शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रायगड लोकसभा मतदार संघात २१ उमेदवारी अर्ज वैध

By निखिल म्हात्रे | Updated: April 20, 2024 21:05 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात २८ जणांनी ४० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शनिवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत २१ उमेदवारांचे २७ अर्ज वैध ठरले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या उपस्थितीत सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, उमेदवार, उमेदवारांचे सूचक, वकील व प्रतिनिधी उपस्थित होते.

छाननी अंती रायगड लोकसभा मतदारसंघात अनिकेत सुनील तटकरे, नरेश गजानन पाटील (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (बहुजन समाज पार्टी), उस्मान बापू कागदी (अपक्ष), अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी), भुपेंद्र नारायण गवते, घाग संजय अर्जुन,(अपक्ष) या सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. तर, अनंत गंगाराम गीते ( उद्धवसेना), अनंत गीते (अपक्ष), अनंत बाळोजी गीते(अपक्ष), नितीन जगन्नाथ मयेकर (अपक्ष), आस्वाद जयदास पाटील (अपक्ष), मंगेश पद्मा कोळी (अपक्ष), पांडुरंग दामोदर चौले,(अपक्ष), सुनील दत्तात्रेय तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), विजय गोपाळ बना (अपक्ष), प्रकाश बाळकृष्ण चव्हाण (भारतीय जवान किसान पार्टी), सुनील दत्ताराम तटकरी (अपक्ष), श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष), अभिजित अजित कडवे (अपक्ष), अजय यशवंत उपाध्ये (अपक्ष), अस्मिता एकनाथ उंदिरे (अपक्ष), अंजली अश्विन केळकर (अपक्ष), गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), अमित श्रीपाल कवाडे (अपक्ष), मिलिंद काशिनाथ कांबळे, नंदकुमार गोपाळ रघुवीर, कुमोदिनी रविंद्र चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.