शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

१८.६४ लाख बांबू व शेवग्याच्या रोपांची होणार लागवड, जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 11:33 IST

वृक्ष लागवड कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड ते संगोपन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

अलिबाग : रायगड जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत १८ लाख ६४ हजार २५२ बांबू व शेवगा जातीची रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्षलागवड कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली आहे.

वृक्षलागवड मोहीम सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे, नदी किनाऱ्यालगतच्या ठिकाणी प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे, शेवग्याची रोपे नागरिकांनी आपल्या परसबागेत लावावीत आशा सूचना आहोत.

लागवड स्पर्धावृक्ष लागवड कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड ते संगोपन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संवर्धनासाठी शपथवृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसाहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवकांचा लोकसहभाग घ्यावा, वृक्षलागवड व संवर्धनासाठी शपथ देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.

वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खड्डे खोदणे, सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून मागणीप्रमाणे रोपे उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाची अंमलबजावणी तातडीने करावी, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दत्तक रोपे वृक्षलागवड यादी, फोटोसह सादर कराव्यात- किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद

टॅग्स :Raigadरायगड