शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महासंघाचे २१ पैकी १४ उमेदवार बिनविरोध

By admin | Updated: April 29, 2017 01:51 IST

रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीतील एकू ण २१ जागांकरिता उभ्या केलेल्या गिरीश तुळपुळे

अलिबाग : रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीतील एकू ण २१ जागांकरिता उभ्या केलेल्या गिरीश तुळपुळे गटाच्या उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांनी अपात्र ठरवले होते. त्यावर तुळपुळे गटाने जिल्हा उपनिबंधक पी. एम. खोडक यांच्याकडे अपिल केले असता, त्यांनीही अर्ज अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले. जिल्हा उप निबंधकांच्या निर्णयास तुळपुळे गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असता, उच्च न्यायालयानही मूळ अर्ज अपात्रतेच्याच निर्णयावर शिक्कामोर्तब केले. परिणामी, २१ जागांकरिता उभ्या असलेल्या प्रा. डॉ. उदय जोशी गटाचे १३ व अन्य एक अशा १४ पात्र उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे.महासंघाच्या उर्वरित ७ जागांपैकी ३ जागा रिक्त राहिल्या असून, अन्य चार जागांकरिता ८ मे २०१७ रोजी मतदान होणार असून त्यानंतर औपचारिक घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी हे करतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ एप्रिल २०१७ पर्यंत होती. उमेदवारी घेण्याची मुदत संपल्यानंतर एकूण ६ मतदार संघातील १४ जागांकरिता १४ उमेदवारच पात्र असल्यामुळे या सर्व १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.बिनविरोध निवडून आलेल्या १४ उमेदवारांपैकी १३ उमेदवार प्रा. डॉ. उदय जोशी यांच्या पॅनेलचे असून, या १३ उमेदवारांमध्ये अ‍ॅड. जे. टी. पाटील (अलिबाग), अ‍ॅड. सागर पाटील (अलिबाग), अ‍ॅड. संतोष पवार (अलिबाग), अ‍ॅड. के. एस. पाटील (पनवेल), हेमंत पाटील (उरण), प्रकाश चांदिवडे (कळंबोली), दिलीप पटेल (रेवदंडा), चंद्रकांत घोसाळकर (पाली), दिलीप जोशी (मुरुड), जगदीश कवळे (अलिबाग), योगेश मगर (वेश्वी-अलिबाग), श्यामकांत भोकरे (बोर्लीपंचतन-श्रीवर्धन) व निजामुद्दीन कागदी (साई-माणगाव) यांचा समावेश आहे. चौदावे गणेश म्हात्रे (चिरनेर-उरण) हेसुद्धा बिनविरोध निवडून आले आहेत.महासंघाच्या ज्या ४ जागांकरिता निवडणूक होणार आहे, त्यामध्ये प्रा. डॉ. उदय जोशी पॅनलचे महिला राखीवकरिता कविता प्रवीण ठाकूर (अलिबाग) व उषा लक्ष्मण चांदगावकर (रोहा) तर अनुसूचित जाती-जमाती राखीव जागेकरिता संजय बाबूराव वानखेडे (पिंपळभाट-अलिबाग) व विशेष मागास प्रवर्गातून नरसिंह बाळकृष्ण मानाजी हे निवडणूक लढवित आहेत. (विशेष प्रतिनिधी)