शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

रोस्टरअभावी जिल्हा परिषद शाळांत ५५0 शिक्षक कमी

By admin | Updated: October 28, 2015 01:14 IST

‘शिक्षक द्या शिक्षक...’ अशी ओरड आता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये ५५0 शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे

पुणे : ‘शिक्षक द्या शिक्षक...’ अशी ओरड आता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये ५५0 शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे. बिंदुनामावलीचे काम रखडल्याने गेली ४ वर्षे शिक्षकांचे समायोजन किंवा भरती करता येत नसल्याने जिल्ह्यात त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, राज्यातील केवळ चार जिल्हा परिषदांचे रोस्टर पूर्ण झाले आहे. गेली अडीच वर्षे जिल्ह्यात रोस्टरचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २0११ पर्यंतचे रोस्टर तपासून घेतले होते. सहायक आयुक्त मागासवर्ग कक्षाने सुरुवातीला १९९९ पर्यंत माहिती मागविली. त्यानंतर आता १९८६ पासूनची माहिती मागविली आहे.जिल्हा परिषद स्थापनेपूर्वीचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याने तेव्हाची माहिती देणार कशी, असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. रोस्टर पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यात शिक्षकांचे समायोजन तसेच भरती करता येत नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात शिक्षकांचा मोठी कमतरता निर्माण झाली आहे. आजच्या परिस्थितीत जिल्ह्यात ५५0 शिक्षक कमी आहेत. यात मुळशी तालुक्यात ७0, वेल्हे तालुक्यात ७२, भोर ४२ व हवेली तालुक्यात १७ व इतर तालुक्यांत मिळून ५५0 शिक्षक कमी आहेत. ज्या ठिकाणी एक किंवा दोनशिक्षकी शाळा आहेत, तेथील शिक्षक रजेवर गेल्यावर शाळा बंद ठेवल्या जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. ग्रामस्थ शिक्षकांची मागणी करीत आहेत. आंदोलनेही करीत आहेत. मात्र, रास्टर मान्यतेअभावी आमचे हात बांधले असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी तरी रास्टरला मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांच्या रोषाला जिल्हा परिषद प्रशासनाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे आंतरजिल्हा बदली व सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी असे ४५0 शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे वेटिंगवर आहेत.हे शिक्षक वारंवार आंदोलन, उपोषण करीत आमचे समायोजन करा अशी मागणी करीत आहेत. त्यांना रोस्टर पूर्ण झाल्यावर समायोजन करू, असे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी करून समायोजन न केल्याने अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या विरोधात अवमान याचिकाही दाखल केली आहे. तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी २0१२ पासून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांनी आम्ही किती दिवस थांबायचे? आता तरी आम्हाला सामावून घ्या, अशी निर्वाणीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)