शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

आदर्श ग्राम स्पर्धेसाठी २२ ग्रामपंचायतींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:08 IST

पहिल्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड अणि पुणे १२ जिल्ह्यांमध्ये आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अलिबाग : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत (व्हिलेज सोशल ट्रान्सफॉरमेशन फाउंडेश्न) पहिल्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड अणि पुणे १२ जिल्ह्यांमध्ये आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील जिल्हा स्वयं मूल्यांकन, मासिक प्रगती अहवाल आणि विभागाच्या बऱ्याच गावांमध्ये सामाजिक, आर्थिक, भौतिक बदल झाल्याचे दिसून येत आहेत. या ग्रामपंचायतींच्या विकासकामांना प्रोत्साहन देऊन आदर्श ग्राम निर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श ग्राम स्पर्धा ज्या जिल्ह्यांमध्ये लागू झाली आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ज्या गावांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी गावातील कामांचे स्वमूल्यांकन करून त्याचा प्रस्ताव आणि व्हिडीओ गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा. त्या व्हिडीओची पुन्हा एकदा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातर्फे छाननी करण्यात येणार आहे. अशाप्रकारे राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये १२ जिल्ह्यातून तीन उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड आदर्श ग्राम स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ११ जुलै ते २० जुलैपर्यंत व्हीएसटीएफ ग्रामपंचायतींनी आदर्श ग्रामसाठी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर २२ जुलै ते ३१ जुलै दरम्यान समिती ग्रामपंचायतींची पाहणी करून, वस्तुस्थितीवर आधारित मूल्यांकन करून त्यांना गुणांकन देतील. १ आॅगस्ट ते ७ आॅगस्ट या कालावधीत जिल्हा अभियान परिषद उत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींचा छायाचित्रांसहप्रस्ताव राज्यस्तरावर सादर करतील. १० आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट दरम्यान राज्यस्तरावरून ग्रामपंचायतींची तपासणी आणि मूल्यांकन करण्यात येणार आहे.राज्यस्तरावरून या ग्रामपंचायतींचे अंतिम गुणांकन करून, संबंधित ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर समारंभपूर्वक रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. आदर्श ग्राम निर्माण करताना ज्या जिल्ह्यांनी जास्तीत जास्त सरकारी योजनांचे कृती संगम केलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना सुध्दा सन्मानित करण्याचा विचार होईल. आदर्श ग्राम निर्मितीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाºया व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपरिवर्तक, जिल्हा समन्वयक, लिड डेव्हलपमेंट पार्टनर प्रतिनिधी यांनासुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे.।‘ग्रामपंचायतींकडून प्रतिसाद मिळेल’व्हीएसटीएफमधील ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. ही योजना दीड वर्षापूर्वी सुरू झालेली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियान यशस्वीपणे काम करत आहे.ज्या गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधादेखील नाहीत अशा गावांमध्ये ग्रामपरिवर्तक जाऊन विकासकामांना गती देत आहेत. त्यामुळे या सर्व लोकांच्या व गावांच्या कामांची दखल घेण्याकरिता आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेला ग्रामपंचायतींकडून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, असे महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम म्हणाले. आदर्श ग्राम निर्मितीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाºया व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपरिवर्तक, जिल्हा समन्वयक, लिड डेव्हलपमेंट पार्टनर प्रतिनिधी यांचाही सन्मान होणार.