शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जिल्ह्यातील १२६ शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Updated: June 14, 2017 03:13 IST

दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता मंगळवारी संपली. दहावीच्या निकालावरून समाज माध्यमांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता मंगळवारी संपली. दहावीच्या निकालावरून समाज माध्यमांवर उसळलेल्या उलटसुलट चर्चेवर राज्य मंडळाने आॅनलाइन निकाल जाहीर करून अखेर पडदा टाकला. जिल्ह्याचा निकाल हा ८९.९३ टक्के लागला आहे. रायगड जिल्ह्यातील ५४४ शाळांपैकी १२६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ जुलैपासून परीक्षा घेण्यात येणार आहे.मार्च २०१७ मध्ये दहावीची परीक्षा पार पडली होती. जिल्ह्यातून तब्बल ३७ हजार ७८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जीवनाला दिशा देणाऱ्या या परीक्षेमध्ये मुलींनी उत्तुंग कामगिरी करत मुलांना मागे टाकले आहे. जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांच्या सुमारे ५४४ शाळा आहेत. पैकी १२६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. या शाळेतील दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व म्हणजे १०० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे केवळ १० टक्केच आहे. १४ जूनपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतींसाठी अर्ज करता येणार आहेत. याबाबतच्या अर्जाचा नमुना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आहे. जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांच्यासाठी परीक्षा मंडळामार्फत पुन्हा १८ जुलै २०१७ पासून परीक्षा घेण्यात येणार आहे.