शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कारागृहातील वैचारिक सीमोल्लंघनाची १५ वर्षांची यशस्वी परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:45 IST

अलिबाग : हिराकोट किल्ल्यातील रायगड जिल्हा कारागृहातील बंदिजनांकरिता योगाभ्यासाचे वर्ग घेणारे ठाण्यातील निकम गुरुजींनी स्थापन केलेल्या श्री अंबिका योग ...

अलिबाग : हिराकोट किल्ल्यातील रायगड जिल्हा कारागृहातील बंदिजनांकरिता योगाभ्यासाचे वर्ग घेणारे ठाण्यातील निकम गुरुजींनी स्थापन केलेल्या श्री अंबिका योग कुटीरच्या अलिबाग शाखेचे योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी याच कारागृहात सुरू केलेल्या शारदोत्सव उपक्रमास यंदा चौदा वर्षेपूर्ण होत आहेत.आपल्या एखाद्या चुकीमुळे गुन्हा केल्याने कारागृहात येणारे बंदिजन त्याचा पश्चात्ताप करीत असतात. अशा परिस्थितीत त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, त्याचे विपरीत परिणाम त्याच्या निष्पाप कुटुंबीयांना भोगावे लागू नये, यासाठी बंदिजनांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणण्याच्या हेतूने तसेच कारागृहातून मुक्त झाल्यावर पुन्हा एक नवे आयुष्य जगण्याची उमेद देऊन एक चांगला नागरिक म्हणून समाजाने त्यास स्वीकारावे अशा दृष्टिकोनातून गेल्या बावीस वर्षांपासून अलिबागमधील हिराकोट जिल्हा कारागृहात योग शिक्षक वीरेंद्र पवार हे बंदिजनांकरिता मोफत योगाभ्यास वर्ग घेत आहेत.बंदिजनांच्या मानसिक परिवर्तनाकरिता काही वैचारिक मंथन झाले तर परिवर्तनाची ही प्रक्रि या अधिक गतिमान होऊ शकेल अशा विश्वासातून त्यांनी कारागृह प्रशासनाबरोबर चर्चा करून बंदिजनांकरित शारदोत्सव उपक्रम करण्याची अभिनव कल्पना मांडली. तत्कालीन कारागृह प्रशासनाने देखील या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सन २००४ मध्ये या अनोख्या शारदोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली.पवार यांनी बंदिजनांसाठीच्या या आगळ््या शारदोत्सवाकरिता अत्यंत विचारपूर्व विशेष नियोजन केले आहे. आपल्याच समाजात असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना हिराकोट कारागृहात निमंत्रित करून त्यांचा संवाद बंदिजनांबरोबर साधून देण्याचे हे नियोजन आहे. मान्यवरांना पवार त्यांच्या समोरचा श्रोतृवृंद नेमका कोण आहे, त्यांची मानसिकता काय असते, बोलताना कोणती पथ्ये पाळावी हे सांगतात. परिणामी, वक्त्यांना कार्यक्रमाची नेमकी कल्पना येते.विविध क्षेत्रातील मान्यवरांना कारागृहातील या शारदोत्सवात निमंत्रित करण्याचा दुसरा आणि महत्त्वाचा हेतू म्हणजे कारागृहातून बंदिजन बाहेर पडून पुन्हा समाजात आल्यावर समाजातील हे काही मान्यवर घटक त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरावेत असा आहे. गेल्या १५ वर्षांत हा हेतू साध्य झाल्याचा पवार यांचा अनुभव आहे.

 

टॅग्स :RaigadरायगडPrisonतुरुंग