शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

औद्योगिक क्षेत्रात वर्षभरात 24 अपघात १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रायगडमध्ये १,४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:14 IST

१४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; रायगडमध्ये १,४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या

निखिल म्हात्रेअलिबाग : रायगड कार्पोरेट जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. या औद्योगिक क्षेत्रात कंपनीमध्ये आग लागून, स्फोट होऊन अपघाताच्या घटना झाल्याने मानवी अपघात, वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २४ अपघात झाले असून १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ व्यक्ती आणि ६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे कंपनी मालकांनी कामगारांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

रायगड जिल्ह्यात रोहा, महाड, खालापूर, माणगाव, खोपोली, रसायनी या परिसरात जवळजवळ १४०० वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. यामध्ये रासायनिक, औषधनिर्मिता, खतनिर्मिता, स्टील, खाद्यपदार्थ, मद्य अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांच्या घटना होत असतात. यामध्ये आग, प्राणघातक, स्फोट, वायुगळती होऊन अपघात होत असतात. त्यामुळे जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत असते.

रायगड जिल्ह्यात वर्षभरात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांत २४ अपघात झाले असून १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्राणघातक १०, आग ७, स्फोट २, वायुगळती ५ असे एकूण २४ कंपनीत अपघात झाले आहेत. प्राणघातक अपघातात १२, आगीत १, स्फोटात २ असे एकूण १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ नागरिकांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून या ठिकाणी वायुगळती, स्फोट, आगीच्या घटना वारंवार होत असतात. मात्र कंपनी प्रशासनाकडून अथवा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे अपघात होत असतात. अशा वेळी कंपन्यांची आणि कर्मचारी याची सुरक्षा करणे महत्त्वाचे असते. मात्र अनेक वेळा याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना होत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड