शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१० कोटींचा निधी गेला परत

By admin | Updated: April 2, 2016 02:56 IST

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीला देण्यात आलेल्या १५० कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने १० कोटी ५४ लाख, डोंगरी विकासाचा

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीला देण्यात आलेल्या १५० कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने १० कोटी ५४ लाख, डोंगरी विकासाचा १७ लाख असा सुमारे १० कोटी ७१ लाख रुपयांचा निधी समर्पित करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. गतिमान सरकारने भरघोस विकास निधी दिला मात्र संबंधित यंत्रणांकडून खर्च करण्याच्या नियोजनात जिल्हा प्रशासन कमी पडल्याचे समोर आले आहे. जलयुक्त शिवार योजनेचा पाच कोटी १५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या खात्यावर वळवून तो निधी वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा नियोजन समितीला सरकारने २०१५-१६ साठी १५० कोटी ९९ लाख रुपये दिले होते. त्यापैकी विविध योजनांवर १४० कोटी ४५ लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र १० कोटी ५४ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला खर्च करता आलेला नाही. त्यांना २५ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले होते. खर्च न झालेल्या १० कोटी ५४ लाख रुपयांपैकी ८ कोटी ४१ लाख रुपये हे रस्ते आणि साकव यांच्या बांधकामासाठी देण्यात आले होते. तो निधी खर्च न झाल्याने रस्ते आणि साकव यांची कामे रखडली आहेत. नव्याने निर्माण झालेल्या पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी खर्च केलेला नाही. त्याच्या खालोखाल अलिबाग आणि महाडचा नंबर लागतो. पतन विभागाने लहान मासेमारी बंदरे विकसित करण्यासाठी घेतलेल्या निधीपैकी ६८ लाख परत केले आहेत. त्यामुळे लहान बंदरांच्या निर्मितीला ब्रेक लागला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने औषध खरेदीच्या निधीतील १४ लाख रुपये जमा केले आहेत. त्यामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात औषधे नाहीत, अशी ओरड जिल्हा सरकारी रुग्णालयाने केली, तर रुग्णांसह नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. डोंगरी विकासासाठी गाव वाड्यातील रस्ते, साकव, समाज मंदिर यासह अन्य विकासकामांकरिता ८ कोटी ५ लाख रु.चा निधी दिला होता. पैकी १७ लाख परत करावा लागल्याने विकासाला खीळ बसली आहे.कारवाईचा आसूड जलयुक्त शिवार योजनेला २४ कोटी ४५ लाख रुपये देण्यात आले होते. त्यातील पाच कोटी १५ लाख रुपये कृषी अधीक्षक विभागाला समर्पित करावे लागणार होते. हा निधी परत गेला तर सरकारकडून पुन्हा कसा मागायचा हा प्रश्न आहे.पुढील आथिक वषात सरकारकडे कोणत्या तोंडाने पुन्हा निधी मागायचा या विवंचनेत जिल्हा प्रशासन आहे. निधी खर्च न करणाऱ्या संबंधित यंत्रणांवर प्रशासकीय कारवाईचा आसूड जिल्हाधिकारी यांच्याकडून ओढला जाणार आहे.आलेला निधी परत जाऊ नये यासाठी पाच कोटी १५ लाख रुपयांचा निधी तात्पुरत्या स्वरुपात रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आल्याचे दाखविले आहे. जूनपर्यंत कृषी विभागाने तो खर्च करायचा आहे. अर्थात तो खर्च करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.- सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी