शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात वर्षभरात सर्पदंशाच्या 183 घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:40 IST

साप चावल्याने पाच जणांचा मृत्यू; दोन तासांत उपचार होणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शेतीची कामे जोरात सुरू असताना सर्पदंशाचेही प्रमाण वाढले आहे. सर्पदंशावर उपचारासाठी सरकारी दवाखान्यात औषधांसह सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १८३ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. यातील ५ जणांना उपचार सुरू असताना, आपला जीव गमवावा लागला आहे. सर्पाने दंश केलेल्या रुग्णांना  जीवदान देण्याचा प्रयत्न येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे.साप चावल्यानंतर पहिल्या दोन तासांत प्रथमोपचाराबरोबरच तत्काळ वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते, अन्यथा कोब्रा, फुरसा यांसारख्या सर्पाने दंश केल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते. सरकारी दवाखान्यात वेळेत रुग्ण आणूनही कधी डॉक्टर नाहीत, तर कधी व्हेंटिलेटर ऑपरेटर, तर कधी पुरेशी औषधे नाहीत, या कारणास्त नागरिकांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.  विंचू दंशावर लस शोधून काढणारे महाड येथील डॉ.हिंमतराव बाविस्कर यांच्या मते सर्पदंशावर वेळेत उपचार न मिळाल्यास किडण्या फेल होणे, यांसारखे आजार होतात.

साप चावताच काय काळजी घ्यावी जखम स्वच्छ पाण्याने धुवा.सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा. पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे. सर्पदंश झालेला भाग असेल, तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये. दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये. डॉक्टरांना कल्पना द्यावी, जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल.

गैरसमजुती आणि घ्यावयाची काळजी सापाचे विष मंत्राने उतरत नाही, सर्पदंशावर प्रतिसर्प (स्नेक अँटिव्हेनिन) विष हे एकमेव औषध आहे. व्यक्तीला कडुनिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नका, कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका, धोतऱ्याच्या बिया वगैरे खाण्यास देऊ नका, गरम लोखंड लावणे (डागण्या देणे) चुकीचे आहे, दंश केलेला साप मारून अथवा जिवंत डॉक्टरांकडे नेऊन दाखवू नका, सर्प दंश होताना तो उलटला, तरच विषबाधा होते हे चुकीचे आहे, व्यक्तीने एकट्याने दवाखान्यात न जाता सोबत सहकारी घेऊनच जावे. 

टॅग्स :snakeसाप