शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

९० ग्रामपंचायतींसाठी दोन हजार ७३२ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:42 IST

रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी २४ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी १३७ तर, सदस्यपदासाठी ८८५ अर्ज दाखल झाले.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी २४ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी १३७ तर, सदस्यपदासाठी ८८५ अर्ज दाखल झाले. त्यामुळे आता सरपंचपदासाठी एकूण ३७४ आणि सदस्यपदासाठी दोन हजार ३५८ असे एकूण दोन हजार ७३२ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक ठरले आहेत. मात्र, १३ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात. त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपासून शनिवारपर्यंत गेली सहा दिवस उमेदवारांसह पक्षातील काही वरिष्ठ नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची चांगलीच गर्दी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने होती. शनिवार ९ फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये उमेदवारांची चांगलीच झुंबड उडाली होती.उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनिहाय टेबल मांडण्यात आले होते. त्यामुळे नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतीसाठी कोठे उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे याची माहिती उमेदवारांना मिळत होती.जिल्ह्यातील तब्बल ९० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची शनिवार ९ फेब्रुवारी ही शेवटची तारीख असल्याने उमेदवारांसह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्या त्या तहसीलदार कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती. ९ फेब्रुवारी रोजी या एकाच दिवसामध्ये सरपंचपदासाठी तब्बल १३७ तर, सदस्यपदासाठी ८८५ अर्ज दाखल झाले. त्यानुसार आता सरपंचपदासाठी एकूण ३७४ आणि सदस्यपदासाठी दोन हजार ३५८ असे एकूण दोन हजार ७३२ उमेदवार निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.११ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. १३ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या दिवशी किती उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज मागे घेतात यावरच निवडणुकीतील एकूण उमेदवारांची संख्या निश्चित होणार आहे. त्यानंतरच प्रचाराला रंगत येणार आहे.म्हसळा येथे ७० उमेदवार रिंगणातम्हसळा : तालुक्यातील रोहीणी, गोंडघर, खामगाव व खारगांव (बु.) अशा चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी रोहीणी ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच एक पद व तीन प्रभागातून अन्य सात सदस्यपदासाठी तेवढच अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बीनवीरोध आल्यासारखे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले रोहिणीवर प्राबल्य राखले.गोंडघर, खामगाव व खारगांव (बु.) या अन्य तीन ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी-तीरंगी लढतींची शक्यता आहे.यासाठी३ सरपंच पदासाठी १५ उमेदवार २५ सदस्य पदासाठी ५५ उमेदवार रिंगणात आहेत. खामगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ६ व ३ प्रभागांतून ९ सदस्यांसाठी २४ जण रिंगणात आहेत. गोडघर ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ५ , ३ प्रभागांतून ९ सदस्यांसाठी १४ जण रिंगणात आहेत. प्रभाग ३मधून सचीन पयेर, वैशाली सावंत व पुष्पा नाईक यांना प्रातिस्पर्धी नसल्याने बिनविरोध आहेत.खारगांव (बु.) ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी४, ३ प्रभागांतून ७ जागांसाठी १५ जण रिंगणात आहेत.वॉर्ड क्र . २ मध्ये दोनही जागेसाठी स्पर्धक नसल्याने सुरई येथील संतोष जाधव व सरिता जाधव यांची बिनविरोध निवड आहे. रोहिणी ग्रामपंचायतीवर एकहाती राष्ट्रवादीची सत्ता आहे. गोंडघर व खारगांव (बु.) मध्ये थेट सरपंच लढत निकराची होणार आहे.राजकीय पक्ष सज्जशेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा असे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. मोठमोठ्या सभा घेण्यापेक्षा मतदारांच्या घरी जाऊन त्यांची थेट भेट घेऊनच प्रचार करण्याची रणनीती सर्वच राजकीय पक्षांची असल्याचे दिसून येते. ज्या उमेदवारांची उमेदवारी पक्की आहे त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवातही केली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. गाव बैठका घेऊन उमेदवारांसाठी प्रचार केला जात आहे. या बैठकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांतील नेते, पदाधिकारी हे हजेरी लावत आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असल्याने प्रचाराचा धुरळा अनुभवता येणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड