शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

औद्योगिक क्षेत्रात वर्षभरात 24 अपघात १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रायगडमध्ये १,४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:14 IST

१४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रायगडमध्ये १,४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या

निखिल म्हात्रेअलिबाग : रायगड कार्पोरेट जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. या औद्योगिक क्षेत्रात कंपनीमध्ये आग लागून, स्फोट होऊन अपघाताच्या घटना झाल्याने मानवी अपघात, वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २४ अपघात झाले असून १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ व्यक्ती आणि ६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे कंपनी मालकांनी कामगारांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

रायगड जिल्ह्यात रोहा, महाड, खालापूर, माणगाव, खोपोली, रसायनी या परिसरात जवळजवळ १४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. यामध्ये रासायनिक, औषधनिर्मिता, खतनिर्मिता, स्टील, खाद्यपदार्थ, मद्य अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांच्या घटना होत असतात. यामध्ये आग, प्राणघातक, स्फोट, वायुगळती होऊन अपघात होत असतात. त्यामुळे जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत असते.

रायगड जिल्ह्यात वर्षभरात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांत २४ अपघात झाले असून १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्राणघातक १०, आग ७, स्फोट २, वायुगळती ५ असे एकूण २४ कंपनीत अपघात झाले आहेत. प्राणघातक अपघातात १२, आगीत १, स्फोटात २ असे एकूण १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ नागरिकांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून या ठिकाणी वायुगळती, स्फोट, आगीच्या घटना वारंवार होत असतात. मात्र कंपनी प्रशासनाकडून अथवा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे अपघात होत असतात. अशा वेळी कंपन्यांची आणि कर्मचारी याची सुरक्षा करणे महत्त्वाचे असते. मात्र अनेक वेळा याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना होत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड