शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
3
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
4
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
6
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
7
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
8
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
9
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
10
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
11
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
12
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
13
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
14
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
15
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
16
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
17
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
18
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
19
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
20
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

रायगड जिल्ह्यात वर्षभरात सर्पदंशाच्या 183 घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:40 IST

साप चावल्याने पाच जणांचा मृत्यू; दोन तासांत उपचार होणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शेतीची कामे जोरात सुरू असताना सर्पदंशाचेही प्रमाण वाढले आहे. सर्पदंशावर उपचारासाठी सरकारी दवाखान्यात औषधांसह सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १८३ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. यातील ५ जणांना उपचार सुरू असताना, आपला जीव गमवावा लागला आहे. सर्पाने दंश केलेल्या रुग्णांना  जीवदान देण्याचा प्रयत्न येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे.साप चावल्यानंतर पहिल्या दोन तासांत प्रथमोपचाराबरोबरच तत्काळ वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते, अन्यथा कोब्रा, फुरसा यांसारख्या सर्पाने दंश केल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते. सरकारी दवाखान्यात वेळेत रुग्ण आणूनही कधी डॉक्टर नाहीत, तर कधी व्हेंटिलेटर ऑपरेटर, तर कधी पुरेशी औषधे नाहीत, या कारणास्त नागरिकांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.  विंचू दंशावर लस शोधून काढणारे महाड येथील डॉ.हिंमतराव बाविस्कर यांच्या मते सर्पदंशावर वेळेत उपचार न मिळाल्यास किडण्या फेल होणे, यांसारखे आजार होतात.

साप चावताच काय काळजी घ्यावी जखम स्वच्छ पाण्याने धुवा.सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा. पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे. सर्पदंश झालेला भाग असेल, तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये. दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये. डॉक्टरांना कल्पना द्यावी, जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल.

गैरसमजुती आणि घ्यावयाची काळजी सापाचे विष मंत्राने उतरत नाही, सर्पदंशावर प्रतिसर्प (स्नेक अँटिव्हेनिन) विष हे एकमेव औषध आहे. व्यक्तीला कडुनिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नका, कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका, धोतऱ्याच्या बिया वगैरे खाण्यास देऊ नका, गरम लोखंड लावणे (डागण्या देणे) चुकीचे आहे, दंश केलेला साप मारून अथवा जिवंत डॉक्टरांकडे नेऊन दाखवू नका, सर्प दंश होताना तो उलटला, तरच विषबाधा होते हे चुकीचे आहे, व्यक्तीने एकट्याने दवाखान्यात न जाता सोबत सहकारी घेऊनच जावे. 

टॅग्स :snakeसाप