शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात २१ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:19 IST

सत्पाळा व पालीत चुरशीची शक्यता

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायतींच्या सत्तेतही आता महिलांना ५० टक्के वाटा मिळालेला असून, अनेक ग्रामपंचायतींचा कारभार महिला सांभाळताना दिसत आहेत. वसई तालुक्यातील सत्पाळा आणि पाली या दोन ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या निवडणुकीनंतरही तेथे महिलाराज येणार हे आधीच स्पष्ट झालेले असून, निवडणुकीची पहिली पायरी असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २१ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून महिला उमेदवारही ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच महिला आरक्षण होते, पण आता या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा आरक्षणाची सोडत होणार असल्याचे पुन्हा महिलाराज येईल का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. वसई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले असून, नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने, सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत.

सत्तेतील वाट्यामुळे महिला उमेदवारांना महत्त्वअलीकडच्या काळात  ग्रामपंचायतींच्या सत्तेत महिलांनाही समान वाटा दिल्याने महिला उमेदवारांना मोठे महत्त्व आले आहे. अनेकदा सत्तेच्या चाव्याही महिला उमेदवारांकडे असतात. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात महिलांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. विधानसभासभा निवडणुकीनंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे या वर्षभरात कोणतीही निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे वर्षभरातील ही ग्रामपंचायत निवडणूक पहिलीच आहे.

राजकीय पक्षांमध्ये जिंकण्यासाठी चुरस वसई तालुक्यात होत असलेल्या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते यांनाही या ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता आहे, तर राजकीय पक्षांना ही पहिली निवडणूक असल्याने ती जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागणार आहेत. यामध्ये निवडून आलेल्या महिला उमेदवारांना मोठे महत्त्व येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

विजयाची लाॅटरी कुणाला लागणार ?कोरोनाच्या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, यात पालघर जिल्ह्यात फक्त तीन ग्रामपंचायती असून, पालघर तालुक्यातील सांगावे व वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वसईतील दोन ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आता २१ महिला रिंगणात आहेत. त्यांच्यापैकी कुणाकुणाला विजयाची लाॅटरी लागते याविषयी नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूक