शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाकडे 19 हजार लाभार्थींची पाठ; महिनाभरात रायगड जिल्ह्यात 95.70 टक्के वाटप 

By निखिल म्हात्रे | Updated: October 29, 2023 17:02 IST

दिवाळी सणाचा आनंदाचा शिधा वाटपाची तारिख निश्चीत झाली तरी गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाचे संच संपलेले नाही.

 अलिबाग - दिवाळी सणाचा आनंदाचा शिधा वाटपाची तारिख निश्चीत झाली तरी गणेशोत्सवातील आनंदाचा शिधाचे संच संपलेले नाही. रायगड जिल्ह्यात 25 ऑक्टोबरपर्यंत 95.70 टक्के संचांचे वाटप झाले आहे. 19 हजार 392 संच अद्यापही शिल्लक आहेत. सर्वात जास्त वाटप कर्जत तालुक्यात तर सर्वात कमी वाटप पनवेल तालुक्यात झाले आहे. आगामी दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटपासाठी शासनाने नियोजन करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखर व एक लीटर खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले संच ‘आनंदाचा शिधा’ गणेशोत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या एक दोन दिवस आधी रास्तभाव धान्य दुकानांवर आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला.

रायगडसाठी शंभर टक्के म्हणजेच 4 लाख 29 हजार 854 संच उपलब्ध झाले होते. वाहतूकदारांच्या संपामुळे आनंदाचा शिधाचे रायगड जिल्ह्यात उपलब्ध होण्यास विलंब झाला. तरीही गणेशोत्सवाच्या एक-दोन दिवस आधीपासून रायगड जिल्ह्यात आनंदाच्या शिधाचे वाटप सुरू झाले होते.  त्यानंतर 2 आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे 82 टक्के वाटप झाले होते. कर्जत तालुक्यात सर्वाधिक तर तळा तालुक्यात कमी वाटप होते. तर 11 आॅक्टोबरपर्यंतही संचांचे पूर्ण वाटप होऊ शकलेले नाही. त्यात थोडीफार वाढ होऊन हे वाटप 87.18 टक्केपर्यंत पोहोचले आहे. गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा वाटप सुरू होऊन जवळजवळ आता एक महिना होत आला आहे. तरीही रायगड जिल्ह्यात 19 हजार 392 लाभार्थींनी आनंदाचा शिधा संच घेतले नाहीत. जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे 4 लाख 29 हजार 854 लाभार्थ्यांना 100 टक्के शिधा संच उपलब्ध झाले होते. मात्र त्यापैकी 95.70 टक्के अर्थात 4 लाख 10 हजार 462 संचांचे वाटप झाले आहे.

वाहतूकदारांच्या संपामुळे आनंदाचा शिधाचे संच रायगड जिल्ह्यात उपलब्ध होण्यास विलंब झाला. त्यात गणेशोत्सवात आलेल्या सुट्टया व गणेशोत्सवात जिल्ह्यात आलेले चाकरमानी यांच्यासाठी असलेला शिधा न घेताच ते पुन्हा शहराकडे रवाना झाल्याने आनंदाचा शिधाचे संच शिल्लक रहाण्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. शिल्लक रहाणारे आनंदाचे शिधाचे संच जेथे उपलब्ध आहेत त्या ठिकाणच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे त्याच किमतीत वाटप करण्यात येईल असे पुरवठा विभागाने म्हटले होते. मात्र अद्यापही 19 हजार 392 लाभार्थ्यांनी आपले संच घेतलेलेच नाही. सध्या पामतेलाचा घरगुती खाद्य पदार्थांमध्ये वापराचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेही नागरिक आनंदाचा शिधा घेण्यास रस दाखवत नसल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यात शिल्लक संच संख्या (वाटपाची टक्केवारी)कर्जत - 574 (98.62), म्हसळा - 195 (98.35),  उरण - 2233 (97.82),  श्रीवर्धन - 1340 (96.94),  मुरुड - 270 (98.34),  रोहा - 2129 (93.05),  अलिबाग - 1693 (95.85),  खालापूर - 3241 (93.65), पनवेल - 7182 (91.41),  माणगाव - 1891 (97.50),  पेण - 965 (97.62), पोलादपूर - 745 (92.41),  सुधागड - 1548 (91.43),  महाड - 1609 (97.92),  तळा - 508 (94.62),  एकूण- 19392 (95.70).

टॅग्स :Raigadरायगड