शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाकडे 19 हजार लाभार्थींची पाठ; महिनाभरात रायगड जिल्ह्यात 95.70 टक्के वाटप 

By निखिल म्हात्रे | Updated: October 29, 2023 17:02 IST

दिवाळी सणाचा आनंदाचा शिधा वाटपाची तारिख निश्चीत झाली तरी गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाचे संच संपलेले नाही.

 अलिबाग - दिवाळी सणाचा आनंदाचा शिधा वाटपाची तारिख निश्चीत झाली तरी गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाचे संच संपलेले नाही. रायगड जिल्ह्यात 25 ऑक्टोबरपर्यंत 95.70 टक्के संचांचे वाटप झाले आहे. 19 हजार 392 संच अद्यापही शिल्लक आहेत. सर्वात जास्त वाटप कर्जत तालुक्यात तर सर्वात कमी वाटप पनवेल तालुक्यात झाले आहे. आगामी दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटपासाठी शासनाने नियोजन करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखर व एक लीटर खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले संच ‘आनंदाचा शिधा’ गणेशोत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या एक दोन दिवस आधी रास्तभाव धान्य दुकानांवर आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला.

रायगडसाठी शंभर टक्के म्हणजेच 4 लाख 29 हजार 854 संच उपलब्ध झाले होते. वाहतूकदारांच्या संपामुळे आनंदाचा शिधाचे रायगड जिल्ह्यात उपलब्ध होण्यास विलंब झाला. तरीही गणेशोत्सवाच्या एक-दोन दिवस आधीपासून रायगड जिल्ह्यात आनंदाच्या शिधाचे वाटप सुरू झाले होते.  त्यानंतर 2 आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे 82 टक्के वाटप झाले होते. कर्जत तालुक्यात सर्वाधिक तर तळा तालुक्यात कमी वाटप होते. तर 11 आॅक्टोबरपर्यंतही संचांचे पूर्ण वाटप होऊ शकलेले नाही. त्यात थोडीफार वाढ होऊन हे वाटप 87.18 टक्केपर्यंत पोहोचले आहे. गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा वाटप सुरू होऊन जवळजवळ आता एक महिना होत आला आहे. तरीही रायगड जिल्ह्यात 19 हजार 392 लाभार्थींनी आनंदाचा शिधा संच घेतले नाहीत. जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे 4 लाख 29 हजार 854 लाभार्थ्यांना 100 टक्के शिधा संच उपलब्ध झाले होते. मात्र त्यापैकी 95.70 टक्के अर्थात 4 लाख 10 हजार 462 संचांचे वाटप झाले आहे.

वाहतूकदारांच्या संपामुळे आनंदाचा शिधाचे संच रायगड जिल्ह्यात उपलब्ध होण्यास विलंब झाला. त्यात गणेशोत्सवात आलेल्या सुट्टया व गणेशोत्सवात जिल्ह्यात आलेले चाकरमानी यांच्यासाठी असलेला शिधा न घेताच ते पुन्हा शहराकडे रवाना झाल्याने आनंदाचा शिधाचे संच शिल्लक रहाण्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. शिल्लक रहाणारे आनंदाचे शिधाचे संच जेथे उपलब्ध आहेत त्या ठिकाणच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे त्याच किमतीत वाटप करण्यात येईल असे पुरवठा विभागाने म्हटले होते. मात्र अद्यापही 19 हजार 392 लाभार्थ्यांनी आपले संच घेतलेलेच नाही. सध्या पामतेलाचा घरगुती खाद्य पदार्थांमध्ये वापराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेही नागरिक आनंदाचा शिधा घेण्यास रस दाखवत नसल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यात शिल्लक संच संख्या (वाटपाची टक्केवारी)कर्जत - 574 (98.62), म्हसळा - 195 (98.35),  उरण - 2233 (97.82),  श्रीवर्धन - 1340 (96.94),  मुरुड - 270 (98.34),  रोहा - 2129 (93.05),  अलिबाग - 1693 (95.85),  खालापूर - 3241 (93.65), पनवेल - 7182 (91.41),  माणगाव - 1891 (97.50),  पेण - 965 (97.62), पोलादपूर - 745 (92.41),  सुधागड - 1548 (91.43),  महाड - 1609 (97.92),  तळा - 508 (94.62),  एकूण- 19392 (95.70).

टॅग्स :Raigadरायगड