणीत स्कूलबससाठी तपासणी आवश्यक करण्यात आली होती. प्रतिवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूलबसमालकांनी आरटीओकडून ही तपासणी करून घ्यायची असल्याचे उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी राजेंद्र सरक यांनी स्पष्ट केले आहे.