शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

११ कोटींमध्ये होणाऱ्या धरणाचा खर्च पोहोचला २ हजार कोटींवर; केवळ आकड्यांचा खेळ

By राजेश भोस्तेकर | Updated: August 18, 2023 08:53 IST

६० वर्षांत सांबरकुंड धरण कागदावरच

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क रायगडःअलिबागचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी १९६२ पासून प्रस्तावित असलेले सांबरकुंड धरण २०२३ उजाडले तरी शासनाच्या नाकर्तेपणामुळे रखडले आहे. या धरणाचे भविष्य कधी उजाडेल याची अलिबागकर वाट पाहत आहेत. ११ कोटींच्या धरणासाठी महाविकास आघाडी सरकारने ७५० कोटी मंजूर केले होते. तर आता शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने अजून अडीच पट भर टाकून त्याचा खर्च २ हजार कोटी रुपयांवर नेला आहे.

अलिबाग शहराचा वाढता पसारा लक्षात घेऊन भविष्यात पाणी समस्या निर्माण होईल, हे लक्षात घेऊन हे नियोजित धरण बांधण्याचे ठरवले. आज ६० वर्षांत धरणाची कोटीच्या कोटी उड्डाणे वाढली असली तरी प्रत्यक्षात धरण अजूनही स्वप्नवत राहिले आहे. अलिबाग तालुक्याची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात पोहोचली आहे. तसेच, अलिबाग हा पर्यटन तालुका आहे. त्यामुळे पर्यटकांची भर नेहमीच तालुक्यात असते. अलिबागला एमआयडीसी आणि उमटे, तीनविरा या धरणांतून नागरिकांना पाणीपुरवठा रोज होत असतो. 

भूसंपादनाची प्रक्रिया ६० वर्षांची 

अलिबाग तालुक्यातील रामराज विभागात सांबरकुंड धरण पाच वाड्यावर प्रस्तावित आहे. यासाठी शासनाने जागाही भूसंपादन करण्याची प्रक्रिया साठ वर्षांपासून केलेली आहे. त्यावेळी धरणग्रस्त यांचा मोबदला, बांधकाम खर्च असा एकूण ११ कोटी खर्च होणार होता. मात्र, त्यानंतर प्रस्तावित असलेले हे सांबरकुंड धरणाचा प्रश्न मागे पडला.

दोन दिवसांत निधी मिळणार?

खानाव येथील एका कार्यक्रमात बुधवारी आमदास महेंद्र दळवी यांनी सांबरकुंड धरण लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठी दोन हजार कोटी मंजूर केल्याचे म्हटले. एक-दोन दिवसात निधी मिळेल असेही म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा सांबरकुंड धरणाचे स्वप्न निर्माण झाले आहे.

साधारण २५ ते ३० दलघमी पाणी अलिबाग तालुक्याला लागते. मात्र, सध्या वाढत असलेले शहरीकरण, उभ्या राहत असलेल्या इमारती यामुळे पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मात्र, पाण्याचे असलेले स्रोतही अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे नवे धरण होणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :alibaugअलिबाग