शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

१७१ गावांमध्ये पाणीटंचाई?

By admin | Updated: March 31, 2016 02:42 IST

पेण खारेपाटासह तालुक्याच्या इतर गाववाड्यांमध्ये यावर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण जनतेला बसत आहेत. पाण्यासाठी वाशी खारेपाटासह मसद-शिर्की परिसरातील वाडीवाल्यांवर

- दत्ता म्हात्रे,  पेण

पेण खारेपाटासह तालुक्याच्या इतर गाववाड्यांमध्ये यावर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण जनतेला बसत आहेत. पाण्यासाठी वाशी खारेपाटासह मसद-शिर्की परिसरातील वाडीवाल्यांवर यावर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. पेण पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणार्थ केलेला कृती आराखडा तब्बल १ कोटी ८४ लाख रुपयांचा असून कागदावरची ही प्रतिबंधात्मक उपाययोजना कृतीमध्ये सपशेल फेल ठरली आहे. पेणच्या शिवारातील आंबेघर व हेटवणे धरणात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक असूनदेखील राजकीय अनास्थेपोटी पेणची ५५ गावे ११६ वाड्या मिळून १७१ गावांमध्ये पाणीटंचाईने सामान्यांची ससेहोलपट होणार आहे. टँकरव्दारे पाणीपुरवठ्यासाठी ५४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पेणच्या पाणीटंचाईवर उपाययोजना न केल्याने ही वास्तवता गंभीर रूप धारण करणार आहे. यावर्षीचा मान्सून सरासरी ७० टक्केच झाला. त्यामुळे शिवारात पाण्याचा साठा झाला नाही. वापरावयाचे पाणी जानेवारीच्या प्रारंभीच संपल्याने जनतेला नळ पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. तलाव, शेततळी, नदीपात्र, नाले यांच्यावरील पाणीसाठा संपल्याने गावपाड्याचे हक्काचे वापरण्याचे पाणी आटले. लोकांना गावातून पेण शहरात स्थलांतर करावे लागले. दुसरीकडे हेटवणे व आंबेघर धरणात पाण्याचा मोठा साठा आहे. मात्र थेट वितरण व्यवस्था नसल्याने पाणी धरणातच पडून आहे. दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा बनवून लाखो रुपयांचा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर अनावश्यक खर्च करणारे शासन व रायगड जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दरवर्षी पाणीटंचाई परीक्षेत नापास होते. मुख्यमंत्र्यांनी हेटवणे धरणातून थेट पाणी खारेपाटातील गावांना देण्यासाठी एमएमआरडीएमधून ४० कोटी रुपयांची तरतूद के ली आहे. मात्र तो निधी उपलब्ध होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पेण शहरात भरपूर पाणी मिळत असल्याने शासनाच्या टँकरपेक्षा विकतचे पाणी आॅटोरिक्षा, विक्रम-मिनीडोर तसेच टेम्पोद्वारे नागरिक १०० रुपये भाडे भरुन नेत आहेत. टँकरद्वारे ५४ लाखांची तरतूद केली असताना टँकरच उपलब्ध नसल्याने तो कृती आराखडा काय कामाचा? याकडे जिल्हाधिकारी व संबंधित पेणच्या पाणीयंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एप्रिलच्या प्रारंभीच पेण पंचायत समिती व पेण तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चे धडकू लागल्याने पेणची पाणीटंचाई यावर्षी शासकीय यंत्रणेला चांगलीच महागात पडणार आहे.पेण पंचायत समितीमार्फत सध्या दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र त्या टँकरची अवस्था आणि रस्त्याचे स्वरूप पाहाता प्रशासनाची चीड यावी, अशी अवस्था आहे. पाणीटंचाईची भीषण दाहकता असूनदेखील पंचायत समिती टँकर उपलब्ध करण्यासाठी हतबल आहे. दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा कसा होणार. पेण तहसील प्रशासनाने ६ टँकर अधिग्रणासाठी पेण पंचायत समितीला प्रस्ताव सादर केलाय. मात्र खाजगी टँकर मालकांच्या देवाणघेवाणीवरून सारं घोडं अडलं आहे. आता ८ एप्रिलपासून चैत्र नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. नवमीनंतर प्रत्येक गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. ग्रामीण ग्रामदेवतांच्या जत्रा अक्षयतृतियेपर्यंत चालणार असून या प्रसंगी विकतचे पाणी आणावे लागणार आहे. २९ मार्चला पेण तहसीलदार कार्यालयाकडून आदेश मिळाले आहेत. आम्ही बुधवारी सहा टँकर अधिग्रहणाची मागणी केली असून सहा ते सात दिवस टँकर उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागेल.- जे. पी. म्हात्रे, टँकरव्दारे पाणीपुरवठा विभाग, पं. समिती