शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेतकऱ्यांना १२७ कोटींचे कर्ज

By admin | Updated: September 8, 2015 00:02 IST

सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करण्याच्या परंपरेला आता छेद दिला जात आहे. जिल्हा अग्रणी बँकेच्या छताखाली असणाऱ्या २५ बँकांतील ४१३ शाखांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य केले आहे.

- आविष्कार देसाई,  अलिबागसावकाराकडून कर्ज घेऊन शेती करण्याच्या परंपरेला आता छेद दिला जात आहे. जिल्हा अग्रणी बँकेच्या छताखाली असणाऱ्या २५ बँकांतील ४१३ शाखांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य केले आहे. २७ हजार ८५९ शेतकऱ्यांना १२७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप त्यांनी केले आहे. यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ६७ कोटी २० लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. कोकण विभागात पुन्हा अग्रस्थानी राहण्याचा मान बँक आॅफ इंडियाच्या रायगड शाखेने मिळविला आहे.जिल्ह्यातील शेतीच्या विकासातून शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी बँक आॅफ इंडियाने विशिष्ट नियोजन केले आहे. त्यानुसार विविध बँकांना टार्गेट देण्यात आले आहे. २०१५ या आर्थिक वर्षामध्ये १३७ कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले असून आतापर्यंत १२७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. १० कोटी रुपयांचे कर्ज अद्यापही वाटप करावयाचे शिल्लक आहे. पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्ग येथे मोठ्या संख्येने विकसित झाल्याचे दिसून येते. सुमारे ८५ टक्के कर्जदार कर्जाची परतफेड मुदतीत करत असल्याचेही उघड झाले आहे.पूर्वी येथील शेतकरी खाजगी सावकारांकडून शेतीसाठी कर्ज घ्यायचा. तेथे त्याची आर्थिक कुचंबणा केली जायची. आज मात्र जिल्ह्यातील परिस्थिती बदलत आहे. अग्रणी बँकेने घेतलेला पुढाकार, नागरिकांमध्ये करीत असलेली जनजागृती यामुळे बँकांकडे पाहण्याचा कल आता बदलत आहे. २०१२ या कालावधीमध्ये ४२ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले होते. त्याचप्रमाणे २०१३- ६१ कोटी रुपये, २०१४-८१ कोटी आणि २०१५ या वर्षी १२७ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियानेही आतापर्यंत ७१५ शेतकऱ्यांना सुमारे १० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या आकडेवारीवरून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होते. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख शेतकऱ्यांपैकी फक्त ३० हजार शेतकरीच सध्या कर्ज घेत आहेत. त्यामुळे विविध बँकांना रायगड जिल्हा ही मोठी आर्थिक बाजारपेठ असल्याचे निरीक्षण लिड बँकेने नोंदविले आहे.127 कोटी रुपयांच्या कर्जवाटपांमध्ये राष्ट्रीय बँकांचा हिस्सा हा ५१ कोटी ५६ लाख रुपयांचा आहे. खाजगी बँकांनी आठ कोटी १५ लाख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६७ कोटी २० लाख रुपये असे १२७ कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. स्टेट बँक आॅफ हैद्राबाद, अ‍ॅक्सिस बँकेने एक रुपयाचेही कर्ज शेतकऱ्यांना दिेले नाही.शेतकऱ्यांचा बँकांकडून कर्ज घेण्याचा कल वाढला हे खासगी सावकारांकडून कर्ज न घेण्याचेच द्योतक आहे. ज्या बँका कर्ज देण्यास नकार देतील त्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. शेतकऱ्यांनी बिनव्याजी कर्जाचा लाभ घ्यावा आणि शेतीतून समृध्द व्हावे.-टी.मधुसूदन, अग्रणी बँक, जिल्हा प्रबंधक