शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

२०० एकरमध्ये घुसले खारे पाणी; एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे भातपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:05 IST

शेतकऱ्यांच्या हातात करपलेले पीक; डोळ्यांत मात्र अश्रू

- आविष्कार देसाईरायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील खारबंधिस्ती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे तब्बल २०० एकर शेतामध्ये खारे पाणी घुसून भाताचे पीक नष्ट झाले आहे. एमआयडीसीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपयांचे पीक हातातून निसटले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू दाटले आहेत.कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा एमआयडीसीच्या मुंबई, ठाणे खारभूमी आणि पेण खारभूमी येथील कार्यालयांवर शेतकरी धडक देतील आणि संबंधित अधिकाºयांना करपलेल्या भाताचे पीक देण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे. शहापूर, धेरंड, धाकटे शहापूर येथील शेतजमिनी, गाव, शाळा या समुद्राच्या उच्चतम भरती रेषेच्या २ मीटर खाली आहेत. समुद्राचे पाणी अडविण्याचे काम शेकडो वर्षांपासून या ठिकाणचे संरक्षण बंधारे करीत आहेत. शहापूर-धेरंड येथील ३८७.८७ हेक्टर जमिनी २००९ साली एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या आणि गावांच्या संरक्षणासाठी असलेल्या बांधांची जबाबदारीदेखील एमआयडीसीकडेच आहे. त्यांनी ती जबाबदारी २०१९ पर्यंत घेतली नसल्याने ही जबाबदारी गावकºयांनी घेतली होती. गावकºयांनी स्वखर्चाने तेथील बंधाºयांच्या डागडुजी केली आहे.डिसेंबर २०१९ मध्ये या बांधांची जबाबदारी एमआयडीसीने घेतल्यानंतर या बांधांचे नूतनीकरण केलेच नाही; शिवाय बांधांची दुरुस्तीदेखील केली नाही. त्यामुळे गाव आणि शेती वाचविण्यासाठी शेतकºयांंनीच पुढाकार घेतला. जानेवारी ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत एमआयडीसीच्या विनंतीवरून शेतकºयांनी ज्या बांधांची दुरुस्ती केली. त्याची सुमारे ७ लाखांहून अधिक रुपयांची मजुरी एमआयडीसीने अद्याप दिलेली नाही.२००९ ते २०१८ पर्यंत जमिनीत प्रकल्प न आल्याने तसेच पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या अधिनियमानुसार निर्वाहभत्ताही एमआयडीसीने दिलेला नाही. रोजगाराच्या कोणत्याही संधी नसल्याने शेतकºयांनी पुन्हा शेती करण्यास सुरुवात केली. आॅगस्ट २०२०नंतर आत्तापर्यंत सुमारे ११ ठिकाणी खारबंदिस्ती फुटली. त्याची योग्य वेळी दुरुस्ती न केल्यामुळे समद्राच्या उधाणाचे खारे पाणी शेतामध्ये घुसत आहे. सततच्या पाणी येण्याने खारबंदिस्ती आणखी कमकुवत होऊन ती फुटण्याचे प्रमाण वाढले. सप्टेंबर महिन्यात आलेल्या उधाणामुळे तर २०० एकरातील भाताचे पीक नष्ट झाले आहे. पेण खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.उपाययोजना न केल्यास आंदोलन२०० एकरमधील हातात आलेले पीक सततच्या खाºया पाण्यामुळे करपले आहे. नोकरी नाही, शेती नाही आणि कोणताच रोजगार नाही. डोळ्यांत मात्र अश्रू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड प्रमुख राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.एमआयडीसी आपल्या कर्तव्यापासून पळत आहे. त्यांनी तातडीने या प्रकरणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.४० लाख रु पयांचे नुकसान : एका एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भाताचे उत्पादन येते. एक क्विंटल भाताला सुमारे एक हजार रुपयांचा दर बाजारात मिळतो. त्यानुसार २०० एकरात चार हजार क्विंटल उत्पादन येते. म्हणजेच चार हजार गुणीले एक हजार बरोबर ४० लाख रुपयांच्या भातपिकाचे नुकसान झाल्याचे दिसून येते.