शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
5
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
6
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
7
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
8
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
9
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
10
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
11
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
12
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
13
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
14
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
15
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
16
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
17
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
18
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
19
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
20
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर

११ कोटींमध्ये होणाऱ्या धरणाचा खर्च पोहोचला २ हजार कोटींवर; केवळ आकड्यांचा खेळ

By राजेश भोस्तेकर | Updated: August 18, 2023 08:53 IST

६० वर्षांत सांबरकुंड धरण कागदावरच

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क रायगडःअलिबागचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी १९६२ पासून प्रस्तावित असलेले सांबरकुंड धरण २०२३ उजाडले तरी शासनाच्या नाकर्तेपणामुळे रखडले आहे. या धरणाचे भविष्य कधी उजाडेल याची अलिबागकर वाट पाहत आहेत. ११ कोटींच्या धरणासाठी महाविकास आघाडी सरकारने ७५० कोटी मंजूर केले होते. तर आता शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने अजून अडीच पट भर टाकून त्याचा खर्च २ हजार कोटी रुपयांवर नेला आहे.

अलिबाग शहराचा वाढता पसारा लक्षात घेऊन भविष्यात पाणी समस्या निर्माण होईल, हे लक्षात घेऊन हे नियोजित धरण बांधण्याचे ठरवले. आज ६० वर्षांत धरणाची कोटीच्या कोटी उड्डाणे वाढली असली तरी प्रत्यक्षात धरण अजूनही स्वप्नवत राहिले आहे. अलिबाग तालुक्याची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात पोहोचली आहे. तसेच, अलिबाग हा पर्यटन तालुका आहे. त्यामुळे पर्यटकांची भर नेहमीच तालुक्यात असते. अलिबागला एमआयडीसी आणि उमटे, तीनविरा या धरणांतून नागरिकांना पाणीपुरवठा रोज होत असतो. 

भूसंपादनाची प्रक्रिया ६० वर्षांची 

अलिबाग तालुक्यातील रामराज विभागात सांबरकुंड धरण पाच वाड्यावर प्रस्तावित आहे. यासाठी शासनाने जागाही भूसंपादन करण्याची प्रक्रिया साठ वर्षांपासून केलेली आहे. त्यावेळी धरणग्रस्त यांचा मोबदला, बांधकाम खर्च असा एकूण ११ कोटी खर्च होणार होता. मात्र, त्यानंतर प्रस्तावित असलेले हे सांबरकुंड धरणाचा प्रश्न मागे पडला.

दोन दिवसांत निधी मिळणार?

खानाव येथील एका कार्यक्रमात बुधवारी आमदास महेंद्र दळवी यांनी सांबरकुंड धरण लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठी दोन हजार कोटी मंजूर केल्याचे म्हटले. एक-दोन दिवसात निधी मिळेल असेही म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा सांबरकुंड धरणाचे स्वप्न निर्माण झाले आहे.

साधारण २५ ते ३० दलघमी पाणी अलिबाग तालुक्याला लागते. मात्र, सध्या वाढत असलेले शहरीकरण, उभ्या राहत असलेल्या इमारती यामुळे पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मात्र, पाण्याचे असलेले स्रोतही अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे नवे धरण होणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :alibaugअलिबाग