शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

रायगडमधील २५३ शेतकरी कृषी पंप वीजजोडणीस वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:43 IST

रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही. मात्र, शेतकºयाचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आॅनलाइन पद्धतीने हे अर्ज स्वीकारून कारवाई करीत असल्याचा दावा वीज वितरण कंपनी करीत आहे.वीज वितरण कंपनीच्या संगणक आज्ञावलीमध्ये आॅनलाइन अर्ज करण्याच्या पद्धतीमुळे तसेच सौरऊर्जेवर आधारित पंप देण्याच्या योजनेच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज प्रलंबित असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता एम. एम. मुंडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरिप हंगाम पूर्व जिल्हास्तरीय बैठकीत दिली आहे.३१ मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात एकूण १७ हजार २५२ वीजजोडणी झालेली आहे. मार्च २०१८ अखेर ५२१ वीजपंप अर्ज पैसे भरून प्रलंबित होते. मार्च २०१९ पर्यंत त्यापैकी ३८७ पंपांना वीजजोडणी दिलेल्या असून, २५३ वीजजोडणी प्रलंबित आहेत. याबाबतची कारणे जिल्हाधिकाºयांनी विचारली असता, उप कार्यकारी अभियंता मुंडे यांनी पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या २५३ शेतकºयांना लवकरात लवकर वीजजोडणी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.किमान वीज बील भरावे लागणारजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्याच्या आत या जोडणी मिळण्याची शक्यता नाही. परिणामी, पाऊस सुरू झाल्यावर कृषी पंपांना वीज मिळाली तरी पंपांचा वापर शेतीला करावा लागणार नाही. मात्र, किमान येणारे वीज बिल शेतकºयांना भरावे लागणार आहे. यामुळे श्रमिक मुक्ती दल संघटनेचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी वीज वितरण कंपनीच्या या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड