शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

‘त्या’ मुलांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये नियोजनच नाही

By admin | Updated: November 7, 2014 00:00 IST

नवीन शिक्षण हक्क कायदा लागू होऊन ४ वर्र्षे झाली. अंमलबजावणीची मुदत संपून १ वर्ष झाले; मात्र अजूनही ऊसतोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचितच आहेत

महेश जगताप, सोमेश्वरनगरनवीन शिक्षण हक्क कायदा लागू होऊन ४ वर्र्षे झाली. अंमलबजावणीची मुदत संपून १ वर्ष झाले; मात्र अजूनही ऊसतोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचितच आहेत. ‘मी पटोद्याच्या कन्याशाळेत चौथीत शिकते; पण गावाकडे राहण्याची सोय नसल्याने आई-बाबांबरोबर येथे यावे लागते. येथेही कुणी शिक्षणासाठी आग्रह धरत नसल्याने आई-बाबांबरोबरच ऊस तोडण्यासाठी जाते...’ अनुजा शिवाजी शिंदे या ऊसतोडणी कामगाराच्या मुलीने दिलेली ही प्रतिक्रिया बोलकी आहे. या वर्षी हजारो ऊसतोडणी कामगार कारखाना स्थळावर दाखल झाले आहेत. तरीही, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाने अजूनही या मुलांसाठी वर्गखोल्या आणि शिक्षकांच्या नेमणुकीचे नियोजन केलेले नाही.नवीन शिक्षण हक्क कायद्यानुसार या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शाळांवर देण्यात आली होती. मात्र, जिल्हा शिक्षण विभाग या मुलांना शिक्षण देण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे ही मुले शाळेऐवजी उसाच्या फडातच जास्त रमताना दिसत आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘शनिवारी याबाबत सांगतो’, तर बारामतीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी के. एस. दोडके यांनी ‘वर फोन करून विचारून सांगतो,’ असे सांगीतले. कायद्यानुसार साखर कारखान्यांच्या व जनार्थ या संस्थेच्या साखरशाळा शासनाने बंद करून जबाबदारी स्वत:वर घेतली. जनार्थ या संस्थेच्या अनेक साखरशाळा या राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांवर सुरू होत्या. त्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जात होते. जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांवरील ऊसतोडणी कामगारांची हजारो मुले शाळेतच जात नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही मुले आपल्या आई-वडिलांसमवेत उसाच्या फडातच रमताना दिसतात. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी असतानाही गेल्या तीन वर्षांपासून ही जबाबदारी पेलण्यात शासन अपयशी ठरले आहे.