शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

२०० एकरमध्ये घुसले खारे पाणी; एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे भातपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:05 IST

शेतकऱ्यांच्या हातात करपलेले पीक; डोळ्यांत मात्र अश्रू

- आविष्कार देसाईरायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील खारबंधिस्ती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे तब्बल २०० एकर शेतामध्ये खारे पाणी घुसून भाताचे पीक नष्ट झाले आहे. एमआयडीसीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपयांचे पीक हातातून निसटले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू दाटले आहेत.कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा एमआयडीसीच्या मुंबई, ठाणे खारभूमी आणि पेण खारभूमी येथील कार्यालयांवर शेतकरी धडक देतील आणि संबंधित अधिकाºयांना करपलेल्या भाताचे पीक देण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे. शहापूर, धेरंड, धाकटे शहापूर येथील शेतजमिनी, गाव, शाळा या समुद्राच्या उच्चतम भरती रेषेच्या २ मीटर खाली आहेत. समुद्राचे पाणी अडविण्याचे काम शेकडो वर्षांपासून या ठिकाणचे संरक्षण बंधारे करीत आहेत. शहापूर-धेरंड येथील ३८७.८७ हेक्टर जमिनी २००९ साली एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या आणि गावांच्या संरक्षणासाठी असलेल्या बांधांची जबाबदारीदेखील एमआयडीसीकडेच आहे. त्यांनी ती जबाबदारी २०१९ पर्यंत घेतली नसल्याने ही जबाबदारी गावकºयांनी घेतली होती. गावकºयांनी स्वखर्चाने तेथील बंधाºयांच्या डागडुजी केली आहे.डिसेंबर २०१९ मध्ये या बांधांची जबाबदारी एमआयडीसीने घेतल्यानंतर या बांधांचे नूतनीकरण केलेच नाही; शिवाय बांधांची दुरुस्तीदेखील केली नाही. त्यामुळे गाव आणि शेती वाचविण्यासाठी शेतकºयांंनीच पुढाकार घेतला. जानेवारी ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत एमआयडीसीच्या विनंतीवरून शेतकºयांनी ज्या बांधांची दुरुस्ती केली. त्याची सुमारे ७ लाखांहून अधिक रुपयांची मजुरी एमआयडीसीने अद्याप दिलेली नाही.२००९ ते २०१८ पर्यंत जमिनीत प्रकल्प न आल्याने तसेच पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या अधिनियमानुसार निर्वाहभत्ताही एमआयडीसीने दिलेला नाही. रोजगाराच्या कोणत्याही संधी नसल्याने शेतकºयांनी पुन्हा शेती करण्यास सुरुवात केली. आॅगस्ट २०२०नंतर आत्तापर्यंत सुमारे ११ ठिकाणी खारबंदिस्ती फुटली. त्याची योग्य वेळी दुरुस्ती न केल्यामुळे समद्राच्या उधाणाचे खारे पाणी शेतामध्ये घुसत आहे. सततच्या पाणी येण्याने खारबंदिस्ती आणखी कमकुवत होऊन ती फुटण्याचे प्रमाण वाढले. सप्टेंबर महिन्यात आलेल्या उधाणामुळे तर २०० एकरातील भाताचे पीक नष्ट झाले आहे. पेण खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.उपाययोजना न केल्यास आंदोलन२०० एकरमधील हातात आलेले पीक सततच्या खाºया पाण्यामुळे करपले आहे. नोकरी नाही, शेती नाही आणि कोणताच रोजगार नाही. डोळ्यांत मात्र अश्रू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड प्रमुख राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.एमआयडीसी आपल्या कर्तव्यापासून पळत आहे. त्यांनी तातडीने या प्रकरणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.४० लाख रु पयांचे नुकसान : एका एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भाताचे उत्पादन येते. एक क्विंटल भाताला सुमारे एक हजार रुपयांचा दर बाजारात मिळतो. त्यानुसार २०० एकरात चार हजार क्विंटल उत्पादन येते. म्हणजेच चार हजार गुणीले एक हजार बरोबर ४० लाख रुपयांच्या भातपिकाचे नुकसान झाल्याचे दिसून येते.