शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दहावीमध्ये यंदाही मुलीच ठरल्या हुशार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 23:47 IST

रायगडमध्ये दहावीचा निकाल ९६.७ टक्के : गेल्या वर्षीच्या तुलनेत पास होण्याचा आलेख १९.२९ टक्क्यांनी उंचावला

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.७ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. ९७.३३ टक्के मुली तर ९४.२१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल तब्बल १९.२९ टक्क्यांनी वाढला आहे. महाड आणि पनवेल तालुक्यातील प्रत्येकी ९७.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने, ते तालुक्यात पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. सर्वाधिक ९३.०४ टक्के कमी निकाल हा खालापूर तालुक्याचा लागला आहे. आॅनलाइन निकाल कळताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक ९८.७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला आहे, तर सर्वात कमी ९२ टक्के निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. हा निकाल वाढण्यामागचे नेमके कारण समोर आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या, तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत, तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतिपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुणांमुळे या वर्षी निकालाचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या, तसेच विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या कालावधीतही मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरूच ठेवले होते. यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे.अलिबाग तालुक्याचा ९६.०५ टक्के निकाल लागला आहे. ४३ शाळेतून २८०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २६९७ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामध्ये मुलं पास होण्याचे प्रमाण हे ९४.८८ टक्के तर मुलींचे प्रमाण हे ९७.३९ टक्के आहे.प्रणवीला मिळाले १०० टक्केअलिबाग : बुधवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अलिबाग शहरातील कुरुळ येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आर.सी.एफ शाळेतील प्रणवी बसंत सिंह हिने १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. प्रणवी हिने मिळविलेल्या घवघवित यशाचे शाळेच्या वतीने कौतूक करण्यात येत आहे. यातील विशेष बाब म्हणजे निकाल १०० टक्के लागला आहे.३३ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण1मागील वर्षी मार्च, २०१९ मध्ये ८०:२० पॅटर्न रद्द करून, सर्व विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे निकालाची टक्केवारी चांगलीच घसरली होती,2परंतु राज्य सरकारच्या आदेशानुसार, राज्य मंडळाने मार्च, २०२० मध्ये पुन्हा ८० गुणांची लेखी आणि २० गुणांची तोंडी परीक्षा घेतल्यामुळे यंदा निकालात १९.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.3रायगड जिल्ह्यात ५५१ शाळांतील ३५ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ३५ हजार १६० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यातील ३३ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९६.७ टक्के आहे.