शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

तपासणीशिवाय चालतात २६५ स्कूलबस"

By admin | Updated: June 20, 2017 06:13 IST

जिल्ह्यात एकूण ४८८ स्कूलबसेस आहेत. त्यापैकी २२३ स्कूलबसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी बसमालकांनी तपासणी करून घेतली आहे.

जयंत धुळप। लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यात एकूण ४८८ स्कूलबसेस आहेत. त्यापैकी २२३ स्कूलबसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी बसमालकांनी तपासणी करून घेतली आहे. मात्र, उर्वरित २६५ स्कूलबसेसची तपासणी त्यांच्या मालकांनी करून घेतलेली नाही. या २६५ स्कूलबसमालकांना ‘आपले स्कूलबस परवाने रद्द का करण्यात येऊ नयेत’ अशा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पेण उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी राजेंद्र सरक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणे व आणणे या कारणास्तव वाहतूकदारांना विद्यार्थी सुरक्षितता डोळ््यासमोर ठेवून ‘स्कूलबस’ विशेष परवाने परिवहन विभागाकडून देण्यात येतात. विद्यार्थी सुरक्षितता या स्कूलबसच्या माध्यमातून घेण्यात येते. यावर विश्वास ठेवून पालक मुलांना अशा स्कूलबसमधूनच शाळेत पाठवत असतात; परंतु प्रत्यक्षात स्कूलबसमालक बसची शाळा सुरू होण्यापूर्वी परिवहन विभागाकडून तपासणी करून घेत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. तब्बल २६५ स्कूलबसची परिवहन विभागाकडून तपासणी झालेली नाही. मात्र, या २६५ बसेसमधून विद्यार्थ्यांची ने-आण मात्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबसची तपासणी करून घेण्याच्या सूचना पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूलबसमालकांना देण्यात आल्या होत्या. शाळा सुरू होण्यापूर्वी ही तपासणी करून घेणे अनिवार्य होते. ज्या स्कूलबसमालकांनी आपल्या वाहनाची तपासणी अद्याप केलेली नाही, त्यांना त्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही या वाहनमालकांनी आपल्या स्कूलबसची तपासणी करून घेतली नाही, तर त्यांच्या वाहनाचा स्कूलबस परवाना निलंबित केला जाणार आहे.शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात घडू नये, याकरिता त्यांची योग्य ती तपासणी करण्यात यावी, या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गतवर्षापासून आरटीओकडून स्कूलबसची तपासणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. स्कूलबसच्या सतत होणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शाळांकडून नेमलेल्या अथवा खासगी स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुुरेशी काळजी घेतली जात नव्हती. चालकांच्या बेशिस्तीमुळेही अनेकदा अपघात घडत होते. अनेकदा नादुरुस्त अवस्थेतील वाहनेही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरली जात होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर गतवर्षी झालेल्या सुनावणीत स्कूलबससाठी तपासणी आवश्यक करण्यात आली होती. प्रतिवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूलबसमालकांनी आरटीओकडून ही तपासणी करून घ्यायची असल्याचे उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी राजेंद्र सरक यांनी स्पष्ट केले आहे.