शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मत्स्योत्पादन वाढीसाठी २१ नव्या योजना

By admin | Updated: March 23, 2017 01:41 IST

गेल्या सहा ते सात वर्षांत वाढलेले सागरी प्रदूषण, परिणामी कमी झालेले मत्स्योत्पादन व निर्माण झालेला मत्स्यदुष्काळ आणि त्यातून मच्छीमारी

जयंत धुळप / अलिबागगेल्या सहा ते सात वर्षांत वाढलेले सागरी प्रदूषण, परिणामी कमी झालेले मत्स्योत्पादन व निर्माण झालेला मत्स्यदुष्काळ आणि त्यातून मच्छीमारी व्यवसायावर मोठी आर्थिक आपत्ती आली आहे. या आपत्तीवर मात करण्याकरिता आता केंद्र सरकारच्या तब्बल २९ कोटी ४२ लाख रुपयांच्या आर्थिक निधीमधून मत्स्योत्पादन वाढीकरिता नियोजित नव्या २१ योजना किनारपट्टीतील मच्छीमारांना तारक ठरणार आहेत.राज्यास लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या सागरी किनारपट्टीत १ लाख १२ हजार चौरस किमीचे क्षेत्र मासेमारी योग्य असून, या सागरी किनारपट्टीत एकूण १५ हजार ६८६ मासेमारी करणाऱ्या बोटी असून त्यापैकी १२ हजार ८३१ बोटी यांत्रिकी आहेत. राज्याच्या या सागरी किनारपट्टीत असलेल्या १७३ मासळी उतरवण्याच्या केंद्रांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा मासळी व्यवसाय चालतो आणि त्या माध्यमातून हजारो मच्छीमार कुटुंबांचा चरितार्थ चालतो तर त्या संलग्न विविध व्यवसायांच्या माध्यमातून लाखोंना रोजगार उपलब्ध होतो. परंतु मत्स्योत्पादनात घट झाल्याने मच्छीमार बांधवांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. मच्छीमारी बोटींकरिता घेतलेल्या कर्जांचे हप्ते थकल्याने काहींना जप्तीसारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. आता या नव्या २१ योजनांच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना नवा आशेचा किरण गवसला आहे.विविध कारणास्तव मत्स्योत्पादनात घट होत आहे, हे गांभीर्याने विचारात घेऊन मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी केंद्राकडून साहाय्यता घेऊन राज्य शासन विविध योजना राबविणार आहे. या एकात्मिक विकासासाठी राज्यात ५० टक्के अर्थसाहाय्यातून २१ योजना राबविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने या योजनेसाठी २९ कोटी ४२ लाख रु पयांचा निधी मंजूर केला असून यामधील ५० टक्के निधी राज्यास सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.केंद्र शासनाने नित्यक्रांती धोरणांतर्गत मत्स्य व्यवसायाच्या वाढीसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार राज्यातील भूजलाशये, सागरी व निमसागरी (खारे) क्षेत्रातील जलाशये यांच्यातील नैसर्गिक साधन-संपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करून शाश्वत पद्धतीने जैविक सुरक्षितता व पर्यावरणाचा समतोल राखून मत्स्योत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यानुसार ५० टक्के अर्थसाहाय्याच्या २१ योजना राबविण्यात येणार आहेत.