शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

२०० एकरमध्ये घुसले खारे पाणी; एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे भातपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:05 IST

शेतकऱ्यांच्या हातात करपलेले पीक; डोळ्यांत मात्र अश्रू

- आविष्कार देसाईरायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील खारबंधिस्ती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे तब्बल २०० एकर शेतामध्ये खारे पाणी घुसून भाताचे पीक नष्ट झाले आहे. एमआयडीसीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपयांचे पीक हातातून निसटले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू दाटले आहेत.कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा एमआयडीसीच्या मुंबई, ठाणे खारभूमी आणि पेण खारभूमी येथील कार्यालयांवर शेतकरी धडक देतील आणि संबंधित अधिकाºयांना करपलेल्या भाताचे पीक देण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे. शहापूर, धेरंड, धाकटे शहापूर येथील शेतजमिनी, गाव, शाळा या समुद्राच्या उच्चतम भरती रेषेच्या २ मीटर खाली आहेत. समुद्राचे पाणी अडविण्याचे काम शेकडो वर्षांपासून या ठिकाणचे संरक्षण बंधारे करीत आहेत. शहापूर-धेरंड येथील ३८७.८७ हेक्टर जमिनी २००९ साली एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या आणि गावांच्या संरक्षणासाठी असलेल्या बांधांची जबाबदारीदेखील एमआयडीसीकडेच आहे. त्यांनी ती जबाबदारी २०१९ पर्यंत घेतली नसल्याने ही जबाबदारी गावकºयांनी घेतली होती. गावकºयांनी स्वखर्चाने तेथील बंधाºयांच्या डागडुजी केली आहे.डिसेंबर २०१९ मध्ये या बांधांची जबाबदारी एमआयडीसीने घेतल्यानंतर या बांधांचे नूतनीकरण केलेच नाही; शिवाय बांधांची दुरुस्तीदेखील केली नाही. त्यामुळे गाव आणि शेती वाचविण्यासाठी शेतकºयांंनीच पुढाकार घेतला. जानेवारी ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत एमआयडीसीच्या विनंतीवरून शेतकºयांनी ज्या बांधांची दुरुस्ती केली. त्याची सुमारे ७ लाखांहून अधिक रुपयांची मजुरी एमआयडीसीने अद्याप दिलेली नाही.२००९ ते २०१८ पर्यंत जमिनीत प्रकल्प न आल्याने तसेच पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या अधिनियमानुसार निर्वाहभत्ताही एमआयडीसीने दिलेला नाही. रोजगाराच्या कोणत्याही संधी नसल्याने शेतकºयांनी पुन्हा शेती करण्यास सुरुवात केली. आॅगस्ट २०२०नंतर आत्तापर्यंत सुमारे ११ ठिकाणी खारबंदिस्ती फुटली. त्याची योग्य वेळी दुरुस्ती न केल्यामुळे समद्राच्या उधाणाचे खारे पाणी शेतामध्ये घुसत आहे. सततच्या पाणी येण्याने खारबंदिस्ती आणखी कमकुवत होऊन ती फुटण्याचे प्रमाण वाढले. सप्टेंबर महिन्यात आलेल्या उधाणामुळे तर २०० एकरातील भाताचे पीक नष्ट झाले आहे. पेण खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.उपाययोजना न केल्यास आंदोलन२०० एकरमधील हातात आलेले पीक सततच्या खाºया पाण्यामुळे करपले आहे. नोकरी नाही, शेती नाही आणि कोणताच रोजगार नाही. डोळ्यांत मात्र अश्रू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड प्रमुख राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.एमआयडीसी आपल्या कर्तव्यापासून पळत आहे. त्यांनी तातडीने या प्रकरणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.४० लाख रु पयांचे नुकसान : एका एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भाताचे उत्पादन येते. एक क्विंटल भाताला सुमारे एक हजार रुपयांचा दर बाजारात मिळतो. त्यानुसार २०० एकरात चार हजार क्विंटल उत्पादन येते. म्हणजेच चार हजार गुणीले एक हजार बरोबर ४० लाख रुपयांच्या भातपिकाचे नुकसान झाल्याचे दिसून येते.