शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ग्रामीण विकासासाठी १०४ कोटी

By admin | Updated: March 25, 2016 00:50 IST

रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे ध्यास समोर ठेवून २०१५-१६ चा १०४ कोटी ८७ लाख २ हजार रुपये खर्चाचा ‘अब्जोन्नती अर्थसंकल्प’ बहुमताने मंजूर करण्यात आला. अर्थ व बांधकाम

अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे ध्यास समोर ठेवून २०१५-१६ चा १०४ कोटी ८७ लाख २ हजार रुपये खर्चाचा ‘अब्जोन्नती अर्थसंकल्प’ बहुमताने मंजूर करण्यात आला. अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या नाना पाटील सभागृहात हा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला. आगामी २०१६-१७ चा मूळ अर्थसंकल्प हा ७० कोटी ९० लाख ९० हजार ४१२ रुपयांचा मांडण्यात आला आहे.सभागृहाचे कामकाज सुरु होतानाच विरोधातील शिवसेनेच्या सदस्यांनी बैठकीचा अजेंडा न पोचल्याचे कारण देत त्यांनी सभात्याग केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.दुपारी साडेतीन वाजता अर्थसंकल्पाच्या बैठकीला सुरुवात झाली. अविश्वास ठराव जिंकल्याचा आनंद सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. त्याचवेळी विरोधक मात्र आपापल्या बाकावर गप्प बसले होते. शिवसेनेचे आक्रमक सदस्य महेंद्र दळवी, राजीव साबळे त्याचप्रमाणे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि शिवसेनेच्या सोबत असलेले शामकांत भोकरे हे सभागृहात दिसून आले नाहीत. अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दु:खाचे आणि आनंदाचे ठराव मांडण्यासाठी सुरुवात करताच विरोधक आक्रमक झाले. सभेचा अजेंडा प्राप्त झाला नसल्याबाबत सूर्यकांत कालगुडे यांच्यासह अन्य सदस्यांनी अध्यक्षांना विचारणा केली. त्यामुळे सभागृहात वातावरण तापले.सुरेश टोकरे यांचा पारा चढलासभागृहाबाहेर सुमारे ३४ डिग्री तापमान होते. त्याचवेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सुरेश टोकरे यांनी विरोधकांना बसण्याची विनंती केली मात्र विरोधक ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. तेव्हा टोकरे यांचा पारा चढला, सदस्यांनी प्रथमच टोकरे यांचे हे रूप पाहिल्याने सर्व अवाक झाले. सभागृहाने म्हणणे ऐकून न घेतल्याचे कारण देत विरोधकांनी सभात्याग केला. त्यावेळी त्यांनी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. स्वतंत्र दरामुळे घरांच्या किमती वाढणार लघुउद्योग, मोठे उद्योग आणि वाणिज्य कारणांसाठी जिल्हा परिषदेकडून बिन शेती ना हरकत दाखला देताना आकारण्यात येणारे शुल्क त्याचवेळी वसूल करण्यात येणार आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून जमिनीचे प्लॉटिंग करून त्यांची विक्री करणे, विकासकामार्फत इमारत बांधून सदनिकांची विक्री करणे यासाठीची बिनशेती ना हरकत परवानगी आता वाणिज्य प्रकारात गृहीत धरली जाणार आहे. त्यासाठी आता स्वतंत्र दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.104 कोटींचा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प चित्रा पाटील यांनी सादर केला. मात्र विरोधकांना यात त्रुटी आढळल्याने सभात्याग केला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे संतप्त झाले होते. सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण होते. इमारती व दळणवळणासाठी १५ कोटी ५० लाख रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिक्षणासाठी ३ कोटी, पाटबंधारे योजनेसाठी २ कोटी ७५ लाख, आरोग्य २ कोटी ५० लाख, ग्रामीण पाणीपुरवठा १३ कोटी, कृषी ३ कोटी ५० लाख, पशुसंवर्धन २ कोटी, समाज कल्याण १३ कोटी, अपंग कल्याण १ कोटी ९५ लाख, सामूहिक विकास ५ कोटी ५० लाख.स्वच्छ भारत अभियान हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी पाणी व स्वच्छता विभागाकडून सुमारे ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र केवळ ७ लाख ३६ हजार रुपयांवर बोळवण करण्यात आली. त्यामुळे या विभागाला सीएसआरच्या निधीवर अवलंबून राहावे लागणार आहे.