शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी आरोग्य तपासणी गांभीर्याने घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST

डॉक्टरांचा सल्ला : लवकर निदान, लवकर उपचार पुणे : जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आहार आणि व्यायाम ...

डॉक्टरांचा सल्ला : लवकर निदान, लवकर उपचार

पुणे : जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आहार आणि व्यायाम यामध्ये नसलेली सुसूत्रता, व्यसनाधीनता, ताणतणाव यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. आजार होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी, आजारांचे लवकर निदान आणि उपचार यासाठी नियमित तपासण्यांवर भर देणे आवश्यक आहे.

३० ते ४० वर्षे वयोगटात धोक्याची घंटा देणारे आजार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळातच या समस्या रोखल्यास पुढे होणारे गंभीर परिणाम रोखता येऊ शकतात. नियमित आरोग्य तपासणी केल्यास मधुमेह, उच्चरक्तदाब, अपचन, हृदयाचे आजार, मूत्रपिंडविकार आदी आजारांची धोक्याची घंटा वेळीच ओळखली तर वेळीच जीवनशैलीत बदल करून आणि योग्य उपचार घेतल्यास, तरुण पिढीदेखील दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी म्हणाले, ‘बदलती जीवनशैली ही आरोग्याच्या विविध समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. ३० ते ४० वर्षे वयोगटात आढळणा-या आजारांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, फुफ्फुसाचा रोग, उच्च रक्तदाब, हायपरलिपिडेमिया, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा दीर्घकालीन धोका, चयापचय विकार आणि यकृत रोग यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळातच या आरोग्यविषयक समस्या गांभीर्याने घेत त्यानुसार उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुत रोखता येऊ शकते. थायरॉइड, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव, चिंता, नैराश्य, अपचन आणि मायग्रेन या अनुवंशिक आरोग्याच्या समस्या आहेत. तरुण स्त्रियांमध्ये थायरॉइड विकार सामान्य आहे आणि त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. नियमित आरोग्य तपासणीद्वारे तीव्र आजारांचे वेळीच निदान करणे शक्य होते.’

---

कोणत्या चाचण्या गरजेच्या?

मधुमेह तपासणी, वजन, कोलेस्टेराॅलची पातळी, यूरिक अॅसिडस्, हिमोग्राम, मूत्रपिंड आणि यकृत कार्य चाचणी, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल, सोनोग्राफी, लठ्ठपणा आणि चरबीचे प्रमाण याकरिता रक्त तपासणी.

स्त्रियांनी तरुण वयातच मॅमोग्राम आणि पॅप स्मिअर चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि डी आणि कॅल्शियमसारख्या कमतरतेचे मूल्यांकन केले पाहिजे जेणेकरून संधिवात, स्मृतिभ्रंश, एकाग्रता आणि स्मरणशक्ती यासारख्या दीर्घकालीन समस्या टाळता येतील.

---

काय काळजी घ्यावी?

योगा, एरोबिक्स, व्यायामशाळा, पोहणे, सूर्यनमस्कार, जॉगिंग, सायकलिंग, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि चालणे असे व्यायाम प्रकार निवडणे योग्य ठरेल. ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन, मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन करणे टाळा.