शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कचराकुंड्यांवर १८ लाखांची उधळपट्टी: पुन्हा होणार मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 23:25 IST

गटविकास अधिकाऱ्यांकडून पाहणी

नेरळ : ग्रामपंचायत हद्दीत चौदा वित्त आयोगाच्या निधीतून ४० कचराकुंड्या उभारण्यासाठी तब्बल १८ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. यात मोठा अपहार झाल्याची चर्चा नेरळ शहरात सुरू असून चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केले असताना ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता ठेकेदाराला १८ लाख रुपयांचे बिल अदा केले आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर आणि ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी बुधवार, १७ जून रोजी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील त्या कचराकुंड्यांची पाहणी केली.नेरळ ग्रामपंचायत हद्दीत १८ लाख रुपये खर्च करून ४० कचराकुंड्या उभारण्यात आल्या आहेत. तर काही जुन्याच कचराकुंड्यांची डागडुजी करून नव्याने बिल काढण्यात आले आहे. एका कचराकुंडीचे सुमारे ४५ हजार रुपये आशा ४० कुंड्यांचे १८ लाख रुपये बिल लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये कचराकुंड्या उभारण्यात मोठा अपहार झाल्याची चर्चा सुरू आहे. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नेरळकरांची होती. त्यानुसार पंचायत समितीकडून त्या कुंड्यांची पाहणी करण्यात आली. नेरळ शहरातील डम्पिंग ग्राउंडची सुधारण्या करण्याऐवजी कचराकुंड्या उभारण्यात १८ लाखांची उधळपट्टी केल्याने नेरळकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी गरज नाही, त्या ठिकाणीसुद्धा कचराकुंड्या उभारण्यात आल्या आहेत. या कचराकुंड्या पाच बाय तीन फुटांच्या तर काही ठिकाणी कमी आकाराच्या आहेत. या कुंड्यांना लोखंडी दरवाजेदेखील लावण्यात आले नाहीत असे असताना अगोदरच ठेकेदाराला बिल अदा करण्याची घाई ग्रामपंचायतीने केली. गटविकास अधिकारी यांनी १७ जून रोजी कचराकुंड्यांची पाहणी करून पुन्हा इन्स्टिमेंट तयार करण्यास सांगितले.नेरळ ग्रामपंचायत हद्दीत ज्या ठिकाणी कचराकुंड्या बांधल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पंचायत समितीचे इंजिनीअर गुलाबराव देशमुख यांनी कचराकुंड्यांचे मूल्यांकन केले होते. आता पुन्हा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कर्जतचे प्रभारी अभियंता पी. एस. गोपणे यांच्याकडून मूल्यांकन मागविले आहे. आठवडाभरात मूल्यांकन देण्यास सांगितले आहे.- बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत