शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

रायगडमधील २५३ शेतकरी कृषी पंप वीजजोडणीस वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:43 IST

रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही. मात्र, शेतकºयाचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आॅनलाइन पद्धतीने हे अर्ज स्वीकारून कारवाई करीत असल्याचा दावा वीज वितरण कंपनी करीत आहे.वीज वितरण कंपनीच्या संगणक आज्ञावलीमध्ये आॅनलाइन अर्ज करण्याच्या पद्धतीमुळे तसेच सौरऊर्जेवर आधारित पंप देण्याच्या योजनेच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज प्रलंबित असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता एम. एम. मुंडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरिप हंगाम पूर्व जिल्हास्तरीय बैठकीत दिली आहे.३१ मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात एकूण १७ हजार २५२ वीजजोडणी झालेली आहे. मार्च २०१८ अखेर ५२१ वीजपंप अर्ज पैसे भरून प्रलंबित होते. मार्च २०१९ पर्यंत त्यापैकी ३८७ पंपांना वीजजोडणी दिलेल्या असून, २५३ वीजजोडणी प्रलंबित आहेत. याबाबतची कारणे जिल्हाधिकाºयांनी विचारली असता, उप कार्यकारी अभियंता मुंडे यांनी पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या २५३ शेतकºयांना लवकरात लवकर वीजजोडणी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.किमान वीज बील भरावे लागणारजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्याच्या आत या जोडणी मिळण्याची शक्यता नाही. परिणामी, पाऊस सुरू झाल्यावर कृषी पंपांना वीज मिळाली तरी पंपांचा वापर शेतीला करावा लागणार नाही. मात्र, किमान येणारे वीज बिल शेतकºयांना भरावे लागणार आहे. यामुळे श्रमिक मुक्ती दल संघटनेचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी वीज वितरण कंपनीच्या या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड