शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

युवकांनी गावाशी अतूट नाते जोडावे

By admin | Updated: December 23, 2016 00:30 IST

देश बदलण्याची ताकत असलेल्या युवकांनो, देशासाठी आणि समाजासाठी काही तरी करून दाखवण्याचे हेच उमेदीचे वय आहे.

वाकड : देश बदलण्याची ताकत असलेल्या युवकांनो, देशासाठी आणि समाजासाठी काही तरी करून दाखवण्याचे हेच उमेदीचे वय आहे. त्यामुळे आपल्या वयाची काही वर्षे समाजासाठी खर्च करा आणि गावाशी नाते जोडून खेड्यांचा विकास करा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आयटी अभियंत्यांना केले. हिंजवडीतील टेक महिंद्रा कंपनीतील संगणक अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मागील काही महिन्यापासून पगारातील काही रक्कम जमा करीत नाम या संस्थेच्या कामात हातभार लावण्यासाठी ५० लाख रुपयांची मदत केली. तसेच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष श्रमदानाद्वारे १० हजार वृक्षलागवड केली अन् त्याची काळजी स्वत: कंपनी घेत आहे. या कामाचे कौतुक करण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दोघे आले होते. या वेळी ते अभियंत्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी नामचे महाराष्ट्रप्रमुख राजा शेळके, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जगदीश मित्रा, अभिजीत लाहिरी, सतीश पै उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन टेक महिंद्रा फाउंडेशनचे विजय वावरे, मनोज सकटे व कल्पना दिवाडकर यांनी केले. (वार्ताहर)