शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

जिल्ह्यात २२ ग्रामपंचायती बिनविरोध; ६८५ जागांकरिता होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 02:50 IST

रायगड जिल्ह्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात सरपंच व सदस्यपदांच्या एकूण ६८५ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात सरपंच व सदस्यपदांच्या एकूण ६८५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.जिल्ह्यातील १४ तालुक्यातील १२१ ग्रामपंचायातींच्या सरपंच व सदस्यांच्या एकूण १२२० जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे.१२१ ग्रामपंचायतींच्या १२१ सरपंचपदासाठी छाननीपर्यंत ४१७ तर ११०१ सदस्यपदांसाठी असे एकूण २४६२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. १५ सप्टेंबर या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर आता जिल्ह्यातील निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील १२१ पैकी अर्ज मागे घेतल्यानंतर अलिबाग तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीमधील सरपंच व सदस्यांसह ७० जागांसाठी, मुरुड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमधील ५, पेण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीमधील ४४, पनवेल तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीमधील ७८ जागांसाठी, उरण तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीमधील ३४, कर्जत तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमधील ९१, खालापूर तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीमधील ३७, माणगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतीमध्ये ४२, तळा तालुक्यात ९ ग्रामपंचायतीमध्ये २७, रोहा तालुक्यात १९ ग्रामपंचायतीमध्ये १४१, सुधागड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीमध्ये १६, महाड तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीमध्ये ४२, पोलादपूर तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीमध्ये २२, म्हसळा तालुक्यात ५ ग्रामपंचायतीमध्ये ३६ अशा १४ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांच्या ६८५ जागांसाठी निवडणूक होणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीअंती एकच उमेदवार अर्ज शिल्लक राहिल्याने जिल्ह्यातील १२१ पैकी अलिबाग ६, मुरुड ३, पेण १३, पनवेल ५२, उरण ११, कर्जत ५३, खालापूर ३, माणगाव ६६, तळा ७७, रोहा ६८, सुधागड ४८, महाड ६१, पोलादपूर २०, म्हसळा १२ अशा १४ तालुक्यांत एकूण ४९३ जागा बिनविरोध झाल्या आहेत.सरपंच व सदस्यपदांसह पेण तालुक्यातील २, पनवेल-२, कर्जत-१, तळा-४, रोहा-३, सुधागड-२, महाड-७, पोलादपूर-१ अशा २२ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. गणेशोत्सव उत्सव सुरू असल्याने गणपतीच्या दर्शनाचे निमित्त करून मतदारांना भेटून उमेदवार सध्या प्रचार करीत आहेत. बुधवार, २६ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मतदान होणार आहे तर मतमोजणी गुरुवार, २७ सप्टेंबर रोजी होणारआहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून अनेक राजकीय मंडळांनी सार्वजनिक मंडळांचा प्रचारासाठी आधार घेतला आहे.