शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

वन्यजीवांसाठी तरुणाने केली पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:12 IST

सध्या पुरंदर तालुक्यात उन्हाळ्याच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका वन विभागातील प्राण्यांना बसतो. तुकाई मंदिर परिसरातील ...

सध्या पुरंदर तालुक्यात उन्हाळ्याच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका वन विभागातील प्राण्यांना बसतो. तुकाई मंदिर परिसरातील वन विभागामध्ये हरण, लांडगा, कोल्हा, तरस, ससा, त्याचप्रमाणे इतर लहान-मोठे सरपटणारे प्राणी आहेत. उन्हाळ्यात वन विभागातील पाणीसाठा संपल्यानंतर हे प्राणी पाणी पिण्यासाठी धोका पत्करुन मानवी वस्तीकडे धाव घेतात. तुकाई मंदिर परिसराजवळून जेजुरी ते उरुळीकांचन कडे जाणारा महामार्ग असल्यामुळे अनेक वेळा रस्ता ओलांडताना अपघात होतात व वन्य प्राण्यांचा बळी जातो. त्यामुळे जीवसृष्टी धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण होत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन शरद चंद्रजी पतसंस्थेचे चेअरमन सुनील कुंजीर व त्यांचे सर्व सहकारी यांनी आठवड्यातून एक दिवस या वनविभागातील पाणीसाठे पाण्याने भरण्याचे ठरविले. त्यानंतर टॅकरच्या साह्याने पाणी आणुन पानवठ्यामध्ये भरत आहेत. या कामात महादेव कुंजीर, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष विजय कुंजीर, उद्योगपती कैलास तात्या कुंजीर, रमेश कुंजीर, सागर कुंजीर नेहमीच मदत करतात.

--

वाघापूर परिसरामध्ये वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी असणाऱ्या वन्यजीवनामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. म्हणून वन्यजीवांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने या कार्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे.

- सुनील कुंजीर,

सामाजिक कार्यकर्ते

--

२७भुलेश्वर वन्यजीव पाणीपुरवठा

फोटो ओळ - तुकाई मंदिर परिसरातील पानवठे भरताना सुनील कुंजीर, महादेव कुंजीर,विजय कुंजीर आदी