शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अलिबाग-रोहा रस्त्यासाठी २२९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:44 IST

रस्त्याचे जाळे उभारण्यावर भर : हायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत निविदांना प्रतिसाद न आल्याने सरकारचा नवा फार्म्युला

आविष्कार देसाई अलिबाग : अलिबाग-रोहा ८५.६३ किलो मीटरच्या या चारपदरी रस्त्यासाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे. यासाठी तब्बल २२९ कोटी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याने अलिबाग-रोहा रस्त्यावरून सुसाट वेगाने जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पायाभूत सुविधा उभारण्यात मागे असणाऱ्या रायगड जिल्ह्यामध्ये हायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत मध्यंतरी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत सुमारे ८५० कोटी रुपयांचे रस्ते बांधण्याचे भाजप सरकारने जाहीर केले होते. मात्र, ८५० कोटी रुपयांच्या एकत्रित पॅकेजमधील रस्ते निर्माण करण्याला कोणत्याच निविदेला ठेकेदाराने प्रतिसाद दिलेला नव्हता. त्यामुळे आता विविध भागांमध्ये रस्ते निर्माण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला कितपत यश येते हे लवकरच कळणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रात आणि राज्यामध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे बॅनर येथील काही स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला होता. त्यामुळे विकासकामांसाठी त्यांनीच निधी आणला, असे चित्र जनतेमध्ये निर्माण होत होते. याचा विचार करून आता भाजपच्या नेत्यांनी कोणी श्रेय घेण्याच्या आधीच करत असलेल्या विकासकामांची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु त्यांनी जी विकासकामे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तीच विकासकामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन मार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मार्गांसाठी सुमारे ८५० कोटी रुपये मंजूर केले होते. या ८५० कोटी रुपयांमध्ये दोन्ही जिल्ह्यांतील रस्त्याचे एकत्रित पॅकेज होते, त्यामुळे या कामांसाठी काढलेल्या निविदेला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या विकासकामांचे ५० ते १०० कोटी रुपयांचे भाग (टप्पे) करण्यात आले होते. त्यालाही अल्प प्रतिसाद आला होता, त्यामुळे नव्याने आता अलिबाग-रोहा, रोहा-मुरुड आणि पोयनाड-नागोठणे असे विकासकामाचे स्वरूप करण्यात आले.

अलिबाग-रोहा (राज्य मार्ग-०९) या ८६.६३ किलो मीटरच्या रस्त्यासाठी २२९ कोटी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तसेच पोयनाड-नागोठणे (राज्य मार्ग-८७) या २९.०५ किलो मीटरच्या रस्त्यासाठी ४२ कोटी ७४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली.

१) ६० टक्के खासगीकरणातून आणि ४० टक्के सरकारी निधीतून अलिबाग-रोहा हा चारपदरी मार्ग करण्यात येणार आहे. म्हसळा तालुक्यातील साईपर्यंत हा मार्ग उभारण्यात येणार आहे. त्याची पुढे कनेक्टिव्हीटी दिघी पोर्टपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे खासगी ठेकेदाराचा ६० टक्के निधीचा खर्च वसूल होण्यास मदत मिळणार आहे, असे अ‍ॅड. मोहिते यांनी स्पष्ट केले.

२) चारपदरी होणाऱ्या रस्त्यांसाठी जमीन संपादन करावे लागणार आहे. यासाठी २०१३ चा नवीन भूसंपादन कायदा लागू करण्यात येणार असल्याने जमिनीला कोट्यवधी रुपयांचा दर मिळणार आहे. त्यामुळे जमीन देण्याला विरोध होणार नाही, असा विश्वास अ‍ॅड. मोहिते यांनी व्यक्त केला.

टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेचे काय?हा रस्ता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर बांधण्यात येणार असल्याने त्यावर टोल लागणार का? या बाबत अ‍ॅड. मोहिते यांनी समपर्क उत्तर दिले नाही. त्यामुळे भविष्यात या रस्त्याला टोल लावल्यास युती सरकारच्या टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणेचे काय? असा सवालही उपस्थित होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकalibaugअलिबाग