शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एक लाख रुग्णांसाठी 108 ठरली जीवनदायी; 1 लाख 73 हजार 645 रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेण्यात यश

By निखिल म्हात्रे | Updated: March 1, 2024 11:10 IST

ग्रामीण भागासह शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सुरु असलेली 108 रुग्णवाहिका जिवनदायी ठरत आहे.

अलिबाग - ग्रामीण भागासह शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सुरु असलेली 108 रुग्णवाहिका जिवनदायी ठरत आहे. या रुग्णवाहीकेने आतापर्यंत 1 लाख 73 हजार 645 रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेण्यात यश आल्याने त्यांना योग्य उपचार मिळाले आहेत. तर दुसरीकडे प्रसूतीसाठी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना याच रुग्णवाहिकेमध्ये तब्बल 3 हजार 201 बाळांचा जन्म झाला आहे. त्यामुळे आई आणि बाळांसाठी हीच रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे.

जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या एका वर्षात रायगड जिल्ह्यातील 1 लाख 73 हजार 645 रुग्णांना महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाच्या 108 रुग्णवाहिकेने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. अपघातात जखमी झालेले रुग्ण, आगीसारख्या घटनांमध्ये भाजलेले रुग्ण, हृदयरुग्ण, उंचावरून पडून जखमी झालेले, विषबाधा झालेले, एखाद्या आपत्तीत झालेली सामूहिक इजा, गर्भवती महिला, आत्महत्येसारखा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती अशा अनेकांना या सेवेचा उपयोग झाला आहे.

अपघातमध्ये जखमी झालेल्या 8 हजार 518 जखमींना उपचारासाठी ‘108’ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भांडण तंटे किंवा हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 1,104 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 853 भाजलेल्या रुग्णांना ‘108’ ने रुग्णालयात दाखल केले आहे. हृदयाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या 1,543 रुग्णांना तातडीने उपचार करण्यासाठी ‘108’ ची मदत झाली आहे. खाली पडल्याने जखमी झालेल्या 4,359 नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या 4,490 बाधितांना उपचारासाठी ‘108’ रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले आहे. प्रसूतीसाठी 24,033 महिलांना मदत झाली आहे. मोठ्या संख्येने जखमी झालेल्या 553 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात ‘108’ रुग्णवाहिकेला यश आले आहे. विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या 100, वैद्यकीय उपचासाठी एक लाख 12 हजार 081, इतर आजारांच्या उपचारासाठी 13 हजार 669 आणि पॉली ट्रामाच्या 3432 आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 120 नागरिकांना अधिक उपचारासाठी ‘108’ रुग्णवाहिकेने त्यांचा जीव वाचवण्यासाठी मदत केली आहे.

108 रुग्णवाहिका मोफत सेवा देते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. सदरची सेवा रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देण्यात यशस्वी ठरत असल्याने ती जीवनदायिनी ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही सेवा अतिशय चांगली आहे.

- कांचन बिडवई, उपजिल्हा व्यवस्थापक, रायगड