शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

११ कोटींची पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे थकीत; पाच कोटी १२ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 02:43 IST

रायगड जिल्हा परिषदेला पाणीपट्टीमार्फत दरवर्षी १४ कोटी सात लाख रुपयांचा निधी प्राप्त होतो.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून आतापर्यंत फक्त पाच कोटी १२ लाख ४२ हजार रुपयांची पाणपट्टी वसूल करण्यात यश आले आहे. मात्र, अद्यापही तब्बल ११ कोटी ३७ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल करणे बाकी आहे. ३१ मार्चअखेर सर्व पाणीपट्टी वसूल करण्याचे ग्रामपंचायत विभागापुढे मोठे आव्हान असल्याचे दिसून येते.रायगड जिल्हा परिषदेला पाणीपट्टीमार्फत दरवर्षी १४ कोटी सात लाख रुपयांचा निधी प्राप्त होतो. २०१९-२० साठी १६ कोटी ५० लाख ७४ हजाराची वाढीव म्हणजेच सुमारे अडीज लाख रुपयांची मागणी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आणि नागरिकांच्या असहायतेमुळे पाणीपट्टी वसूल करण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. योग्य पद्धतीने आणि वेळेमध्ये वसुली होत नसल्यानेच विविध ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी निधी देताना जिल्हा परिषदेला चांगलेच अडचणीचे ठरत आहे.रायगड जिल्ह्यात ८०९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज, ग्रामपंचायत हद्दीतील अन्य विकास कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात. ग्रामपंचायती हद्दीतराहणाºया नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केलाजातो. त्यासाठी पाइप लाइनद्वारे सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी पाणी दिले जाते. यामुळे ग्रामपंचायतीसाठी ठरावीक कर रूपाने नागरिकांकडून पाणीपट्टीमार्फत रक्कम आकारते.रायगड जिल्हा परिषदेकडे आलेल्या पाणीपट्टीतून त्या-त्या ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी निधी वर्ग केला जातो.नागरिकांनी पाणीपट्टी भरली नसल्याने आणि ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दुर्लक्षामुळे थकबाकीग्रामपंचायतीने दिलेल्या पाण्याची पाणीपट्टी ही नागरिकांनी वेळेवर भरणे गरजेचे असते. मात्र काही नागरिक पाणीपट्टी ही वेळेवर भरत नसल्याने पाणीपट्टीची रक्कम थकीत राहते.वास्तविक ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरण्यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे असते मात्र या ठिकाणी ग्रामपंयातींकडून दुर्लक्ष होत असल्याचे थकीत रकमेवरुन दिसून येते.ग्रामपंचायतीने वसूल केलेली पाणीपट्टी रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे मार्च अखेरपर्यत जमा करायची असते.परंतु जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतीमध्ये मार्च महिना उलटून गेला तरी अद्याप ११ कोटी ३७ लाख रुपयांची वसूली थकीत राहिली आहे. आॅक्टोबर महिन्यांपर्यंत सुमारे ३१ टक्के पाणीपट्टी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी भरली आहे.पाणीपट्टीची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींकडून वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ३१ मार्च अखेरपर्यंत सर्व थकीत रकमेची वसुली करण्यात येणार आहे.- शीतल पुंड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत.

टॅग्स :Raigadरायगड