शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात २१ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:19 IST

सत्पाळा व पालीत चुरशीची शक्यता

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायतींच्या सत्तेतही आता महिलांना ५० टक्के वाटा मिळालेला असून, अनेक ग्रामपंचायतींचा कारभार महिला सांभाळताना दिसत आहेत. वसई तालुक्यातील सत्पाळा आणि पाली या दोन ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या निवडणुकीनंतरही तेथे महिलाराज येणार हे आधीच स्पष्ट झालेले असून, निवडणुकीची पहिली पायरी असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २१ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून महिला उमेदवारही ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच महिला आरक्षण होते, पण आता या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा आरक्षणाची सोडत होणार असल्याचे पुन्हा महिलाराज येईल का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. वसई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले असून, नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने, सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत.

सत्तेतील वाट्यामुळे महिला उमेदवारांना महत्त्वअलीकडच्या काळात  ग्रामपंचायतींच्या सत्तेत महिलांनाही समान वाटा दिल्याने महिला उमेदवारांना मोठे महत्त्व आले आहे. अनेकदा सत्तेच्या चाव्याही महिला उमेदवारांकडे असतात. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात महिलांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. विधानसभासभा निवडणुकीनंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे या वर्षभरात कोणतीही निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे वर्षभरातील ही ग्रामपंचायत निवडणूक पहिलीच आहे.

राजकीय पक्षांमध्ये जिंकण्यासाठी चुरस वसई तालुक्यात होत असलेल्या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते यांनाही या ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता आहे, तर राजकीय पक्षांना ही पहिली निवडणूक असल्याने ती जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागणार आहेत. यामध्ये निवडून आलेल्या महिला उमेदवारांना मोठे महत्त्व येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

विजयाची लाॅटरी कुणाला लागणार ?कोरोनाच्या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, यात पालघर जिल्ह्यात फक्त तीन ग्रामपंचायती असून, पालघर तालुक्यातील सांगावे व वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वसईतील दोन ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आता २१ महिला रिंगणात आहेत. त्यांच्यापैकी कुणाकुणाला विजयाची लाॅटरी लागते याविषयी नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूक