शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहावीमध्ये यंदाही मुलीच ठरल्या हुशार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 23:47 IST

रायगडमध्ये दहावीचा निकाल ९६.७ टक्के : गेल्या वर्षीच्या तुलनेत पास होण्याचा आलेख १९.२९ टक्क्यांनी उंचावला

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.७ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. ९७.३३ टक्के मुली तर ९४.२१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल तब्बल १९.२९ टक्क्यांनी वाढला आहे. महाड आणि पनवेल तालुक्यातील प्रत्येकी ९७.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने, ते तालुक्यात पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत. सर्वाधिक ९३.०४ टक्के कमी निकाल हा खालापूर तालुक्याचा लागला आहे. आॅनलाइन निकाल कळताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक ९८.७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला आहे, तर सर्वात कमी ९२ टक्के निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. हा निकाल वाढण्यामागचे नेमके कारण समोर आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या, तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत, तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतिपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुणांमुळे या वर्षी निकालाचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या, तसेच विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या कालावधीतही मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरूच ठेवले होते. यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे.अलिबाग तालुक्याचा ९६.०५ टक्के निकाल लागला आहे. ४३ शाळेतून २८०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २६९७ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामध्ये मुलं पास होण्याचे प्रमाण हे ९४.८८ टक्के तर मुलींचे प्रमाण हे ९७.३९ टक्के आहे.प्रणवीला मिळाले १०० टक्केअलिबाग : बुधवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अलिबाग शहरातील कुरुळ येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आर.सी.एफ शाळेतील प्रणवी बसंत सिंह हिने १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. प्रणवी हिने मिळविलेल्या घवघवित यशाचे शाळेच्या वतीने कौतूक करण्यात येत आहे. यातील विशेष बाब म्हणजे निकाल १०० टक्के लागला आहे.३३ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण1मागील वर्षी मार्च, २०१९ मध्ये ८०:२० पॅटर्न रद्द करून, सर्व विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे निकालाची टक्केवारी चांगलीच घसरली होती,2परंतु राज्य सरकारच्या आदेशानुसार, राज्य मंडळाने मार्च, २०२० मध्ये पुन्हा ८० गुणांची लेखी आणि २० गुणांची तोंडी परीक्षा घेतल्यामुळे यंदा निकालात १९.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.3रायगड जिल्ह्यात ५५१ शाळांतील ३५ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ३५ हजार १६० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यातील ३३ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९६.७ टक्के आहे.