शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

औद्योगिक क्षेत्रात वर्षभरात 24 अपघात १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रायगडमध्ये १,४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:14 IST

१४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रायगडमध्ये १,४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या

निखिल म्हात्रेअलिबाग : रायगड कार्पोरेट जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. या औद्योगिक क्षेत्रात कंपनीमध्ये आग लागून, स्फोट होऊन अपघाताच्या घटना झाल्याने मानवी अपघात, वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २४ अपघात झाले असून १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ व्यक्ती आणि ६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे कंपनी मालकांनी कामगारांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

रायगड जिल्ह्यात रोहा, महाड, खालापूर, माणगाव, खोपोली, रसायनी या परिसरात जवळजवळ १४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. यामध्ये रासायनिक, औषधनिर्मिता, खतनिर्मिता, स्टील, खाद्यपदार्थ, मद्य अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांच्या घटना होत असतात. यामध्ये आग, प्राणघातक, स्फोट, वायुगळती होऊन अपघात होत असतात. त्यामुळे जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत असते.

रायगड जिल्ह्यात वर्षभरात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांत २४ अपघात झाले असून १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्राणघातक १०, आग ७, स्फोट २, वायुगळती ५ असे एकूण २४ कंपनीत अपघात झाले आहेत. प्राणघातक अपघातात १२, आगीत १, स्फोटात २ असे एकूण १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ नागरिकांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून या ठिकाणी वायुगळती, स्फोट, आगीच्या घटना वारंवार होत असतात. मात्र कंपनी प्रशासनाकडून अथवा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे अपघात होत असतात. अशा वेळी कंपन्यांची आणि कर्मचारी याची सुरक्षा करणे महत्त्वाचे असते. मात्र अनेक वेळा याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना होत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड