शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्ह्यातील २२ धरणे भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:56 IST

गेल्या दोन दिवस पडलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २२ धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. एक धरण ७५ टक्के भरलेले आहे.

अलिबाग : गेल्या दोन दिवस पडलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २२ धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. एक धरण ७५ टक्के भरलेले आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरलेल्या धरणांची संख्याही चार आहे, तर ५० टक्के पाणी भरलेले धरण एकच आहे. पावसाने सोमवारी पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.शेतीची कामे ९५ टक्के पूर्ण झाल्याने खरिपाचा हंगाम चांगला जाणार असे संकेत शेतकºयांना प्राप्त झाले आहेत. पावसाची अशीच कृपादृष्टी राहिल्यास भाताचे पीक शेतामध्ये जोमाने डोलताना दिसणार आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यामध्ये लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीमध्ये २८ धरण ेयेतात. फणसाड, वावा, सुतारवाडी, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, कुडकी, पाभरे, संदेरी, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खेरे, अवसरे, भिलवले, कलोते मोकोशी, डोणवत, मोरबे, बामणोली, उसरण ही २२ धरणे शंभर टक्के भरून दुथडी वाहत आहेत तर उर्वरित सहा धरणे लवकरच भरण्याची शक्यता आहे. साळोख ९४ टक्के भरले आहे, त्याखालोखाल श्रीगाव ७८ टक्के, रानिवली ६९ टक्के, कार्ले ५८ टक्के आणि आंबेघर ३३ टक्के भरले आहे. सर्व २८ धरणांची साठवण क्षमता ही ६८.२६१ दलघमी आहे, तर सद्यस्थितीला धरणातील पाणी साठा हा ६३.३४७ दलघमी एवढा आहे. १०० टक्के भरलेल्या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोलाडच्या लघु पाटबंधारे विभागाने दिली. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत सरासरी दोन हजार ६७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ३५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.